शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

ऑनर किलिंगच्या विराेधात विशेष कायदा करा ; पुण्यातील मानवधिकार कार्यकर्त्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 5:27 PM

ऑनर किलिंगच्या विराेधात विशेष कायदा करण्याची मागणी पुण्यातील मानवधिकार कार्यकर्ते अ‍ॅड. विकास शिंदे यांनी केली आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अहमदनगरमध्ये ऑनर किलिंगच्या अनेक घटना समाेर आल्या असून राज्यात सातत्याने असे प्रकार घडत असल्याने या विराेधात विशेष कायदा करण्याची मागणी पुण्यातील मानवधिकार कार्यकर्ते अ‍ॅड. विकास शिंदे यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री, राज्यपाल, राज्य महिला आयाेग तसेच राष्ट्रीय मानवी हक्क आयाेग यांना निवेदन दिले आहे. तसेच अहमदनगर येथे झालेल्या ऑनर किलिंगच्या घटनांचे खटले जलदगती न्यायालयात चालवावे अशी मागणी देखील केली आहे. 

गेल्या काही दिवसांमध्ये ऑनर किलिंगच्या घटना समाेर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमिवर शिंदे यांनी निवेदन दिले आहे. 28 मार्च राेजी अहमदनगर येथील जामखेड तालुक्यामध्ये प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन 11 वीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीची तिच्या वडीलांनी आणि मामाने मिळून निर्दयीपणे हत्या केली हाेती. तसेच हत्या करुन घराजवळच असलेल्या शेत तळ्याच्या बाजुला राॅकेल टाकून तिचा मृतदेह जाळला हाेता. या घटनेनंंतरच पंधराच दिवसात नेवासा तालुक्यातील काैठा या गावामध्ये मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्यामुळे पीडीत मुलीच्या पालकांनी तिला लग्न लावून देताे म्हणून बाेलावून तिचा खून केला. 

एका महिन्यात दाेन ऑनर किलींग झालेले असताना हे थांबविण्यासाठी सरकारकडून काेणतीही प्रतिक्रिया आली नसल्याने शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 2004 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या आम सभेमध्ये सन्मानाच्या नावाखाली महिलांविरुद्ध हाेणारे गुन्हे राेखण्यासाठी एक ठराव पास करण्यात आला व त्या ठरावानुसार प्रत्येक सदस्य राष्ट्राने अशा प्रकारचे गुन्हे राेखण्यासाठी विशेष कायदे करावेत, प्रशासकीय पातळीवर कृती आराखडे तयार करण्याबाबत ठरविण्यात आले आहे. आपल्या सरकारला आंतरराष्ट्रीय कायदे आणि करारांचा विसर पडला असल्याचे शिंदे यांनी निवदेनात नमूद केले आहे. 

शिंदे म्हणाले, ऑनर किलींग राेखण्यासाठी सरकारने पाॅस्काे सारखा विशेष कायदा करण्याची आवश्यकता आहे. अनेकदा ऑनर किलींगच्या घटना घडू शकते याची माहिती गावातील ग्रापपंचायत सदस्य, सरपंच यांना माहित असते. परंतु अनेकदा याबाबत पाेलिसांना माहिती दिली जात नाही. त्यामुळे ऑनर किलींगसाठी विशेष कायदा करुन त्यात अशा घटना राेखण्याची जबाबदारी सरपंच, ग्रापपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांना नेमून द्यायला हवी. तसेच प्रत्येक पाेलीस स्टेशनमध्ये समुपदेशन कक्ष उभारण्यात यावा. जिथे मुला -मुलींचे तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात यावे. अनेकदा प्रेमविवाहामध्ये गावामध्ये इज्जत जाईल या भावनेतून ऑनर किलींगच्या घटना घडतात. परंतु जर गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच जर या विराेधात पुढे आल्या तर अशा घटना घडणार नाहीत. त्यामुळे असा कायदा करणे आवश्यक आहे. त्याचबराेबर एक हेल्पलाईन सुरु करणे सुद्धा आवश्यक आहे. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयMurderखून