शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
5
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
6
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
8
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
9
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
10
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
11
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
12
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
13
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
14
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
15
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
16
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
17
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
18
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
19
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
20
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशीही बारामती बाजार समिती बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 23:35 IST

व्यापाऱ्यांची भूमिका : बैठक निष्फळ, अजित पवार यांच्याशी चर्चेनंतर निर्णय घेणार

बारामती : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाºयांनी संस्थेच्या सचिवांच्या विरोधात मनमानी कारभार केल्याचा आरोप करीत गेल्या दोन दिवसांपासून कडकडीत बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर बाजार समितीने व्यापारी आणि व्यवस्थापनासमवेत सोमवारी (दि. ७) बैठक घेतली. मात्र, यामध्येदेखील तोडगा निघू शकला नाही. व्यापाºयांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच संपाबाबत निर्णय घेण्याची भूमिका जाहीर केली आहे. बाजार समिती व्यवस्थापन आणि व्यापाºयांच्या वादात सोमवारी (दि. ७) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उडी घेतली. व्यापाºयांनी संप मागे न घेतल्यास सहायक निबंधकांकडे तक्रार करून त्यांचे परवाने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

येथील व्यापारी आणि बाजार समितीचे संचालक प्रताप सातव यांच्या विरोधात बाजार समितीने अतिक्रमण केल्याची नोटीस बजावली आहे. त्या विरुद्ध व्यापाºयांनी ५ जानेवारीपासून कडकडीत बंद पाळला होता. सोमवारी झालेल्या बैठकीत सभासद, संचालक यांच्यात एकमेकांवर जोरदार आरोप- प्रत्यारोप झाले. या वेळी व्यापारी अमोल दोशी व्यापाºयांची बाजू मांडताना म्हणाले की, संचालक आक्रमकपणे उत्तर देत आहेत. एखाद्या संचालकाविरुद्ध तक्रारी अर्ज आल्यास त्याला त्याबद्दल कळविण्यास ४० दिवस एवढा कालावधी का लागला, ते प्रताप सातव आहेत म्हणून एवढा कालावधी का, असा सवालदेखील त्यांनी केला. व्यापारी शेतकºयांना त्रास व्हावा हा आमचा हेतू नाही. शेतकºयांच्या जिवावर आमचे पोट आहे. बºयाच वेळेला आम्ही व्यापारी सरकारी नियम डावलून शेतकºयांना मदत करतो, असे दोशी म्हणाले.

यावेळी बैठकीत संचालक मंडळाकडून व्यापाºयांना हा संप मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. पण व्यापाºयांनी आपल्या मतावर ठाम राहत बंद मागे घेण्यास नकार दिला. या वेळी सहायक निबंधक एस. एस. कुंभार उपस्थित होते. बंद मागे न घेतल्यास व्यापाºयांवर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. शासन नियुक्त संचालक पोपट खैरे यांनी, अजित पवार यांच्या सांगण्यामुळे संचालकाला पाठीशी घातले असल्याचा आरोप केला. या संचालकला पाठीशी घातले जात असल्यास आणि प्रत्येक गोष्ट नेत्यांना विचारायची, मग हे सभागृह अकार्यक्षम आहे काय,असा सवालदेखील खैरे यांनी केला. त्याच प्रमाणे ‘त्या’ संचालकांचा राजीनामा घ्या, अशी मागणी केली....व्यापाºयांचा परवाना रद्द करण्यात येईलगेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बंदबाबत बाजार समिती व्यवस्थापनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी (दि. ७) सकाळी बाजार समिती पूर्ववत चालू न केल्यास बाजार समिती कायदा ८ चा ‘क’ कायद्यांतर्गत व्यापाºयांचे परवाना रद्द करण्यात येतील, अशा नोटीस बजावण्यात येणार असल्याचा इशारा बाजार समितीचे सभापती अनिल हिवरकर यांनी दिला आहे.... अजित पवार यांनी कान पिळण्याची गरजबारामती शहर तालुक्यात माळेगाव कारखाना वगळता सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. या सर्व संस्थांमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा शब्द अंतिम मानला जातो. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नगरसेवकांमधील गटबाजीचा प्रत्यय आला. नगराध्यक्षांसमवेत विरोधी नगरसेवकांसह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची देखील खडाजंगी झाली. विरोधकांपेक्षा पक्षातीलच नगरसेवकांकडून वारंवार विरोध होत असल्याच्या भावनेतून नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी राजीनाम्याचा घेतलेला पवित्रा पक्षातील अंतर्गत गटबाजी अधोरेखित करणारा ठरला. त्यापाठोपाठ बाजार समितीमध्ये देखील सुरू झालेला बंद शेतकºयांसाठी गैरसोयीचा ठरला आहे. त्यामुळे बाजार समिती व्यवस्थापन आणि व्यापाºयांनी बंद पाळण्यापूर्वी सामोपचाराने मार्ग काढणे गरजेचे होते. मात्र, सामोपचाराने वाद न मिटता थेट घेतलेल्या ‘बंद’च्या भूमिकेमुळे गेल्या ३ दिवसांपासून शेतकºयांची गैरसोय झाली. यामध्ये नगर परिषदेसह बाजार समितीमधील दोषींचे पवार यांनी कान पिळण्याची गरज आहे. मंगळवारी (दि. ८) बारामती शहरात आहेत. पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे....अजित पवार यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम४बाजार समितीच्या व्यापाºयांशी चर्चा केली असता, आमचे म्हणणेच बैठकीत एकूण घेतले नाही. सगळे सगळ्या संघटना व्यापारी, हमाल, मापाडी, टेम्पो संघटना, कष्टकरी, सचिवांच्या विरोधात आहेत. आम्ही उद्या अजित पवार यांच्याशी चर्चा करून बंदविषयी निर्णय घेऊ. अजित पवार यांचा निर्णय आमच्यासाठी अंतिम राहील, असे व्यापाºयांनी ‘लोकमत’शीबोलताना सांगितले....गाडीचे भाडे द्यायलादेखील माझ्याकडे पैसे नाहीतसोमवारी (दि. ७) बाजार समितीमध्ये रामभाऊ वाघमोडे या मालेगावच्या शेतकºयाने १० पोती गहू बाजारात विक्रीसाठी आणला होता. पण, बाजार समितीच्या व्यापाºयांनी बंद पुकारल्याने माझी पैशाची अडचण झाली. तसेच गाडीचे भाडे द्यायला देखील आता माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितले. मला देणेकºयांचा तगादा आहे मी बँंकेतून पैसे काढावे एवढ्या विश्वासाने आलो होतो. पण बाजार समिती बंद बघून मला काय करावे हेच कळेना, अशी व्यथा शेतकºयाने मांडली....व्यापाºयांचीमुजोरी चालली आहेव्यापारी व संचालक यांची बैठक चालू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण आणि अन्य काहीजण येथे आले. त्यानंतर बैठकीत अजून गोंधळ वाढला. या वेळी ढवाण यांनी बंदबाबत नाराजी व्यक्त केली. ढवाण म्हणाले, की व्यापाºयांची मुजोरी चालली आहे. शेतकरी संघटना मुजोरी उतरवू शकते. हे वागणे बरे नव्हे. एवढ्याशा कारणावरून तुम्ही बंद ठेवून शेतकºयांना वेठीस धरत आहात. शेतकरी आपला माल कोठे विकणार, त्यांच्या गरज कशा भागणार,असा सवाल ढवाणयांनी केला.

टॅग्स :Puneपुणे