शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

‘ठंडा होने दो’ची पद्धत; पुण्यात भाजपची बंडखोरी संपली, काँग्रेसची सुरूच, फटका आघाडीला बसणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 13:12 IST

भाजपने अवघ्या तासाभरातच बंडखोरी संपवली, काँग्रेसचे मात्र बंडखोरीकडे लक्षच नाही

पुणे : भारतीय जनता पक्षाची विधानसभेसाठी पुण्यातील तीन विधानसभा मतदारसंघात होत असलेली बंडखोरी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने अवघ्या तासाभरात संपवली, काँग्रेसचा घोळ मात्र अजूनही सुरूच आहे. ‘ठंडा होने दो’ ही पक्षाची पारंपरिक पद्धत अवलंबण्यात येत असून, ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीच चित्र स्पष्ट होईल.

महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे तीन तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) व शिवसेना (उद्धव ठाकरे) असे प्रमुख ६ पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यातील जागा वाटप निश्चित होत नव्हते, त्यामुळेच अनेकांनी निवडणूक लढवण्यासाठी कंबर कसली होती. त्यातही भाजप व काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून जास्त जण इच्छुक होते. जागावाटप निश्चित झाल्यानंतर ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी उचल खाल्ली व बंडखोरी जाहीर केली.

भाजपमध्ये कोथरूडमधून अमोल बालवडकर, उज्ज्वल केसकर, पर्वतीमधून श्रीनाथ भिमाले, शिवाजीनगमधून मधुकर मुसळे, कॅन्टोन्मेटमधून भरत वैरागे अशा अनेकांनी पक्षाचा अधिकृत उमेदवार जाहीर झाल्यानंतरही लढणार असे जाहीर केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधीच केंद्रीय सहकार व नागरी विमान उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ व अन्य वरिष्ठ नेत्यांनी भिमाले, बालवडकर यांच्याबरोबर संपर्क साधला. त्यांनी लगेचच माघार घेत असल्याचे जाहीर केले. केसकर यांच्याबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संभाषण केले व त्यांनीही माघार घेत असल्याचे सांगितले. आता मुसळे व वैरागे यांच्यापैकी वैरागे यांनी अर्ज दाखल केला आहे, मात्र हा अर्जही मागे घेतला जाईल, असे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

अवघ्या एका तासात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी शमवली. दुसरीकडे काँग्रेस मात्र बंडखोरी होऊनही तिकडे लक्ष द्यायला तयार नाही. माजी महापौर कमल व्यवहारे यांनी कसबा विधानसभेतून पक्षाच्या उमेदवाराविरोधात अर्ज दाखल केला आहे. याच मतदारसंघात पक्षाचे पदाधिकारी मुख्तार शेख यांनीही बंडखोरी केली आहे. पर्वतीत माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध अर्ज सादर केला आहे. शिवाजीनगरमध्ये मनीष आनंद यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारासमोर अर्ज सादर करून आव्हान उभे केले आहे. तीन ठिकाणी अशी बंडखोरी होऊनही पक्षाचे स्थानिक, वरिष्ठ पदाधिकारीही शांतच आहेत. बंडखोरांबरोबर बोलणे, त्यांना समजावणे यापैकी काहीही झालेले नाही. ठंडा होने दो, ही काँग्रेसची दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतची खास पद्धत आहे. तीच पुण्यातही अवलंबण्यात येत आहे, अशी चर्चा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये यावरून होत आहे.

निवडणूक आहे, प्रत्येकाला ती लढवण्याची इच्छा असतेच. ज्यांनी पक्षाच्या मान्यतेशिवाय अर्ज दाखल केले आहेत, त्यांच्याबरोबर बोलणी सुरू आहे. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे. तेही पक्षाच्या या पदाधिकाऱ्यांबरोबर बोलतील. त्यानंतर ते अर्ज मागे घेतील याची खात्री आहे. - अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेसkasba-peth-acकसबा पेठparvati-acपर्वतीshivajinagar-acशिवाजीनगर