शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

अजित पवारांसोबत बैठक, तात्काळ निर्णयही झाला; रोहित पवारांनी मानले आभार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 11:20 IST

बैठकीत घेतलेल्या निर्णयाबद्दल रोहित पवार यांनी अजित पवारांचे आभार मानले आहेत.

Ajit Pawar Rohit Pawar ( Marathi News ) :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पवार कुटुंबातही उभी फूट पडली असून राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध शरद पवार असा राजकीय सामना पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांत जोरदार आरोप-प्रत्यारोपही रंगत आहेत. अशातच आज अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र कालवा सल्लागार समितीची पाणीविषयक ही बैठक होती. या बैठकीविषयी रोहित पवार यांनी आपल्या एक्स हँडवरून माहिती दिली आहे.

बैठकीत घेतलेल्या निर्णयाबद्दल रोहित पवार यांनी अजित पवारांचे आभारही मानले आहेत. "सध्याची दुष्काळसदृष्य परिस्थिती पाहता कुकडी प्रकल्पातून १ मार्चपासून पाणी सोडण्याच्या पाठपुराव्याला यश आले असून उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कुकडी प्रकल्पातून १ मार्च रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळं कर्जत तालुक्यातील ५४ गावांच्या शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची अडचण दूर होण्यास मदत होणार आहे. या निर्णयाबाबत अजितदादा यांचे माझ्या मतदारसंघाच्यावतीने आभार," असं रोहित पवार म्हणाले.

"हे आवर्तन ४० दिवसांपेक्षा कमी असणार नाही… अन्यथा सर्व गावांना पाणी पोचणार नाही आणि लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल, हेही या बैठकीत निदर्शनास आणून दिलं. तसंच घोड प्रकल्पातूनही १ मार्च रोजी पाणी सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शिवाय भीमा नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी एप्रिलमध्ये भीमा नदीतून पाणी सोडण्यात येणार आहे. सीना धरणातही कुकडीचं पाणी सोडण्याचा मुद्दा यावेळी बैठकीत उपस्थित केला," अशी माहिती रोहित पवारांनी दिली आहे.

सुप्रिया सुळेंनी बैठकीत कोणती मागणी केली?

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यादेखील कालवा समितीच्या बैठकीला हजर होत्या. या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी विविध मागण्या केल्या आहेत. "बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यात यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे. पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी चारा यांची नितांत गरज आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने शहरी भागांनाही पिण्याच्या पाण्याची टंचाईची झळ बसू लागली आहे. याखेरीज शेतीसाठीही अपुरे पाणी आहे. जनाई शिरसाई पाणी योजनेच्या पाण्याचे देखील योग्य नियोजन आवशयक असून त्या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळणे आवश्यक आहे. शासनाने दुष्काळ निवारण्याच्या कामाला प्राधान्य देऊन पुण्याचे योग्य नियोजन करावे व जनतेला आधार द्यावा. अद्याप तीव्र उन्हाळा सुरु व्हायचा आहे तोवरच अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. यामध्ये दुर्गम भागातील गावांचा समावेश आहे. या गावांचा प्राधान्याने विचार करुन त्यांना पाणी पोहोचविण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्या. बहुतांश  गावांमध्ये पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. पशुधन जगविण्यासाठी  चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर्स यांची प्रकर्षाने गरज आहे. शासनाने तातडीने याबाबत योग्य ते नियोजन आणि उपाय करावे. शासनाने या स्थितीचा आढावा घेऊन याबाबतही योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला द्याव्यात," अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांकडे केली आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणे