शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू; आरोपी पळण्याच्या घटनेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 15:01 IST

महाराष्ट्रात पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालात दिसून येत आहे़. तर आरोपी पळून जाण्याच्या घटनेमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे़.

ठळक मुद्दे२०१६ मध्ये देशभरात पोलीस कोठडीतील मृत्यूच्या ६० घटनाउत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक आरोपी पळून जाण्याचे प्रमाण, २८२ घटनांमध्ये ३२७ आरोपी गेले पळून

पुणे : पोलिसांच्या मारहाणीत सांगली येथील अनिकेत कोथळे याची हत्या प्रकरण ताजे असताना महाराष्ट्रात पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होत असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालात दिसून येत आहे़ त्याचबरोबर पोलिसांच्या ताब्यात आरोपी पळून जाण्याच्या घटनेमध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे़ २०१६ मध्ये देशभरात पोलीस कोठडीतील मृत्यूच्या ६० घटना घडल्या़ त्यात एकट्या महाराष्ट्रात १२ घटना झाल्या होत्या़ त्या खालोखाल गुजरातमध्ये ९, मध्यप्रदेशमध्ये ५ पोलीस कोठडीत मृत्यू झाले होते़ महाराष्ट्रातील १२ घटनांपैकी ८ घटनांमध्ये आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे़ आरोपीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात नेताना अथवा पोलीस कोठडीत ठेवले असताना पळून जाण्याच्या घटनांमध्ये देशात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो़ सर्वाधिक आरोपी पळून जाण्याचे प्रमाण उत्तर प्रदेशमध्ये असून तेथे २८२ घटनांमध्ये ३२७ आरोपी पळून गेले होते़ त्यापाठोपाठ मध्य प्रदेशमध्ये १११ घटनांमध्ये १३३ आरोपी पळाले होते़ त्यानंतर महाराष्ट्रात ९८ घटनांमध्ये ११८ आरोपी पळून गेले होते़ यामध्ये २१ आरोपी पोलीस लॉकअ‍ॅपमधून पळून गेले होते तर त्याव्यतिरिक्त ९७ आरोपी इतर ठिकाणाहून पळून गेले होते़ लॉकअ‍ॅपमधून पळून गेलेल्या सर्वांना पकडण्यात पोलिसांना यश आले तर, इतरांपैकी ७३ जणांना परत अटक करण्यात पोलीस यशस्वी झाले होते़ 

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र