शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

कित्येक सरकारं आली अन् गेली, आमदार, खासदारकीसह कुणी मंत्रीही झाले; पण इंदापूरचा पाणीप्रश्न ‘जैसे थे'च! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 19:01 IST

२२ गावांना दोन पिढ्यांच्या संघर्षानंतर पदरी पाणीप्रश्नी प्रतीक्षाच... 

सतिश सांगळे - 

कळस:  राज्यात तीस वर्षात अनेक सरकारं आली अन् गेली, बरेच जण खासदार, आमदार आणि मंत्री म्हणून मिरवून गेले. पण इंदापूर तालुक्यातील निरा डावा कालव्यावरील २२ गावांमधील दोन पिढ्यांच्या पदरी संघर्षानंतरही बारमाही पाणी प्रश्नांबाबत लढा देवूनही प्रतीक्षाच आली आहे. गेल्या ३० वर्षांपासून धगधगत असलेल्या या पाणीप्रश्नाला राजकीय पक्षांनी वेगळा रंग दिल्याने या पाणीप्रश्नाचे भिजत घोंगडे कायम राहिले आहे.

निरा डावा कालव्यावरील अंथुर्णे पासुन शेटफळहवेली पर्यंत बावीस गावांच्या शेतीसिंचनाचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी खडकवासला कालव्यावर सणसर जोड बोगदा तयार करण्यात आला .यामधुन निरा डावा कालव्यामध्ये पाणी आणून चारी क्रमांक ४६ ते ५९ मध्ये पाणी आवर्तन देऊन हा बारमाही भाग बागायती करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार निमगाव-केतकी येथे येवून शेतकरी मेळाव्यात प्रचंड जनसमुदाया समोर जाहीर सभेत केली. शेतकऱ्यांना ऊसाची लागण करावी १२ महिन्याला १२ पाळ्या मिळतील, असे आश्वासन दिले गेले.

परंतु, आज तब्बल ३० वर्ष पुर्ण झाली .तरी २२ गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही.१९९५ मध्ये युतीचे शासन सरकार आले .त्यावेळी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी १९९७ मध्ये धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असल्यास २२ गावांतील खातेदारांना एकरी १५ गुंठे असे सुमारे १२५० एकर क्षेत्रास ७ नंबर अर्जावर  पाणी परवानगी बारमाही देण्यास मंजुरी दिली .विधान परिषद समिती सदस्यांच्या पाहणी नंतर कायम स्वरूपी योजना मंजुर करावी,अशी शिफारस झाली.त्यामुळे एकरी १५ गुंठ्याएवजी २० गुंठ्याला ७ नंबर फॉर्मवर पाणी देण्यास मंजुरी आली.

आता राज्याचे विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या प्रश्नासाठी मोठी ताकद लावुन उजनी धरणावरुन ५ टीएमसी पाणी मंजुर केले. मात्र सोलापुर मधील स्वपक्षीय आमदारांच्या दबावामुळे एक महिना होण्याच्या अगोदरच आदेश रद्ध करण्यात आला .त्यामुळे हा प्रश्न भिजत राहणार आहे. या गावातील शेतकऱ्यांना  कायम स्वरूपी बारमाही पाण्याबाबत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

तालुक्यातील अंथुर्णे भरणेवाडी शेळगाव निमसाखर, रेडणी, निमगांव-केतकी, गोतंडी दगडवाडी, घोरपडवाडी, सराफवाडी, निरवांगी, रेडा,रेडणी, काटी, लाखेवाडी, खोरोची, भोडणी  या  गावांतील शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांनी यासाठी संघर्ष केला आहे .मुळच्या अध्यादेशाप्रमाणे ३.९ टीएमसी हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.——————————————खासदार सुप्रिया सुळे या लोकसभेला प्रथमच उभ्या राहिल्यानंतर २२ गावांतील शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेऊन निमगांव-केतकी येथे हक्काच्या बारमाही पाण्यासाठी काही दिवस उपोषण देखील केले होते .मात्र ,आश्वासित केल्याने विरोध मावळला. परंतू, अद्यापही हा प्रश्न सोडवण्यात खासदारांनी ताकद दिली नाही .तसेच सध्या ५ टीएमसी पाणी वादात  पक्षासाठी सोयीची भुमिका घेतली असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.———खडकवासला कालव्यावरुन निरा डावा कालव्यात पाणी सोडण्यासाठी सुरवातीला कडबनवाडी येथे सर्वेक्षण करण्यात आले होते .मात्र, काही राजकारण्यांच्या दबावामुळे सणसरला जोड बोगदा जोडण्यात आला .त्यावेळेपासुन राजकारणाच्या कात्रीत सापडलेला हा बोगदा या भागाला वरदान ठरण्याऐवजी शापित ठरला आहे.——

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीState Governmentराज्य सरकारUjine Damउजनी धरणFarmerशेतकरी