शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कळसकर व अंदुरेसारखे ब्रेनवॉश केलेले अनेक तरुण समाजात : राधाकृष्ण विखे-पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 18:12 IST

आपण कोणत्या हिंदुत्वाची व्याख्या करतोय. सनातनच्या समर्थनासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला, मग दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश हिंदुच होते ना...

ठळक मुद्देसनातनवर बंदी घालण्यासाठी पुढाकार घ्यायला हवासरकारने कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला सोशल मीडियाचा चांगला . सरकार कोणाचेही असो माध्यमांमधून वास्तव मांडले जाणे गरजेचे

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचे ब्रेनवॉश करण्यात आले होते. त्यांच्यासारखे अनेक तरुण सध्या समाजात आहेत. सनातनसारख्या कट्टरतावादी संस्थांच्या वाढत्या कारवाया घातक असून त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी व्यक्त केले.        पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कै. वि. श्री. जोगळेकर शोधनिबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण विखे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळे ते बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र बडदे, कार्यवाहक विठ्ठल जाधव, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, माजी आमदार मोहन जोशी, परीक्षक प्रा. प्रकाश पवार, अ‍ॅड. अभय छाजेड, पालिकेतील गटनेते आरविंद शिंदे, गोपाळ तिवारी, सदानंद शेट्टी आदी यावेळी उपस्थित होते.      विखे म्हणाले, आपण कोणत्या हिंदुत्वाची व्याख्या करतोय. सनातनच्या समर्थनासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला, मग दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश हिंदुच होते ना. सनातनी प्रवृत्ती असलेल्या संस्थांनी आंदोलने केले. त्यातून अंदुरे व कळसकर घडले आहेत. त्यामुळे या संघटनेला ठेचून काढले पाहिजे. मात्र त्यासाठी सरकारची इच्छा शक्ती दिसत नाही. एटीएसने डॉ. दाभोलकर हत्येतील आरोपींना पकडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे अभिनंदन देखील केले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री या संघटनांना पाठीशी घालत आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.      राज्यातील सध्यस्थितीबाबत विखे-पाटील म्हणाले की, पुरेसा पाऊस न झाल्याने राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे  शेती हा विषय राजकीय नाही तर संशोधनात्मक दृष्टीकोनातून मांडला पाहिजे. कृषी विद्यापीठांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याने सर्वसामान्य शेतक-यांपर्यंत काहीच पोहचले नाही. पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री असे सर्वच शेतक-यांविषयी बोलतात. मात्र, शेतक-यांसाठी आवश्यक असलेल्या कृती होताना दिसत नाहीत. चुकीचे निकष काढून कर्जमाफी करण्यात आली. मराठा आदोलन फोडण्यात सरकारला यश आले आहे.      चंद्रकांत पाटील सर्वार्थाने दादा सगळ्याच गोष्टींसाठी चंद्रकांत पाटील यांना पाठविले जाते. त्यांना देखील पुढे याचा फायदा होणार याची माहिती असल्याने ते पुढे येतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे सर्वार्थाने दादा आहेत. सरकारने कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला सोशल मीडियाचा चांगला प्रभाव पडला आहे, असे विखे-पाटील म्हणाले.  पत्रकार संरक्षणाचा मुद्दा मांडणार     पत्रकारांचा आवाज दाबण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. त्यामुळे पत्रकारांना सर्व बाजूंनी संरक्षण आणि सुरक्षिततेचा मुद्दा मी आगामी अधिवेशनात मांडणार असून यासंबंधीचा अहवाल त्वरीत केंद्राला पाठवावा, यासाठी आग्रही राहणार आहे. कितीही इतर माध्यमे आली तरी प्रिंट मीडियाचे महत्त्व कायम राहणार आहे. सरकार कोणाचेही असो माध्यमांमधून वास्तव मांडले जाणे गरजेचे आहे, असे विखे-पाटील म्हणाले. ................

टॅग्स :PuneपुणेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाGovernmentसरकारcongressकाँग्रेस