शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

'ओठांवरची लिपस्टीकच जाते, तर कुणाला घामच येतो' पुणेकरांची मास्क न घालण्याची कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 14:27 IST

पोलिसांच्या कारवाईच्या धास्तीमुळे ‘मास्क’ ला केवळ खिशात ठेवण्यापुरतेच महत्व उरले आहे

पुणे : कोरोना रूग्णांची घटलेली संख्या आणि लसीचे दोन डोस झाल्यामुळे बिनधास्त झालेल्या पुणेकरांच्या चेह-यावरून  ‘मास्क’ च हटला आहे. पोलिसांच्या कारवाईच्या धास्तीमुळे  ‘मास्क’ ला केवळ खिशात ठेवण्यापुरतेच महत्व उरले आहे. ’मास्क’ कुठंय? असं विचारले तर कारणही तितकीच गंमतीशीर दिली जात आहेत.

काय तर म्हणे, मास्क घातल्यामुळे थुंकताच येत नाही..ओठांवरची लिपस्टीकच जाते. ड्रेसवर मँचिंग मास्कच मिळत नाहीत..तर कुणी म्हणतं मला तर मास्क घातल्याने मायग्रेनचा त्रासच होतो..तर कुणाला काय तर घाम येतो....ही कारणे पाहाता आणि कोरोनाची ओसरलेली दुसरी लाट पाहाता पोलिसांनीही मास्कची कारवाई काही प्रमाणात शिथिल केली आहे.

गतवर्षी कोरोनाचा झालेला उद्रेक पाहाता ‘मास्क’ हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा जणू अविभाज्य घटक बनला. अगदी दूध, भाजीपाला आणायला जातानाही मास्क घालणे लोकांंसाठी अनिवार्य बनले. इतकी कोरोनाची पुणेकरांनी धास्ती घेतल्याचे दिसून आले. बघता बघता ‘मास्क’ची बाजारपेठच उभी राहिली. साड्या, ड्रेस, वर मँचिंग मास्कला पसंती दिली जाऊ लागली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता दुचाकी आणि चारचाकीमध्ये मास्क न घालणा-यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा देखील उगारण्यास सुरूवात केली. मात्र, आज शहरात नेमके उलटे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर आणि मृत्यूचा आकडा घटल्याने पुणेकरांनी मास्कलाच रामराम ठोकला असल्याचे दिसत आहेत. गर्दीच्या ठिकाणीही पुणेकर मास्कविनाच फिरत आहेत.  

मॉल, चित्रपटगृहे , हॉटेल्स आदी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य असे जरी लिहिले असले तरी मास्क खिशात किंवा पर्समध्येच दाखविण्यापुरते त्याचे महत्व उरले आहे. अगदी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले देखील विनामास्कच बाहेर पडताना दिसत आहेत. पोलिसांनीही मास्कची कारवाई शिथिल केल्याने पुणेकरांचे अधिकच फावले आहे. कोरोना घटला ही सकारात्मक बाब असली तरी तो संपलेला नाही त्यामुळे पुणेकरांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अन्यथा कोरोनाच्या तिस-या लाटेला निमंत्रण मिळू शकते.

’मास्क’’ची खरेदीही थंडावली

घराबाहेर पडताना  ‘मास्क’ हवाच अशी मानसिकता बनलेल्या पुणेकरांनी मास्कलाच आयुष्यातून जवळपास हददपार केले आहे. पुणेकरांची  ‘मास्क’ ची खरेदी थंडावली असून, बाजारातून मास्कही जवळपास गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 आता ’मास्क’ची काय गरज?

''दीड वर्षे कसे तरी मास्क घातले. अगदी कुणाकडे सणासमारंभाला जातानाही  ‘मास्क’ घालणे अनिवार्य बनले होते. पण आता लसीचे दोन डोस झाले आहेत. मग मास्कची गरजच काय? मास्क घातले की मेकअप बिघडतो आणि लिपस्टीकही निघून जाते असे तरुणी अमृता देशपांडे हिने सांगितले.''

मास्क जास्तवेळ घातला तर गुदमरायला होते

''मला दम्याचा त्रास असल्याने मास्क अधिक वेळ घालू शकत नाही. मास्क जास्तवेळ घातला तर गुदमरायला होते. त्यामुळे घराबाहेर पडताना क्वचितच मास्कच घालतो असे ज्येष्ठ नागरिक सुधीर म्हस्के यांनी संगीतले.'' 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिकPoliceपोलिस