शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

कित्येक सरकारं आली अन् गेली, आमदार, खासदारकीसह कुणी मंत्रीही झाले; पण इंदापूरचा पाणीप्रश्न ‘जैसे थे'च! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 19:01 IST

२२ गावांना दोन पिढ्यांच्या संघर्षानंतर पदरी पाणीप्रश्नी प्रतीक्षाच... 

सतिश सांगळे - 

कळस:  राज्यात तीस वर्षात अनेक सरकारं आली अन् गेली, बरेच जण खासदार, आमदार आणि मंत्री म्हणून मिरवून गेले. पण इंदापूर तालुक्यातील निरा डावा कालव्यावरील २२ गावांमधील दोन पिढ्यांच्या पदरी संघर्षानंतरही बारमाही पाणी प्रश्नांबाबत लढा देवूनही प्रतीक्षाच आली आहे. गेल्या ३० वर्षांपासून धगधगत असलेल्या या पाणीप्रश्नाला राजकीय पक्षांनी वेगळा रंग दिल्याने या पाणीप्रश्नाचे भिजत घोंगडे कायम राहिले आहे.

निरा डावा कालव्यावरील अंथुर्णे पासुन शेटफळहवेली पर्यंत बावीस गावांच्या शेतीसिंचनाचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी खडकवासला कालव्यावर सणसर जोड बोगदा तयार करण्यात आला .यामधुन निरा डावा कालव्यामध्ये पाणी आणून चारी क्रमांक ४६ ते ५९ मध्ये पाणी आवर्तन देऊन हा बारमाही भाग बागायती करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार निमगाव-केतकी येथे येवून शेतकरी मेळाव्यात प्रचंड जनसमुदाया समोर जाहीर सभेत केली. शेतकऱ्यांना ऊसाची लागण करावी १२ महिन्याला १२ पाळ्या मिळतील, असे आश्वासन दिले गेले.

परंतु, आज तब्बल ३० वर्ष पुर्ण झाली .तरी २२ गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही.१९९५ मध्ये युतीचे शासन सरकार आले .त्यावेळी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी १९९७ मध्ये धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असल्यास २२ गावांतील खातेदारांना एकरी १५ गुंठे असे सुमारे १२५० एकर क्षेत्रास ७ नंबर अर्जावर  पाणी परवानगी बारमाही देण्यास मंजुरी दिली .विधान परिषद समिती सदस्यांच्या पाहणी नंतर कायम स्वरूपी योजना मंजुर करावी,अशी शिफारस झाली.त्यामुळे एकरी १५ गुंठ्याएवजी २० गुंठ्याला ७ नंबर फॉर्मवर पाणी देण्यास मंजुरी आली.

आता राज्याचे विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी या प्रश्नासाठी मोठी ताकद लावुन उजनी धरणावरुन ५ टीएमसी पाणी मंजुर केले. मात्र सोलापुर मधील स्वपक्षीय आमदारांच्या दबावामुळे एक महिना होण्याच्या अगोदरच आदेश रद्ध करण्यात आला .त्यामुळे हा प्रश्न भिजत राहणार आहे. या गावातील शेतकऱ्यांना  कायम स्वरूपी बारमाही पाण्याबाबत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

तालुक्यातील अंथुर्णे भरणेवाडी शेळगाव निमसाखर, रेडणी, निमगांव-केतकी, गोतंडी दगडवाडी, घोरपडवाडी, सराफवाडी, निरवांगी, रेडा,रेडणी, काटी, लाखेवाडी, खोरोची, भोडणी  या  गावांतील शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांनी यासाठी संघर्ष केला आहे .मुळच्या अध्यादेशाप्रमाणे ३.९ टीएमसी हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.——————————————खासदार सुप्रिया सुळे या लोकसभेला प्रथमच उभ्या राहिल्यानंतर २२ गावांतील शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेऊन निमगांव-केतकी येथे हक्काच्या बारमाही पाण्यासाठी काही दिवस उपोषण देखील केले होते .मात्र ,आश्वासित केल्याने विरोध मावळला. परंतू, अद्यापही हा प्रश्न सोडवण्यात खासदारांनी ताकद दिली नाही .तसेच सध्या ५ टीएमसी पाणी वादात  पक्षासाठी सोयीची भुमिका घेतली असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.———खडकवासला कालव्यावरुन निरा डावा कालव्यात पाणी सोडण्यासाठी सुरवातीला कडबनवाडी येथे सर्वेक्षण करण्यात आले होते .मात्र, काही राजकारण्यांच्या दबावामुळे सणसरला जोड बोगदा जोडण्यात आला .त्यावेळेपासुन राजकारणाच्या कात्रीत सापडलेला हा बोगदा या भागाला वरदान ठरण्याऐवजी शापित ठरला आहे.——

टॅग्स :IndapurइंदापूरWaterपाणीState Governmentराज्य सरकारUjine Damउजनी धरणFarmerशेतकरी