शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
2
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
3
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
4
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
5
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
6
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
7
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
8
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
9
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
10
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
11
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
12
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
13
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
14
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
15
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
16
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
17
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
18
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
19
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
20
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...

MPSC: शासनाने अध्यादेश जाहीर न केल्याने संधी हुकली? हजारो विद्यार्थ्यांना बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 11:03 IST

राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल असे वाटले होते. मात्र, एक महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी उलटून गेला तसेच अर्ज करण्याची मुदत संपली तरी शासनाने अध्यादेश जाहीर केला नाही.

अभिजित कोळपे

पुणे : राज्य मंत्री मंडळाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक वर्षांनी वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय १३ ऑक्टोबर राेजी घेतला. राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल असे वाटले होते. मात्र, एक महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी उलटून गेला तसेच अर्ज करण्याची मुदत संपली तरी शासनाने अध्यादेश जाहीर केला नाही. तसेच आयोगानेही याबाबत कोणतेही नोटिफिकेशन काढले नाही. परिणामी हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक आणि इतर परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरात लवकर अध्यादेश जाहीर करावा, अशी मागणी राज्यातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांत आयोगाने कोणतीही जाहिरात प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. वयोमर्यादा ओलांडल्याने ते बाहेर फेकले गेले. याचा विचार करून मंत्रिमंडळाने वयोमर्यादा एक वर्षाने वय वाढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप आयोगाने याबाबत कोणतेही नोटिफिकेशन काढलेले नाही. तसेच राज्य मंत्रिमंडळाने वयोमर्यादा वाढवल्याचा पूर्व परीक्षेसाठी काहीच फायदा झाला नाही. आगामी काळात होणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक आणि इतर गट ‘अ’, ‘ब’, संवर्गातील पदांच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

दोन वर्षांनंतर निघालेल्या ३९० पदांची केवळ घोषणा 

''एमपीएससी समन्वय समितीने दोन वर्षांनी वयोमर्यादा वाढवावी याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता. त्यामुळे राज्य मंत्रीमंडळाने केवळ वर्षासाठी वयोमर्यादा वाढवल्याचे जाहीर केले. परंतु, त्याचा शासन निर्णय जाहीर केला नाही. दोन वर्षांनंतर निघालेल्या मोठ्या (३९० पदे) जाहिरातीत राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठी संधी हाेती. पण केवळ घोषणा झाली. पण प्रत्यक्षात अध्यादेश जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांना अर्ज करता आला नाही. आता अर्ज करण्याची मुदत संपली आहे असे एमपीएससी समन्वय समितीच्या महेश घरबुडे याने सांगितले.''

शासनाने लवकर अध्यादेश जाहीर करावा

''कोरोनामुळे दोन वर्षे कोणतीच जाहिरात नव्हती. हजारो विद्यार्थ्यांची यामुळे वयोमर्यादा ओलांडली. याबाबत सकारात्मक विचार व्हावा. अशी विद्यार्थ्यांनी मागणी केली होती. त्याला यश आले. परंतु, निर्णय होऊनही केवळ अध्यादेश जाहीर न झाल्याने त्याचा फटका बसला आहे. याचा विचार करून शासनाने लवकर अध्यादेश जाहीर करावा असे स्पर्धा परीक्षा विद्यार्थिनी अदिती भोसले म्हणाली आहे.''  

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाPoliceपोलिसStudentविद्यार्थीEducationशिक्षणexamपरीक्षाState Governmentराज्य सरकार