शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

भाजीपाल्यांच्या क्रेटसमधून येतोय गांजा; कस्टमने पकडला ६३ लाखांचा गांजा

By विवेक भुसे | Updated: November 8, 2023 20:22 IST

ट्रकमध्ये भाजीपाल्याचे क्रेटस लावून त्याच्याखाली पोत्यांमध्ये भरुन लपवून गांजा आणला जात होता

पुणे : आंध्र प्रदेशातून गांजाची तस्करीचा प्रकार केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) उघडकीस आणला. सोलापूर जिल्ह्यातील कुडुर्वाडी परिसरात कस्टमच्या पथकाने गांजा वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकासह दोघांना पकडले. त्यांच्याकडून ६३ लाखांचा २११ किलो गांजा जप्त करण्यात आला. ट्रकमध्ये भाजीपाल्याचे क्रेटस लावून त्याच्याखाली पोत्यांमध्ये भरुन लपवून गांजा आणला जात होता.

आंध्र प्रदेशातील आरकू भागातून मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रीस पाठविण्यात आल्याची कस्टमच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर कस्टमच्या पुणे कार्यालयातील पथकाने सोलापूर परिसरातील कुर्डुवाडी परिसरात सापळा लावला. पुणे-सोलापूर महामार्गावर बोरमणी गावाजावळ गांजा वाहतूक करणाऱ्या ट्रकला थांबविण्याची सूचना दिली. कस्टमच्या पथकाने ट्रकची तपासणी केली. तेव्हा ट्रकच्या आतील भागात ठेवलेल्या प्लास्टिक जाळीत (क्रेट्स) गांजा ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले. कस्टमच्या पथकाने २११ किलो गांजा जप्त केला. जप्त केलेल्या गांजासह ट्रक असा ९३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी ट्रकचालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. कस्टमच्या पुणे कार्यालयातील अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक अभिषेक सिंग, अधीक्षक सुशांत त्यागी, निरीक्षक विनोद कुमार, रजत कुमार, जितेंद्र मीना, आशिष आवटी, विराज ढोकले आदींनी ही कारवाई केली. 

टॅग्स :PuneपुणेDrugsअमली पदार्थvegetableभाज्याPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी