शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

Video : पुरुषांनो,सावधान! कौटुंबिक हिंसाचार केल्यास तुम्ही होणार ‘क्वारंटाईन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 16:23 IST

संचारबंदीच्या काळात अनेक कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना समोर

ठळक मुद्देहिंसाचार रोखण्यासाठी दक्षता समिती : जिल्हा परिषदेचा उपक्रम  

 निनाद देशमुख-पुणे : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात अनेक कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना पुढे आल्या.  जिल्ह्यात या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ग्रामपंचायत स्तरावर महिला दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून दोषी पुरूष मंडळींवर ही समिती थेट कारवाई करत त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करणार आहे. चौकशी समिती बसवून त्यात दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाईही केली जाणार असल्याचे कौटुंबिक हिंसाचार पुरूषांना चांगलाच महागात पडणार आहे.संपूर्ण देशात आणि राज्यात कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहेत. यामुळे सर्वांनाच घरी बसणे बंधनकारक आहे. गेल्या महिन्याभरापासून लोक घरी बसले आहेत. या काळात राज्यात अनेक कौटूबिंक हिंसाचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. घरबसल्या महिला त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे. या घटनांची गृहमंत्रालयानेही गंभीर दखल घेतली असून कारवाई करण्याचे तसेच प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याच्या सुचना केल्या आहेत. जिल्हा परिषदेनेही या घटना रोखण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर महिला दक्षता समितीची स्थापना केली आहे. ही समिती कौटूंबिक हिंसाचारांवर लक्ष ठेवणार आहे. या समितीत ग्रामपंचायत महिला सदस्या, अंगणवाडी सेविका, महिला बचत गटातील सदस्या, अंगणवाडी मदतनीस तसेच आदी महिला या समितीच्या सदस्या राहणार आहेत. ग्रामपंचायतीतील जेष्ठ महिला सदस्या या समितीची अध्यक्षा राहणार आहे.

गावात एखादी कौटुंबिक हिंसाचाराची घटना आढळल्यास संबंधिताकडे जाऊन आधी ही समिती समुपदेशन करणार आहे. त्यानंतरही संबंधित पुरषात सुधारणा न झाल्यास त्याला कुटुंबापासून दुर करत त्याचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार आहे. या काळात त्यांना एकटे ठेवले जाणार आहे. यासाठी पोलीस निरिक्षकाची मदत घेण्याच्या सुचना जिल्हा परिषदेने केल्या आहेत. यामुळे संचारबंदीच्या काळात कौटुंबिक हिंसाचार पुरूषांना चांगलाच महागात पडणार आहे. घटना मोठी असल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाईही होणार आहे.या समितीवर कौटूंबिक हिंसाचार रोखण्यासोबतच गावामध्ये जिवनावश्यक सुविधा पुरविण्याची जबाबदारी  आहे. यासाठी त्यांना तलाठी आणि ग्रामसेवकांशी समन्वय साधावा लागणार आहे. या पुरवठ्यात कुठेही खंड पडणार नाही अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत. गर्भवती महिला, स्तनदामाता तसेच ६ महिने ते ६ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत सर्व सेवांचेही नियंत्रण करावे लागणार आहे.

आदिवासी तसेच दुर्गम भागात लक्ष ठेवण्यावर भरजिल्ह्यातील आदीवासी दुर्गभ भागातील गावांमध्ये जास्तित जास्त लक्ष ठेवण्याच्या सुचना या समितीला करण्यात आल्या आहेत. या समिती संनियंत्रीत करण्याची जबाबदारीही संबंधीत बालविकास प्रकल्प अधिका-यावर राहणार आहे..................गृहमंत्रालयाकडून आलेल्या सुचनानुसार आम्ही जिल्ह्यातील कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांचे आम्ही सर्वेक्षण केले. सुदैवाने अद्याप जिल्ह्यात अशी एकही घटना घडलेली नाही. मात्र, भविष्यात होणा-या अशा घटना थांबविण्यासाठी आम्ही ही समिती स्थापन केली आहे. दोषी पुरूषांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार असल्याने महिलेला होणारा त्रास हा कमी होईल.-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :PuneपुणेFamilyपरिवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसzpजिल्हा परिषद