शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

पाकव्याप्त काश्मीरमधील बांधकामे चुकीची, चिनी सामरिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 03:16 IST

चीनमधील पाकव्याप्त काश्मीर येथे सुरू असलेली बांधकामे तसेच त्या परिसरातील धोरणांबाबत चिनी सामरिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. दुर्गम भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करून काय साध्य होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आशिया खंडातील दोन मोठे देश असलेल्या भारत आणि चीनमध्ये सीमाप्रश्नासह काही मुद्द्यांवर वादविवाद आहेत.

पुणे : चीनमधील पाकव्याप्त काश्मीर येथे सुरू असलेली बांधकामे तसेच त्या परिसरातील धोरणांबाबत चिनी सामरिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. दुर्गम भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करून काय साध्य होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आशिया खंडातील दोन मोठे देश असलेल्या भारत आणि चीनमध्ये सीमाप्रश्नासह काही मुद्द्यांवर वादविवाद आहेत. डोकलामचा तिढा नुकताच सुटला असला, तरी सीमा प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. आपापला हट्ट सोडून काही पावले मागे आल्यास हा प्रश्न सुटू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.पुण्यातील पुणे इंटरनॅशनल सेंटर अर्थात पीआयसी, पॉलिसी पर्स्पेक्टिव्ह फाउंडेशन, द ट्रिब्यून ट्रस्ट, आणि सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज अर्थात सीएएसएस या संस्थांतर्फे आयोजित ‘पुणे डायलॉग आॅन नॅशनल सिक्युरिटी-२०१७’ (पीडीएनएस) या सुरक्षाविषयक तज्ज्ञांच्या परिषदेचे आयोजन यशदा येथे करण्यात आले होते. या परिषदेस चीन येथील फुदान विद्यापीठातील ‘इस्टिट्यूट आॅफ इंटरनॅशनल अफेअर्स’ विभागाचे प्रमुख प्रा. शेन डिंगली यांंनी ‘लोकमत’शी संवाद साधला.डिंगली म्हणाले, चीन पाकव्याप्त काश्मीरच्या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे काम केले जात आहे. वास्तविक पाहता या जागा वादातीत आहेत. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार अशा जागेत काम करणे चुकीचे आहे. मात्र, तरीसुद्धा या ठिकाणी कामे होत आहेत. इंडो पॅसिफिक योजनेद्वारे चीनला शह देण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तविक पाहता योजनेद्वारे चीनला काही फरक पडणार नाही.आशिया खंडातील दोन मोठे देश असलेल्या भारत आणि चीनमध्ये सीमाप्रश्नासह काही मुद्द्यांवर वादविवाद आहेत. डोकलामचा तिढा नुकताच सुटला असला, तरी सीमा प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे. त्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. आपापला हट्ट सोडून काही पावले मागे आल्यास हा प्रश्न सुटू शकेल, त्याचबरोबर डोकलामबाबत भूतान व चीनमध्ये पूर्वीपासून वाद आहे. अशा परिस्थितीत चीनने तिथे रस्त्याचे काम करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.चीनचा नॉर्थ कोरियाच्या भूमिकेला विरोध आहे. याबाबत वेळोवेळी चीनने त्या देशाला समज दिली आहे. नॉर्थ कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केल्याने आशिया खंडातील परिस्थिती अस्थिर बनली आहे.- प्रा. शेन डिंगली

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर