शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'ओठांवरची लिपस्टीकच जाते, तर कुणाला घामच येतो' पुणेकरांची मास्क न घालण्याची कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 14:27 IST

पोलिसांच्या कारवाईच्या धास्तीमुळे ‘मास्क’ ला केवळ खिशात ठेवण्यापुरतेच महत्व उरले आहे

पुणे : कोरोना रूग्णांची घटलेली संख्या आणि लसीचे दोन डोस झाल्यामुळे बिनधास्त झालेल्या पुणेकरांच्या चेह-यावरून  ‘मास्क’ च हटला आहे. पोलिसांच्या कारवाईच्या धास्तीमुळे  ‘मास्क’ ला केवळ खिशात ठेवण्यापुरतेच महत्व उरले आहे. ’मास्क’ कुठंय? असं विचारले तर कारणही तितकीच गंमतीशीर दिली जात आहेत.

काय तर म्हणे, मास्क घातल्यामुळे थुंकताच येत नाही..ओठांवरची लिपस्टीकच जाते. ड्रेसवर मँचिंग मास्कच मिळत नाहीत..तर कुणी म्हणतं मला तर मास्क घातल्याने मायग्रेनचा त्रासच होतो..तर कुणाला काय तर घाम येतो....ही कारणे पाहाता आणि कोरोनाची ओसरलेली दुसरी लाट पाहाता पोलिसांनीही मास्कची कारवाई काही प्रमाणात शिथिल केली आहे.

गतवर्षी कोरोनाचा झालेला उद्रेक पाहाता ‘मास्क’ हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा जणू अविभाज्य घटक बनला. अगदी दूध, भाजीपाला आणायला जातानाही मास्क घालणे लोकांंसाठी अनिवार्य बनले. इतकी कोरोनाची पुणेकरांनी धास्ती घेतल्याचे दिसून आले. बघता बघता ‘मास्क’ची बाजारपेठच उभी राहिली. साड्या, ड्रेस, वर मँचिंग मास्कला पसंती दिली जाऊ लागली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता दुचाकी आणि चारचाकीमध्ये मास्क न घालणा-यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा देखील उगारण्यास सुरूवात केली. मात्र, आज शहरात नेमके उलटे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर आणि मृत्यूचा आकडा घटल्याने पुणेकरांनी मास्कलाच रामराम ठोकला असल्याचे दिसत आहेत. गर्दीच्या ठिकाणीही पुणेकर मास्कविनाच फिरत आहेत.  

मॉल, चित्रपटगृहे , हॉटेल्स आदी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे अनिवार्य असे जरी लिहिले असले तरी मास्क खिशात किंवा पर्समध्येच दाखविण्यापुरते त्याचे महत्व उरले आहे. अगदी ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले देखील विनामास्कच बाहेर पडताना दिसत आहेत. पोलिसांनीही मास्कची कारवाई शिथिल केल्याने पुणेकरांचे अधिकच फावले आहे. कोरोना घटला ही सकारात्मक बाब असली तरी तो संपलेला नाही त्यामुळे पुणेकरांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे अन्यथा कोरोनाच्या तिस-या लाटेला निमंत्रण मिळू शकते.

’मास्क’’ची खरेदीही थंडावली

घराबाहेर पडताना  ‘मास्क’ हवाच अशी मानसिकता बनलेल्या पुणेकरांनी मास्कलाच आयुष्यातून जवळपास हददपार केले आहे. पुणेकरांची  ‘मास्क’ ची खरेदी थंडावली असून, बाजारातून मास्कही जवळपास गायब झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 आता ’मास्क’ची काय गरज?

''दीड वर्षे कसे तरी मास्क घातले. अगदी कुणाकडे सणासमारंभाला जातानाही  ‘मास्क’ घालणे अनिवार्य बनले होते. पण आता लसीचे दोन डोस झाले आहेत. मग मास्कची गरजच काय? मास्क घातले की मेकअप बिघडतो आणि लिपस्टीकही निघून जाते असे तरुणी अमृता देशपांडे हिने सांगितले.''

मास्क जास्तवेळ घातला तर गुदमरायला होते

''मला दम्याचा त्रास असल्याने मास्क अधिक वेळ घालू शकत नाही. मास्क जास्तवेळ घातला तर गुदमरायला होते. त्यामुळे घराबाहेर पडताना क्वचितच मास्कच घालतो असे ज्येष्ठ नागरिक सुधीर म्हस्के यांनी संगीतले.'' 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिकPoliceपोलिस