शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Maratha Reservation: मुंबईतील उपोषणासाठी बारामतीतून दीड हजार वाहने येणार, मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 15:28 IST

मनोज जरांगे पाटील करीत असलेल्या आमरण उपोषणासाठी त्यांना साथ देण्यासाठी बारामती तालुक्यातील प्रत्येक गावातून वाडी वस्तीवरून दहा ते बारा चार चाकी वाहने व सामानासाठी एक ट्रॅक्टर किंवा एक टेम्पो अशी प्रत्येक गावाची एक तयारी सुरु आहे....

बारामती (पुणे): २६ जानेवारी रोजी मुंबई येथील मराठाआरक्षणासाठी सुरू होणाऱ्या आमरण उपोषणासंदर्भात मराठा क्रांती मोर्चा बारामतीची तयारी करण्यात आली आहे. बारामती येथील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (दि. १९) येथील जिजाऊ भवन येथे आयोजित पत्रकार परीषदेत माहिती देण्यात आली. शुक्रवारी (दि.२६) आझाद मैदान मुंबई येथे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकरिता आमरण उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे पाटील करीत असलेल्या आमरण उपोषणासाठी त्यांना साथ देण्यासाठी बारामती तालुक्यातील प्रत्येक गावातून वाडी वस्तीवरून दहा ते बारा चार चाकी वाहने व सामानासाठी एक ट्रॅक्टर किंवा एक टेम्पो अशी प्रत्येक गावाची एक तयारी सुरु आहे.

बारामती तालुक्यातून एकूण एक ते दीड हजार चार चाकी वाहने निघणार आहेत. या पार्श्वभुमीवर येथील मराठा क्रांती मोर्चा बारामती यांच्या वतीने संपूर्ण बारामती तालुक्यातील समाजास जाहीर आवाहन करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकरिता होणाऱ्या आमरण उपोषणासाठी त्यांना साथ देण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातून निघणारी वाहने बुधवारी( दि.२४) सकाळी सात वाजता कसबा शिवाजी उद्यान येथून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोरगावच्या दिशेने निघतील. मोरगाव मध्ये आजूबाजूच्या गावातील समाजबांधव सकाळी आठ वाजता एकत्र जमतील. त्यानंतर सर्व समाज बांधव पुण्याच्या दिशेने देहूरोड येथे पोहोचणार आहेत.

आंदोलनासाठी येणाऱ्या बारामती तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या जेवणाची सर्व व्यवस्था ही मराठा क्रांती मोर्चा, बारामती यांच्या वतीने करण्यात येणार आहे. आंदोलन हे मनोज जरांगे पाटील यांचे सूचनेप्रमाणे होणार असून ते शांततेच्या मार्गानेच होणार आहे. आंदोलनासाठी येणार समाजबांधव जरांगे पाटील यांच्या आदेशाशिवाय आंदोलन ठिकाणापासून परत येणार नाहीत. आंदोलनाला निघाल्यापासून परत येईपर्यंत कोणीही कोणत्याही अफवांना बळी पडू नये. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील स्वतः एखादी गोष्ट स्वतःच्या तोंडाने सांगत नाहीत. तोपर्यंत कोणीही कुठल्याही निष्कर्षाला येवू नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :marathaमराठाreservationआरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण