शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आत्महत्या केलेल्या नवविवाहितेवर सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 17:39 IST

शिर्सूफळ  येथील घटना : अवघ्या महिनाभरापूर्वीच झाला होता विवाह..

ठळक मुद्देसंतप्त माहेरच्यांनी घर पेटवत पती, सासू, नणंन यांना केला जिवंत जाळण्याचा प्रयत्न. 

सांगवी : अवघ्या महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या नवविवाहितेने सासरच्या छळास कंटाळून किटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे.  शिर्सूफळ (ता.बारामती) येथे ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. २०) घडली. कोमल सचिन आटोळे (वय २३) असे या दुर्दैवी तरूणीचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी कोमलचे अंत्यसंस्कार पतीच्या बंगल्यासमोर केले. तसेच सासरचे घर पेटवून देत पती, सासू, नणंन यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराबाबत  बारामती तालुका पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.सासू बकुळाबाई कोंडीराम आटोळे, पती सचिन कोंडीराम आटोळे (दोघे रा. शिर्सूफळ, ता. बारामती), नणंन नंदाबाई नवनाथ शिंगाडे (रा. शेळगाव, ता. इंदापूर) यांच्यावर आत्महत्येप्रकरणी तर कोमलचे वडील  प्रकाश जयसिंग गावडे,  आई मंगल प्रकाश गावडे, भाऊ सागर प्रकाश गावडे, विशाल हरिभाऊ गावडे, विकास हरिभाऊ गावडे, सागर गावडे, संतोष गावडे (सर्व रा. पारवडी, ता. बारामती) यांच्यावर  घर पेटवून दिल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे  दाखल करण्यात आले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अवघ्या महिनाभरापूर्वीच विवाह झालेल्या कोेमल हिचा बकुळाबाई कोंडीराम आटोळे, सचिन कोंडीराम आटोळे, नंदाबाई नवनाथ शिंगाडे, यांनी लग्न झाल्यानंतर  वेळोवेळी टीव्ही, सोन्याची अंगठी, मोबाइलची मागणी करून नंतर  कारसाठी माहेरून दीड लाख रूपयांची मागणी केली. या कारणावरून कोमलचा वारंवार शारीरिक मानसिक त्रास दिला.  या  छळास कंटाळून  शनिवारी (दि.२०) कोमलने कीटकनाशक पिले.  रविवारी (दि. २१) पहाटे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर कोमलच्या सासरच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी (दि.२१)  रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या  सुमारास  शिर्सुफळ  येथे फिर्यादी आटोळे यांची पत्नी कोमल हिने घरात खोकल्याचे औषध समजून कीटकनाशक औषध पिल्याने उपचारासाठी तीला बारामती येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान रविवारी पहाटे पाऊणेपाच वाजण्याच्या  सुमारास कोमलचा मृत झाला. त्यानंतर  रुई ग्रामीण रुग्णालयात तीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह माहेरच्या व्यक्तींना देण्यात आला.  त्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी  शिर्सूफळ  येथे घेऊन गेल्यानंतर  प्रकाश जयसिंग गावडे, मंगल प्रकाश गावडे, सागर प्रकाश गावडे, विशाल हरिभाऊ गावडे, विकास हरिभाऊ गावडे, सागर गावडे,संतोष गावडे व इतर अज्ञात २० ते २५ ते इसमानी फिर्यादी आटोळे  यांना तुम्हीच मुलगी मारली म्हणून शिवीगाळ करून  कोमलच्या मृतदेहावर आटोळी यांच्या राहत्या बंगल्याच्या आवारातच अंत्यसंस्कार केले. त्यानंतर कोमलच्या माहेरच्या लोकांनी आटोळे यांच्या  घरात  घुसून घरातील संपूर्ण सामान जाळण्यास सुरुवात केली.  आटोळे कुटुंबीयांच्या अंगावर जाऊन त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्या पासून स्वत:ला वाचवत आटोळी कुटुंबीय घरातून पळून गेले. यानंतर गावडे कुटुंबीयांनी आटोळे यांचे संपूर्ण घर पेटवीले. या घटनेत  घरातील संपूर्ण सामान,  रोख रक्कम, व  सोन्याचांदीचे दागिने असे मिळून सुमारे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे, असे कोमलचा पती सचिन आटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक बाळासो जाधव हे अधिक तपास करीत आहेत. ——————————— 

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाDeathमृत्यू