शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

VIDEO: मराठ्यांचा अजित पवारांना बारामतीतच हिसका; घोषणाबाजी करत जाहीर सभा रोखण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2023 10:52 IST

बारामती तालुक्यात सभा सुरू असताना मराठा आरक्षणाच्या घोषणा देत काही जणांनी सभा बंद करण्याची मागणी केली.....

बारामती : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभरात रान उठवले आहे. यासाठी त्यांनी राज्यभरात दौरेही केले. आता अनेक गावांत राजकीय नेत्यांना आणि पुढाऱ्यांना बंदी केली जात आहे. त्यांना गावात प्रवेश बंद केला जातोय. सोलापूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा सुरू असताना तिथे काही मराठी बांधवांनी आरक्षण मिळाले पाहिजे, अशा घोषणा देत सभेत गोंधळ घातला होता. आता अजित पवारांना त्यांच्या मतदारसंघातही तसा अनुभव आला आहे. बारामती तालुक्यात सभा सुरू असताना मराठा आरक्षणाच्या घोषणा देत काही जणांनी सभा बंद करण्याची मागणी केली.

या तरुणांनी घोषणाबाजी करत जाहीर सभा रोखण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी या तरुणांची समजूत काढून त्यांना तिथून नेले. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणा देऊन पवारांची सभा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आक्रमक कार्यकर्त्यांना काढले.

गावबंदीचा इशारा-

यावेळी संतप्त कार्यकर्त्यांचा अजित पवारांसह सत्ताधाऱ्यांना गावबंदीचा इशारा दिला आहे. मराठा तरुणांना आरक्षण नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. अनेकांकडे गुणवत्ता असूनही त्यांना संधी मिळत नाही. त्यामुळे मराठा आरक्षण लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी या तरुणांनी केली.

काही तरी शिजतंय-

मराठा समाजाला आरक्षण देणार म्हणजे देणार, अशी शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यात घेतली. छत्रपती शिवरायांच्या मुर्तीसमोर त्यांनी ही शपथ घेतली. यावर जरांगे यांना विचारले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आरक्षण कोणीतरी देऊ देत नाही. आत काहीतरी डाळ शिजली जात आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक फोन केला तरी मराठ्यांना आरक्षण मिळून जाईल. पण सध्या असं होत नाहीये. पण आम्ही आमचं हक्काचं आरक्षण मिळवणार, असा विश्वासही जरांगेंनी व्यक्त केला.

गिरीश महाजनांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न-

आजपासून जरांगे पाटलांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटलांना फोन केला. त्यावेळी त्यांच्याकडून जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावर, आम्ही तुम्हाला मागितलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दिला पण तुम्ही काहीच केले नाही. अजून गुन्हे मागे घेतले नाहीत तर तुम्ही आरक्षण कसे देणार? असा सवालही त्यांनी मंत्री महोदयांना जरांगे पाटील यांनी विचारला.

कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देणार-

सरकार आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. पण ते देताना कायद्याच्या चौकटीत मिळायला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहेत. यापूर्वी दिलेले आरक्षण दोनदा न्यायालयाकडून नाकारण्यात आले आहे. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत मिळावे यासाठी न्या. शिंदे यांची एक समिती नेमली आहे, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPuneपुणेMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे