शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Nirmala Nawale: लाखो लाईक्स अन् फॉलोअर्स; सोशल मीडियावरची लोकप्रियता निवडणुकीत नाही, निर्मला नवलेंचा किती मतांनी पराभव?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 16:27 IST

Nirmala Nawale सोशल मीडियावर नवलेंची मोठी क्रेझ असून मोठ्या संख्येने लोक त्यांना फॉलो करतात. मात्र त्यांची लोकप्रियता मतांमध्ये रुपांतरीत करु शकल्या नाहीत

पुणे: पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले या पुन्हा एकदा सोशल मीडियावरील त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून मैदानात उतरलेल्या नवले यांचा पराभव झाला. पुणे जिल्हा परिषद अंतर्गत कारेगाव पंचायत गटात झालेल्या या निवडणुकीत नवले यांचा ३२९ मतांनी पराभव झाला आहे. 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना कारेगाव-कान्हूर-मेसाई गणातून तिकीट मिळालं होतं. त्याआधी कारेगावच्या त्या सरपंचही होत्या. सोशल मीडियावर नवलेंची मोठी क्रेझ आहे. मोठ्या संख्येने लोक त्यांना फॉलो करतात. मात्र त्यांची प्रसिद्धी आणि लोकप्रियता मतांमध्ये रुपांतरीत करु शकल्या नाहीत. त्यांच्या विरोधात मुख्य लढत भाजपच्या मनिष पाचंगेंशी होती. पाचंगेंनी निर्मला नवलेंना ३२९ मतांनी पराभूत केलं. हा पराभव नवले आणि त्यांच्या चाहत्यांसाठीही एक धक्का ठरला आहे. 

पराभवानंतर निर्मला नवले यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी या निवडणुकीत पैसे वाटल्याचा आणि अमली पदार्थांचाही वापर झाल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओमध्ये बोलताना नवले म्हणाल्या की,“३२९ मतांनी झालेला पराभव माझ्यासाठी अनपेक्षित होता. प्रचंड पैशाचा वापर होऊनही ६५७७ मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. मात्र या निवडणुकीत पैसा आणि बोगस मतदान जिंकले, माणूस हरला हे कटू सत्य आहे. माझ्या गणातील काही मतदार काही पैशासाठी पुढील पाच वर्षांसाठी विकले गेले आहेत. ही भावना मला अस्वस्थ करते,” असे त्यांनी सांगितले.

नवले यांनी निवडणुकीदरम्यान दारूसोबत ड्रग्जचाही वापर झाल्याचा गंभीर आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, तरुण कार्यकर्त्यांना रात्रभर जागे ठेवण्यासाठी अंमली पदार्थांचा वापर करण्यात आला. या निवडणुकीदरम्यान माझ्या गावातील सुमारे ३० ते ४० तरुण ड्रग्जच्या आहारी गेले असून, याचे गंभीर परिणाम भविष्यात दिसून येतील,” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

याशिवाय सध्याच्या राजकारणावर बोलताना नवले म्हणाल्या की, आज लोकांची कामे, सुखदुःख आणि पक्षनिष्ठा यांना किंमत उरलेली नाही. जास्त पैसे वाटणारा उमेदवार निवडणुकीत पुढे जातो. त्यामुळे राजकारणात येणाऱ्यांनी पैसा कमवून निवडणुकीत वापरावा आणि जिंकल्यानंतर मतदारांकडे पाठ फिरवावी, अशी विकृत परिस्थिती निर्माण झाली असल्याची टीका त्यांनी केली.

टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५zpजिल्हा परिषदsarpanchसरपंचNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणElectionनिवडणूक 2026Votingमतदान