शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

हातगाडी लावण्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 20:41 IST

हातगाडी लावण्याच्या वादातून येरवड्यात झालेल्या संदिप देवकर यांच्या निर्घृण खूनप्रकरणी मुख्यसूत्रधार जावेद अल्ताफ़ सैय्यद अखेरीस रविवारी रात्री येरवडा पोलिसांनी अटक केली

ठळक मुद्देयेरवडा पोलिसांची कामगिरी : गोळीबारासह निर्घृण खूनाच्या गुन्हात सहा आरोपी जेरबंदहातगाडी लावण्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक

 विमाननगर : हातगाडी लावण्याच्या वादातून येरवड्यात झालेल्या संदिप देवकर यांच्या निर्घृण खूनप्रकरणी मुख्यसूत्रधार जावेद अल्ताफ़ सैय्यद (वय ३१ रा. नवी खडकी गणेशनगर येरवडा ) याला अखेरीस रविवारी रात्री येरवडापोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने तपासासाठी  १९जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.                                या निर्घृण खूनाच्या गंभीर गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार जावेद सैय्यद हा  तब्बल आठ दिवस फरार होता.गुन्ह्यातील मुख्यसूत्रधार फरार असल्यामुळे येरवडा  पोलिसांना मोठी डोकेदुखी झाली होती.येरवडा पोलिसांसह गुन्हे शाखेची पथकं आरोपी जावेद याचा शोध घेत होती.अखेरीस जावेदला रविवारी (दि.१३ जानेवारी) वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, गुन्हे निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशिल बोबडे, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गवारी, सहाय्यक फौजदार बाळू बहिरट यांनी लोहगाव परिसरातून सापळा रचून ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली.संदिप उर्फ अण्णा सुभाष देवकर (वय ४९रा.नवी खडकी,येरवडा) यांचा हातगाडी लावण्याच्या वादातून ६जानेवारीला डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करुन व नंतर रिव्हाँलवरने गोळ्या घालून निर्घृण खून करण्यात आला होता.  खूनाच्या आदल्या दिवशी दि.५ जानेवारी रोजी गुन्ह्यातील मुख्यसुत्रधार जावेद सैय्यद व त्याचा साथीदार आरोपी गणेश बोरकर याने संदिप देवकर यांच्याशी हातगाडी लावण्यावरुन झालेल्या वादावादीतून  जावेद याने "तूला बघून घेतो " असे म्हणून शिविगाळ व धमकावून निघून गेला होता.याच वादातून जावेद याने खूनाचा कट रचून इतर साथिदारांच्या मदतीने संदिप यांचा निर्घृण खून केला. गुन्हा करुन जावेदसह सर्व आरोपी फरार झाले होते. या गोळीबारासह झालेल्या निर्घृण  खूनामुळे येरवड्यासह संपुर्ण परिसरात खळखळ उडाली होती. जावेद सैय्यद हा नवी खडकी येथील रहिवासी आहे.

                 एमआयएम पक्षांकडून त्याने मागील वर्षी येरवड्यातून पुणे  महापालिकेची निवडणूक लढवली होती.पुणे शहरासह मुंबई व इतर भागातील विविध राजकिय पक्ष संघटनांच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी त्याचे संबंध आहेत.गुन्हेगारी व व्यापारी क्षेत्रातील काही बड्या लोकांच्या देखिल तो संपर्कात असल्याचे समजते. येरवड्यातील संदिप देवकर यांच्या निर्घृण खूनाच्या कटाचा मुख्यसूत्रधार म्हणून त्याच्याविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खूनाच्या घटनेनंतर जावेद फरार होता.या गंभीर गुन्ह्यात तब्बल आठ दिवसांनी त्याला येरवडा पोलिसांनी अटक केली.                    याच गुन्हातील सहभागी आरोपी गणेश चौगुले उर्फ बोरकर, विशाल कांबळे, रोहित कोळी , मयूर  सुर्यवंशी या चौघांना पुणेस्टेशन परिसरातून सापळा रचून येरवडा पोलिसांनी यापुर्वीच अटक केली आहे. मात्र गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार जावेद सैय्यद व आरोपी अशरफ पठाण हे दोघे तेव्हा फरार होते.अटकेनंतर अोळखपरेडसाठी त्यांना तात्काळ न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.फरार आरोपी अशरफ हा गुन्हा करुन अौरंगाबाद येथे फरार झाला होता. शनिवारी अशरफ़ला गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान व पथकाने ताब्यात घेतले.                             येरवडा पोलिसांनी अटक केल्यानंतर   त्याला देखील तपासासाठी  न्यायालयाने १९ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. अशरफ हा येरवडा परिसरातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. येरवड्यातील निर्घृण खूनाच्या  गंभीर गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता सहा झाली असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशिल बोबडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसYerwadaयेरवडाArrestअटकMurderखून