शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

साहित्य संमेलन स्पेशल ट्रेन तिकीटाचा तिप्पट दर..! मनसेकडून मोफत प्रवासाची मागणी

By राजू इनामदार | Updated: January 25, 2025 17:41 IST

मोफत रेल्वे सोडण्याची मागणी: मुख्यमंत्री, पुण्यातील मंत्ऱ्यांवर टीका

पुणे: दिल्लीत २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने तीनपट दर आकारून रेल्वेगाडी सोडली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर टीका केली असून रेल्वे मंत्रालयाने मराठी साहित्य रसिकांसाठी मोफत रेल्वे सोडावी अशी मागणी रेल्वे विभागाकडे केली आहे. याची दखल घेतली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही मनसेने दिला आहे.

सरहद संस्था दिल्लीतील संमेलनाची संयोजक आहे. संमेलन परराज्यात असेल तर सर्वसाधारणपणे रेल्वेकडून सवलतीच्या दरात जादा गाडीची व्यवस्था केली जाते. मात्र यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना यासंबधीची व्यवस्था पाहणाऱ्यांना, रेल्वे आता विनामुल्य गाडी देत नाही, उलट जादा गाडी आरक्षित केली तर त्यासाठी तीनपट दर द्यावा लागतो असे सांगून त्याचपद्धतीने गाडी दिली आहे. यालाच मनसेने आक्षेप घेतला आहे. यापुर्वी घुमान संमेलनासाठी रेल्वेने विनामुल्य जादा गाडी उपलब्ध करून दिली होती. अयोध्या दर्शनसाठीही सवलतीच्या दरात जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्यासाठीही रेल्वेने विशेष व्यवस्था करून जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. असे असताना केंद्र सरकारने ज्या भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा दिली त्याच भाषेच्या गौरवासाठी मागील ९७ वर्षे होत असलेल्या अखिल भारतीय संमेलनासाठी गाडी सोडली जात नाही म्हणजे काय? असा प्रश्न मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी रेल्वे उपविभागीय कार्यालयाला दिलेल्या पत्रात केला आहे.

हा मराठी भाषेची उपेक्षाच नाही तर अवमान करण्याचा प्रकार असल्याचे संभूस यांनी म्हटले आहे. वास्तविक राज्याच्या मुख्यमंत्ऱ्यांनी याबाबतीत तातडीने रेल्वे मंत्ऱ्यांबरोबर बोलायला हवे होते. आयोजक संस्था पुण्याची आहे. ती आर्थिक देणग्यांमधूनच संमेलन करणार आहे. संमेलनाला जाऊ इच्छिणारे मराठी साहित्यिक व साहित्यरसिकही फार काही धनवान नसतात. हे लक्षात घेऊन पुणेकर असलेले केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी, राज्याचे ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ या मंत्ऱ्यांनीही त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, मुख्यमंत्ऱ्यांच्या ही बाब लक्षात आणून द्यायला हवी असे मत संभूस यांनी व्यक्त केले. मनसे मराठी भाषेची ही उपेक्षा सहन करणार नाही. रेल्वे मंत्रालयाने याची दखल घ्यावी, एक १८ डब्यांची जादा गाडी खास साहित्य संमेलनासाठी म्हणून सोडावी, अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनrailwayरेल्वेRaj Thackerayराज ठाकरे