शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Khed Alandi Vidhan Sabha 2024: पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा; मतदानाची टक्केवारी वाढली, खेड आळंदीत युती की आघाडी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 15:34 IST

खेड आळंदीत दिलीप मोहिते पाटील आणि बाबाजी काळे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार असून १० ते १५ हजारांच्या फरकाने उमेदवार विजयी होणार, जाणकारांचे मत

आळंदी : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार दिलीप मोहिते - पाटील व महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्यात थेट निवडणूक झाली आहे. वास्तविक खेडमध्ये नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात शिवसेना अशीच पारंपरिक लढत पहायला मिळाली. मात्र यावेळी राष्ट्रवादी व शिवसेना पक्षफुटीचा फरक दिसून येत आहे. दरम्यान मोहिते पाटील यांच्या पाठीशी भाजप व शिंदेच्या शिवसेनेची तर बाबाजी काळे यांच्याकडे राष्ट्रवादी शरद पवार गट व काँग्रेसची ताकद उभी राहिल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. तालुक्यात एकूण ६७.७० टक्के मतदान झाले आहे. सन २०१९ च्या तुलनेत यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत ही टक्केवारी काही अंशी वाढली आहे. त्यामुळे वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 एकीकडे महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते-पाटील यांना विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दीड ते दोन महिने अगोदर उमेदवारी जाहीर झाली होती. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन दिलीप मोहिते - पाटील यांनी तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये विकास कामांची उद्घाटने व भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने मतदारांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला. अक्षरशः मोहिते पाटलांनी तालुक्याचा कानाकोपरा पिंजून काढला. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत खेडची जागा कोणत्या पक्षाला जाईल व कोण उमेदवार होईल हे स्पष्ट होत नव्हते. अखेर महाविकास आघाडीकडून अखेरच्या क्षणी शिवसेना (उद्धवसेना) पक्षाचे बाबाजी काळे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे उमेदवार म्हणून कमी वेळेत प्रत्येक गावात पोहोचण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे होते. मात्र काळे यांनी भेटलेल्या कमी दिवसात सहकाऱ्यांच्या साथीने प्रचार यंत्रणा चांगल्या प्रकारे राबविली. कमी वेळात त्यांनी तालुक्याचा दौरा पूर्ण केला.

महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, अमोल मिटकरी, सिनेअभिनेते सयाजी शिंदे व रूपाली चाकणकर यांच्या तर महाविकास आघाडीने शरद पवार, आदित्य ठाकरे व संजय राऊत या पक्षीय नेत्यांच्या जाहीर सभा घेतल्या. या सर्व नेत्यांच्या सभांचा मतदारांवर किती प्रभाव पडतोय हे येत्या शनिवारी (दि.२३) स्पष्ट होईल. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मराठा आंदोलन, मोदी लाटेचा शिवसेनेचे उमेदवार सुरेश गोरे यांना फायदा झाला होता. तर २०१९ तिरंगी लढतीचा दिलीप मोहिते पाटील यांना फायदा झाला होता. मात्र यंदाची निवडणूक दुरंगी झाली आहे. विद्यमान आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. तर विरोधकांनी तालुक्यात गुंडगिरी, हुकुमशाहीचे वातावरण असून ते बदलण्यासाठी आमदार बदला असे वातावरण केले होते. यंदा खेड-आळंदी मतदारसंघात २ लाख ५८ हजार २१० मतदान झाले आहे. चाकण, आळंदी व राजगुरूनगर या शहरातील मतदान निर्णायक ठरणार आहे. किमान १ लाख ३० हजार मते निवडून येण्यास पुरेशी ठरणार आहेत. आता यामध्ये बाजी कोण मारणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

१० ते १५ हजार मते निर्णायक

आमदार दिलीप मोहिते - पाटील यांच्याकडे हक्काचे वैयक्तिक ७५ ते ८० हजार मतांचे पॉकेट निश्चित मानले जाते. भाजपा व शिंदेसेना त्यांच्या सोबत असल्याने महायुतीची ताकद वाढली. तर बाबाजी काळे यांच्याकडे त्याच्या जिल्हा परिषद गटातील हक्काचा वाेटर आहे. या व्यतिरिक्त जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेऊन काळे यांना पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीला चांगले बळ प्राप्त झाले. तरीसुद्धा विजयाचा फरक हा १० ते १५ हजारांत असेल असे काही जाणकारांचे मत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४khed-alandi-acखेड आळंदीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीPoliticsराजकारण