शहरं
Join us  
Trending Stories
1
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
2
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
3
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
4
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
5
“अन्याय करु नका, तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही”; मनोज जरांगेंचा इशारा
6
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
7
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
8
Stock Market Opening Bell: २३००० पर्यंत जाऊन घसरला Nifty, 'या' शेअर्समध्ये नफावसूली; ३९.७ हजार कोटी बुडाले
9
Success Story: ६ वर्ष पत्नीच्या पगारातून चालवलं घर, छोट्या खोलीतून सुरू केला बिझनेस; आज २.९ अब्ज डॉलर्सची आहे नेटवर्थ
10
तिसरी ते बारावीची सर्व पाठ्यपुस्तके बदलणार; आराखडा तयार, नागरिकांकडून 3 जूनपर्यंत मागविल्या सूचना
11
पोर्शे कार अपघात : पोलिसांनी बाळाच्या बापाला सोबत घेऊन घेतली घराची झडती; सुरेंद्रकुमारला दिवसभर ठेवले बसवून
12
Anil Ambani News : दिवाळखोर अनिल अंबानी १५ दिवसांत कुठून देणार ₹२५९९ कोटी, कोणती नोटीस देतेय टेन्शन?
13
आजचे राशीभविष्य: कामे निर्विघ्नपणे होतील, अचानक धनलाभ योग; अलौकिक अनुभूती लाभेल
14
रोहितच्या MI ने जे दोनदा करून दाखविले ते SRH ला जमेल का? आज क्वालिफायर २ सामना, फायनल जिंकेल का...
15
धनदेवता कुबेराचे ‘हे’ एक स्तोत्र म्हणा, शुभ-लाभ मिळवा; अपार धनलाभ, लक्ष्मीची विशेष कृपा!
16
१ वर्षांनी अद्भूत राजयोग: ६ राशींवर लक्ष्मी-नारायण कृपा, पद-पैसा वाढेल; संपत्तीत शुभ-लाभ!
17
आंध्रातून ‘गुड न्यूज’; आता लक्ष यूपी, महाराष्ट्रासह काही राज्यांत जागा घटण्याच्या अहवालांमुळे भाजपने बदलली रणनीती
18
"आमचे कोणाशीही वैर नाही, मी आईसाठी मते मागण्याकरिता आलो आहे"; आई मनेकांच्या विजयासाठी वरुण मैदानात
19
खासदार फुटण्याचा आपसमोर मोठा धोका; चौकशीचा ससेमिरा, पक्ष आतापर्यंतच्या सर्वांत वाईट काळातून जातोय
20
अग्निवीरवर बोलू नका म्हणणे अतिशय चुकीचे; पी. चिदंबरम यांची निवडणूक आयोगावर टीका

संवाद साधताना येणारी मुख्य अडचण भाषेचीच : डॉ. सदानंद मोरे; आंतरधर्मीय सुसंवादावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 12:14 PM

जेव्हा आपण आंतरधर्मीय संवादाविषयी म्हणतो तेव्हा एकमेकांना समजून घेताना भाषेचाच अडसर येत असतो. त्यामुळे चांगल्या संवादात भाषेचा अडथळा येतो, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआपला समाज हा अंधश्रद्धेमध्ये लोणच्यासारखा मुरलेला : डॉ. दत्तात्रय तापकीरईश्वराचा जो संदेश असतो तो सर्व धर्मांसाठी एकच : डॉ. सदानंद मोरे

पुणे : ‘‘एका धर्माच्या भाषेत दुसऱ्या धर्माची भाषा व्यक्त करताना ज्या अडचणी येतात त्या समजून घेतल्या पाहिजेत. जेव्हा आपण आंतरधर्मीय संवादाविषयी म्हणतो तेव्हा एकमेकांना समजून घेताना भाषेचाच अडसर येत असतो. त्यामुळे चांगल्या संवादात भाषेचा अडथळा येतो, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.मराठवाडा मित्रमंडळ, डायोसिस अॉफ पुणे, मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि स्वच्छंद यांच्या वतीने आयोजित ‘आंतरधर्मीय सुसंवाद’ या परिसंवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्रा. डॉ. दत्तात्रय तापकीर, प्रा. डॉ. शमशुद्दीन तांबोळी, प्रा. भाऊसाहेब जाधव, डॉ. थॉमस डाबरे आदी उपस्थित होते.

डॉ. मोरे म्हणाले, की प्रत्येक धर्म हा एका विशिष्ट भाषेत सांगितलेला असतो. धर्म भाषा कितीही वेगवेगळ्या असोत, मात्र ईश्वराचा जो संदेश असतो तो सर्व धर्मांसाठी एकच असतो. ज्या त्या भाषेत जो तो धर्म सांगताना काही एक विशिष्ट कल्पना मांडल्या जातात. एक चौकट तयार केलेली असते आणि त्या चौकटीत बोलावे लागते, मग त्यासाठी तुम्ही कुठलीही भाषा वापरू शकता. या वेळी सर्वधर्मीय एकतेचा व राष्ट्रभक्तीचा संदेश देणाऱ्या सुमधुर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये रवींद्र शाळू, आरती आठल्ये, जयंत सबनीस, अनघा धायगुडे यांचा समावेश होता. प्रा. विद्या यंदे यांनी सूत्रसंचालन केले.

डॉ. दत्तात्रय तापकीर म्हणाले, ‘एक दिल के सौ तुकडे कुछ इधर कुछ उधर’ या ओळीमध्ये म्हटल्याप्रमाणे मानवता अशी तुकड्या-तुकड्यांमध्ये विभक्त झाली आहे. आपला समाज हा अंधश्रद्धेमध्ये लोणच्यासारखा मुरलेला आहे. 

डॉ. थॉमस डाबरे म्हणाले, राष्ट्र कार्यासाठी या देशातील एकात्मता टिकवण्यासाठी, शांतता राखण्यासाठी आपण प्रजा अंतिम मानून राष्ट्र, सत्ता आणि सरकार प्रजेच्या कल्याणासाठी, प्रजेमध्ये असलेली विभिन्नता लक्षात घेऊन या ठिकाणी जगणे, तसे प्रयत्न करणे असे झाले, तर देशामध्ये शांती-सलोखा टिकून राहील.

टॅग्स :Sadanand Moreसदानंद मोरेPuneपुणे