शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

साहित्य संमेलन स्पेशल ट्रेन तिकीटाचा तिप्पट दर..! मनसेकडून मोफत प्रवासाची मागणी

By राजू इनामदार | Updated: January 25, 2025 17:41 IST

मोफत रेल्वे सोडण्याची मागणी: मुख्यमंत्री, पुण्यातील मंत्ऱ्यांवर टीका

पुणे: दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तीनपट दर आकारून रेल्वेगाडी सोडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर टीका केली असून रेल्वे मंत्रालयाने मराठी साहित्य रसिकांसाठी मोफत रेल्वे सोडावी अशी मागणी रेल्वे विभागाकडे केली आहे. याची दखल घेतली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.

सरहद संस्था दिल्लीतील संमेलनाची संयोजक आहे. संमेलन परराज्यात असेल तर सर्वसाधारणपणे रेल्वेकडून सवलतीच्या दरात जादा गाडीची व्यवस्था केली जाते. मात्र यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना यासंबधीची व्यवस्था पाहणाऱ्यांना, रेल्वे आता विनामुल्य गाडी देत नाही, उलट जादा गाडी आरक्षित केली तर त्यासाठी तीनपट दर द्यावा लागतो असे सांगून त्याचपद्धतीने गाडी दिली आहे. यालाच मनसेने आक्षेप घेतला आहे. यापुर्वी घुमान संमेलनासाठी रेल्वेने विनामुल्य जादा गाडी उपलब्ध करून दिली होती. अयोध्या दर्शनसाठीही सवलतीच्या दरात जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठीही रेल्वेने विशेष व्यवस्था करून जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. असे असताना केंद्र सरकारने ज्या भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा दिली त्याच भाषेच्या गौरवासाठी मागील ९७ वर्षे होत असलेल्या अखिल भारतीय संमेलनासाठी गाडी सोडली जात नाही म्हणजे काय? असा प्रश्न मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी रेल्वे उपविभागीय कार्यालयाला दिलेल्या पत्रात केला आहे.

हा मराठी भाषेची उपेक्षाच नाही तर अवमान करण्याचा प्रकार असल्याचे संभूस यांनी म्हटले आहे. वास्तविक राज्याच्या मुख्यमंत्ऱ्यांनी याबाबतीत तातडीने रेल्वे मंत्ऱ्यांबरोबर बोलायला हवे होते. आयोजक संस्था पुण्याची आहे. ती आर्थिक देणग्यांमधूनच संमेलन करणार आहे. संमेलनाला जाऊ इच्छिणारे मराठी साहित्यिक व साहित्यरसिकही फार काही धनवान नसतात. हे लक्षात घेऊन पुणेकर असलेले केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी, राज्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ या मंत्ऱ्यांनीही त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, मुख्यमंत्ऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून द्यायला हवी असे मत संभूस यांनी व्यक्त केले. मनसे मराठी भाषेची ही उपेक्षा सहन करणार नाही. रेल्वे मंत्रालयाने याची दखल घ्यावी, एक १८ डब्यांची जादा गाडी खास साहित्य संमेलनासाठी म्हणून सोडावी, अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनrailwayरेल्वेRaj Thackerayराज ठाकरे