शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
2
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
3
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
6
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
7
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
8
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
9
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
10
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
11
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
12
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
13
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
14
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
15
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
16
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
17
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
18
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
19
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 06:25 IST

गेला आठवडाभर पावसाने राज्यात दाणादाण उडवून दिली.

मुंबई/पुणे: कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नसून पुढील दोन दिवसात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर आणखी कमी होत जाईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या झालेला पाऊस अनपेक्षित असून, पावसाचा जोर कमी झाल्यास व उघडीप मिळाल्यास पेरणीयोग्य वापसा स्थिती तयार होणार आहे. त्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. 

गेला आठवडाभर पावसाने राज्यात दाणादाण उडवून दिली. हवामान विभागाने हा पाऊस मान्सूनचा असल्याचे म्हटले तर तज्ज्ञांनी पूर्वमोसमी असल्याचे सांगितले. त्यानंतर आता पुढील पाच दिवसात पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.

आता राज्यात पावसाचा प्रवास कसा? 

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप म्हणाले, मान्सूनच्या वाऱ्यांमधील जोर कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यावरील कमी दाबाचे क्षेत्र विरल्याने अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टाही कमी होईल.

राज्यात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये कोकणवगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नाही. कोकणात दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर तेथेही पाऊस कमी होईल.

लगेच पेरणी केल्यास दुबार पेरणीचा धोका 

राज्याच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला असताना लगेच पेरण्या कराव्यात की नाहीत याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असताना आता कृषी खात्याने लगेच पेरण्या न करण्याचा सल्ला दिला आहे.

कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'लोकमत'ला सांगितले की, पेरणीसाठी जमिनीमध्ये जितकी ओल असणे आवश्यक असते त्यापेक्षा कितीतरी जास्त ओल अतिवृष्टीमुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे पेरणी करतानादेखील अनेक अडचणी येतील. मातीचे लगेच गोळे होत असल्याने बीजरोपण योग्य पद्धतीने होणार नाही.

असे असूनही पेरणी केली आणि नंतर आठ-दहा दिवसांपेक्षा अधिक उघडीप राहिली तर पेरणी वाया जाण्याची शक्यता अधिक असेल, अशावेळी दुबार पेरणीशिवाय पर्याय राहणार नाही. काळ्या, मध्यम वा हलक्या शेतजमिनीवरही लगेच पेरणी करण्याची घाई करू नये. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी