शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

मोदींचा विजय हा सावरकरांच्या विचारांचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 13:08 IST

‘राष्ट्रहित हीच सावरकरांच्या तत्वांची भूमिका होती.त्यांच्या राष्ट्रहिताच्या नीतीला आज न्याय मिळाला आहे.

ठळक मुद्देअक्षय जोग लिखित पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : सावरकरांच्या राष्ट्रहिताच्या नीतीला आज न्याय मिळाला आहे. त्यांच्या भूमिकेला कोंदण लाभले आहे. बुद्धिप्राण्यावर आधारित विज्ञाननिष्ठा ही सावरकरांची आपल्याला मिळालेली देणगी आहे. त्यांची मूल्ये सत्तेच्या रुपात सत्यात उतरली आहेत. नरेंद्र मोदींचा विजय हा सावरकरांच्या विचारांचा विजय आहे, असे मत माजी खासदार प्रदीप रावत यांनी व्यक्त केले. निवडणुकीतील पराभव कोणत्याही पक्षाचा नसून, राष्ट्रीय ऐक्याला बाधा निर्माण करणा-या राजकारणाचा पराभव आहे, असेही त्यांनी नमूद केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव’ या अक्षय जोग लिखित पुस्तकाचे प्रकाशन रावत यांच्या हस्ते रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि अध्यासन येथे पार पडले. यावेळी लेखक अक्षय जोग, मृत्यूंजय प्रकाशनाचे सात्यकी सावकर उपस्थित होते. याप्रसंगी रत्नागिरीमध्ये पतित पावन मंदिर उभारणा-या भागोजीसेठ कीर यांचे वंशज विवेक कीर आणि ‘त्या तिघी-स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा’ या एकपात्री नाट्यप्रयोगाच्या सादरकर्त्या अपर्णा चोथे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.रावत म्हणाले, ‘सावरकरांनी द्विराष्ट्रवादाची वस्तूस्थिती मांडली. त्यांची सामाजिक, धार्मिक मूल्ये, वैचारिक पाया, बुध्दीवादाचा वैज्ञानिक दृष्टिकोन असा अखंड धागा समजून घेणे आवश्यक आहे.  हिंदुत्व हे राजकारणाचे मध्यवर्ती सूत्र बनले आहे. सावरकरांविरोधात गरळ ओकणाऱ्या, नालस्ती करणाऱ्या सुपारी गँगला वैचारिक बैठक नाही. धर्मनिरपेक्षतेच्या, पुरोगामित्वाच्या नावाखाली मुल्यांना काळिमा फासणारे राजकारण केले गेले.’ ‘राष्ट्रहित हीच सावरकरांच्या तत्वांची भूमिका होती. कोणतेच राष्ट्रहित हिंदूविरोधी असू शकत नाही. समानता हाच हिंदुत्वाचा मूळ धागा आहे. सावरकरांचा विचार खालच्या स्तरापर्यंत तर बाबासाहेबांचा विचार वरच्या स्तरापर्यंत पोहचला पाहिजे. महापुरुषांची साम्यस्थळे, वेगळेपणाची मांडणी यांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. समाजाने एकत्र यायचे असेल तर फुटीरतावादी शक्तींना दूर ठेवता आले पाहिजे’, असेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :PuneपुणेVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरNarendra Modiनरेंद्र मोदीHindutvaहिंदुत्वLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल