शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

MPSC: शासनाने अध्यादेश जाहीर न केल्याने संधी हुकली? हजारो विद्यार्थ्यांना बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 11:03 IST

राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल असे वाटले होते. मात्र, एक महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी उलटून गेला तसेच अर्ज करण्याची मुदत संपली तरी शासनाने अध्यादेश जाहीर केला नाही.

अभिजित कोळपे

पुणे : राज्य मंत्री मंडळाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षांनी वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय १३ ऑक्टोबर राेजी घेतला. राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल असे वाटले होते. मात्र, एक महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी उलटून गेला तसेच अर्ज करण्याची मुदत संपली तरी शासनाने अध्यादेश जाहीर केला नाही. तसेच आयोगानेही याबाबत कोणतेही नोटिफिकेशन काढले नाही. परिणामी हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक आणि इतर परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरात लवकर अध्यादेश जाहीर करावा, अशी मागणी राज्यातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत आयोगाने कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. वयोमर्यादा ओलांडल्याने ते बाहेर फेकले गेले. याचा विचार करून मंत्रिमंडळाने वयोमर्यादा एक वर्षाने वय वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप आयोगाने याबाबत कोणतेही नोटिफिकेशन काढलेले नाही. तसेच राज्य मंत्रिमंडळाने वयोमर्यादा वाढवल्याचा पूर्व परीक्षेसाठी काहीच फायदा झाला नाही. आगामी काळात होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक आणि इतर गट ‘अ’, ‘ब’, संवर्गातील पदांच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

दोन वर्षांनंतर निघालेल्या ३९० पदांची केवळ घोषणा 

''एमपीएससी समन्वय समितीने दोन वर्षांनी वयोमर्यादा वाढवावी याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता. त्यामुळे राज्य मंत्रीमंडळाने केवळ वर्षासाठी वयोमर्यादा वाढवल्याचे जाहीर केले. परंतु, त्याचा शासन निर्णय जाहीर केला नाही. दोन वर्षांनंतर निघालेल्या मोठ्या (३९० पदे) जाहिरातीत राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठी संधी हाेती. पण केवळ घोषणा झाली. पण प्रत्यक्षात अध्यादेश जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांना अर्ज करता आला नाही. आता अर्ज करण्याची मुदत संपली आहे असे एमपीएससी समन्वय समितीच्या महेश घरबुडे याने सांगितले.''

शासनाने लवकर अध्यादेश जाहीर करावा

''कोरोनामुळे दोन वर्षे कोणतीच जाहिरात नव्हती. हजारो विद्यार्थ्यांची यामुळे वयोमर्यादा ओलांडली. याबाबत सकारात्मक विचार व्हावा. अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. त्याला यश आले. परंतु, निर्णय होऊनही केवळ अध्यादेश जाहीर न झाल्याने त्याचा फटका बसला आहे. याचा विचार करून शासनाने लवकर अध्यादेश जाहीर करावा असे स्पर्धा परीक्षा विद्यार्थिनी अदिती भोसले म्हणाली आहे.''  

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाPoliceपोलिसStudentविद्यार्थीEducationशिक्षणexamपरीक्षाState Governmentराज्य सरकार