शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

‘ठंडा होने दो’ची पद्धत; पुण्यात भाजपची बंडखोरी संपली, काँग्रेसची सुरूच, फटका आघाडीला बसणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 13:12 IST

भाजपने अवघ्या तासाभरातच बंडखोरी संपवली, काँग्रेसचे मात्र बंडखोरीकडे लक्षच नाही

पुणे : भारतीय जनता पक्षाची विधानसभेसाठी पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघात होत असलेली बंडखोरी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने अवघ्या तासाभरात संपवली, काँग्रेसचा घोळ मात्र अजूनही सुरूच आहे. ‘ठंडा होने दो’ ही पक्षाची पारंपरिक पद्धत अवलंबण्यात येत असून, ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीच चित्र स्पष्ट होईल.

महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे तीन तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना (उद्धव ठाकरे) असे प्रमुख ६ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यातील जागा वाटप निश्चित होत नव्हते, त्यामुळेच अनेकांनी निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली होती. त्यातही भाजप व काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून जास्त जण इच्छुक होते. जागावाटप निश्चित झाल्यानंतर ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी उचल खाल्ली व बंडखोरी जाहीर केली.

भाजपमध्ये कोथरूडमधून अमोल बालवडकर, उज्ज्वल केसकर, पर्वतीमधून श्रीनाथ भिमाले, शिवाजीनगमधून मधुकर मुसळे, कॅन्टोन्मेटमधून भरत वैरागे अशा अनेकांनी पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतरही लढणार असे जाहीर केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधीच केंद्रीय सहकार व नागरी विमान उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ व अन्य वरिष्ठ नेत्यांनी भिमाले, बालवडकर यांच्याबरोबर संपर्क साधला. त्यांनी लगेचच माघार घेत असल्याचे जाहीर केले. केसकर यांच्याबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संभाषण केले व त्यांनीही माघार घेत असल्याचे सांगितले. आता मुसळे व वैरागे यांच्यापैकी वैरागे यांनी अर्ज दाखल केला आहे, मात्र हा अर्जही मागे घेतला जाईल, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

अवघ्या एका तासात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी शमवली. दुसरीकडे काँग्रेस मात्र बंडखोरी होऊनही तिकडे लक्ष द्यायला तयार नाही. माजी महापौर कमल व्यवहारे यांनी कसबा विधानसभेतून पक्षाच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला आहे. याच मतदारसंघात पक्षाचे पदाधिकारी मुख्तार शेख यांनीही बंडखोरी केली आहे. पर्वतीत माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध अर्ज सादर केला आहे. शिवाजीनगरमध्ये मनीष आनंद यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारासमोर अर्ज सादर करून आव्हान उभे केले आहे. तीन ठिकाणी अशी बंडखोरी होऊनही पक्षाचे स्थानिक, वरिष्ठ पदाधिकारीही शांतच आहेत. बंडखोरांबरोबर बोलणे, त्यांना समजावणे यापैकी काहीही झालेले नाही. ठंडा होने दो, ही काँग्रेसची दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतची खास पद्धत आहे. तीच पुण्यातही अवलंबण्यात येत आहे, अशी चर्चा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये यावरून होत आहे.

निवडणूक आहे, प्रत्येकाला ती लढवण्याची इच्छा असतेच. ज्यांनी पक्षाच्या मान्यतेशिवाय अर्ज दाखल केले आहेत, त्यांच्याबरोबर बोलणी सुरू आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे. तेही पक्षाच्या या पदाधिकाऱ्यांबरोबर बोलतील. त्यानंतर ते अर्ज मागे घेतील याची खात्री आहे. - अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसkasba-peth-acकसबा पेठparvati-acपर्वतीshivajinagar-acशिवाजीनगर