शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

कित्येक सरकारं आली अन् गेली, आमदार, खासदारकीसह कुणी मंत्रीही झाले; पण इंदापूरचा पाणीप्रश्न ‘जैसे थे'च! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 19:01 IST

२२ गावांना दोन पिढ्यांच्या संघर्षानंतर पदरी पाणीप्रश्नी प्रतीक्षाच... 

सतिश सांगळे - 

कळस:  राज्यात तीस वर्षात अनेक सरकारं आली अन् गेली, बरेच जण खासदार, आमदार आणि मंत्री म्हणून मिरवून गेले. पण इंदापूर तालुक्यातील निरा डावा कालव्यावरील २२ गावांमधील दोन पिढ्यांच्या पदरी संघर्षानंतरही बारमाही पाणी प्रश्नांबाबत लढा देवूनही प्रतीक्षाच आली आहे. गेल्या ३० वर्षांपासून धगधगत असलेल्या या पाणीप्रश्नाला राजकीय पक्षांनी वेगळा रंग दिल्याने या पाणीप्रश्नाचे भिजत घोंगडे कायम राहिले आहे.

निरा डावा कालव्यावरील अंथुर्णे पासुन शेटफळहवेली पर्यंत बावीस गावांच्या शेतीसिंचनाचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी खडकवासला कालव्यावर सणसर जोड बोगदा तयार करण्यात आला .यामधुन निरा डावा कालव्यामध्ये पाणी आणून चारी क्रमांक ४६ ते ५९ मध्ये पाणी आवर्तन देऊन हा बारमाही भाग बागायती करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार निमगाव-केतकी येथे येवून शेतकरी मेळाव्यात प्रचंड जनसमुदाया समोर जाहीर सभेत केली. शेतकऱ्यांना ऊसाची लागण करावी १२ महिन्याला १२ पाळ्या मिळतील, असे आश्वासन दिले गेले.

परंतु, आज तब्बल ३० वर्ष पुर्ण झाली .तरी २२ गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही.१९९५ मध्ये युतीचे शासन सरकार आले .त्यावेळी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी १९९७ मध्ये धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असल्यास २२ गावांतील खातेदारांना एकरी १५ गुंठे असे सुमारे १२५० एकर क्षेत्रास ७ नंबर अर्जावर  पाणी परवानगी बारमाही देण्यास मंजुरी दिली .विधान परिषद समिती सदस्यांच्या पाहणी नंतर कायम स्वरूपी योजना मंजुर करावी,अशी शिफारस झाली.त्यामुळे एकरी १५ गुंठ्याएवजी २० गुंठ्याला ७ नंबर फॉर्मवर पाणी देण्यास मंजुरी आली.

आता राज्याचे विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या प्रश्नासाठी मोठी ताकद लावुन उजनी धरणावरुन ५ टीएमसी पाणी मंजुर केले. मात्र सोलापुर मधील स्वपक्षीय आमदारांच्या दबावामुळे एक महिना होण्याच्या अगोदरच आदेश रद्ध करण्यात आला .त्यामुळे हा प्रश्न भिजत राहणार आहे. या गावातील शेतकऱ्यांना  कायम स्वरूपी बारमाही पाण्याबाबत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

तालुक्यातील अंथुर्णे भरणेवाडी शेळगाव निमसाखर, रेडणी, निमगांव-केतकी, गोतंडी दगडवाडी, घोरपडवाडी, सराफवाडी, निरवांगी, रेडा,रेडणी, काटी, लाखेवाडी, खोरोची, भोडणी  या  गावांतील शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांनी यासाठी संघर्ष केला आहे .मुळच्या अध्यादेशाप्रमाणे ३.९ टीएमसी हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.——————————————खासदार सुप्रिया सुळे या लोकसभेला प्रथमच उभ्या राहिल्यानंतर २२ गावांतील शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेऊन निमगांव-केतकी येथे हक्काच्या बारमाही पाण्यासाठी काही दिवस उपोषण देखील केले होते .मात्र ,आश्वासित केल्याने विरोध मावळला. परंतू, अद्यापही हा प्रश्न सोडवण्यात खासदारांनी ताकद दिली नाही .तसेच सध्या ५ टीएमसी पाणी वादात  पक्षासाठी सोयीची भुमिका घेतली असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.———खडकवासला कालव्यावरुन निरा डावा कालव्यात पाणी सोडण्यासाठी सुरवातीला कडबनवाडी येथे सर्वेक्षण करण्यात आले होते .मात्र, काही राजकारण्यांच्या दबावामुळे सणसरला जोड बोगदा जोडण्यात आला .त्यावेळेपासुन राजकारणाच्या कात्रीत सापडलेला हा बोगदा या भागाला वरदान ठरण्याऐवजी शापित ठरला आहे.——

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीState Governmentराज्य सरकारUjine Damउजनी धरणFarmerशेतकरी