शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

भाजप-शिवसेनेची अनेक वर्षांची दोस्ती दुष्मनीत बदलली; मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार-रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 18:49 IST

महाराष्ट्रातील राजकारणात आरोप - प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे

पुणे : महाराष्ट्रातील राजकारणात आरोप - प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. सर्वच पक्षांचे नेते अत्यंत चुकीच्या पद्धतीने एकमेकांवर बिनबुडाच्या टीकाही करू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं आहे. भाजपा-शिवसेनेची अनेक वर्षांची दोस्ती आता दुष्मनीत बदलली असून त्यातून मार्ग काढला पाहिजे. असं त्यांनी सांगितलं आहे. रामदास आठवले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलले आहेत.

आठवले म्हणाले, महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची खूप वर्षांची दोस्ती आता दुष्मनीत बदलली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. दोन्ही पक्षातील वाद मिटावा यासाठी प्रयत्न करणार आहे. भाजप -शिवसेना एकत्र येऊन दोन्ही पक्षांनी राज्याचा विकास साधला पाहिजे.

राऊत यांनी योग्य भाषा वापरावी 

महाराष्ट्रात माजी खासदार किरीट सोमय्या व खासदार संजय राऊत यांच्यात सध्या आरोप - प्रत्यारोप सुरू आहेत. माजी खासदार सोमय्या यांच्याविषयी बोलताना खासदार राऊत अत्यंत चुकीची भाषा वापरली. खासदार राऊत यांच्या भाषेवरून आक्षेप घेतले जात असताना यावर केंद्रीय मंत्री आठवले यांनी भूमिका मांडली आहे. टीका करताना खासदार संजय राऊत यांनी योग्य भाषा वापरावी, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.

पुणे महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला २५ जागा मिळाव्यात

उत्तरप्रदेशासह देशातील पाच राज्यात सध्या निवडणुका सुरू आहेत. या पाचही राज्यात भाजपाबरोबर आम्ही आहोत. या सर्व ठिकाणी भाजपा सत्तेत येणार आहे.  पुणे महापालिकेची निवडणूक रिपब्लिकन पक्ष भाजपासोबत लढणार आहे. या निवडणुकीत आमच्या पक्षाला किमान २५ जागा मिळाव्यात अशी मागणी आठवले यांनी केली आहे. तर आम्ही महापालिका एकत्र लढू आणि जिंकून येऊ असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे