शहरं
Join us  
Trending Stories
1
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
2
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
3
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
4
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
5
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
6
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
7
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
8
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
9
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
10
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
11
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
12
निष्कलंक, सुसंस्कृत नेतृत्व हरपले; माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचे निधन
13
चांदीसाठी किलोला ‘जीएसटी’सह मोजा दोन लाख रुपये ! दोन हजारांच्या वाढीसह पोहोचली १,९४,००० रुपयांवर
14
इंडिगोला दणका; ४ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर निलंबित, सीईओ पीटर एल्बर्स यांची सलग दुसऱ्या दिवशी डीजीसीएने चौकशी केली
15
भाजप आमदारांनी आरोप केलेले तुकाराम मुंढे यांना ‘क्लीन चिट’,ईओडब्ल्यू व पोलिसांच्या चौकशीत काहीच आढळले नाही
16
विमा क्षेत्रात १०० टक्के ‘एफडीआय’ला मंजुरी; आतापर्यंत एफडीआयमार्फत ८२,००० कोटींची परकीय गुंतवणूक
17
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
18
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
19
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
20
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

MAHAVITARAN ABHAY YOJNA : महावितरण अभय योजनेला अत्यल्प प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 12:58 IST

७६२ कोटींच्या थकबाकीपैकी केवळ ४३ कोटींची वसुली, ३१ मार्चअखेरची मुदत

पुणे : महावितरणच्या अभय योजनेत पुणे विभागात सुमारे सव्वासहा लाख अकृषक ग्राहकांकडील ७६२ कोटी मूळ थकबाकीपैकी केवळ ४३ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ही वसुली मूळ थकबाकीच्या सुमारे ६ टक्केच आहे. त्यामुळे या योजनेकडे थकबाकीदार ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. ही योजना आता ३१ मार्चपर्यंतच सुरू राहील, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतरही नवीन जागामालक किंवा ताबेदारांना जागा वापरासह विजेची गरज असो किंवा नसो, थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे.

महावितरणने गेल्या सप्टेंबरमध्ये अभय योजना जाहीर केली होती. त्यात थकबाकीमुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीज ग्राहकांसाठी ही योजना लागू होती. त्यावेळी विभागातील ६ लाख २९ हजार ८३ अकृषक ग्राहकांकडे ९०१ कोटी ९७ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. यातील मूळ थकबाकी ७६२ कोटी १९ लाख रुपये होती. या थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण व्याज व विलंब आकाराचे १३९ कोटी ७८ लाख रुपये माफ होणार होते. मात्र, या योजनेकडे थकबाकीदार ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. पुणे विभागामध्ये आतापर्यंत ३३ हजार ३०४ ग्राहकांनी अर्ज केले आहे. २९ हजार ५०१ ग्राहक सहभागी झाले आहेत. त्यापैकी १७ हजार २६१ वीजग्राहकांनी विजेची गरज नसल्याने योजनेचा लाभ घेऊन थकबाकीतून मुक्ती मिळविली आहे. तर १० हजार १३५ वीज ग्राहकांकडे विजेची पुनर्जोडणी करण्यात आली असून, ५ हजार ९०८ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे.

योजनेत सहभागी झालेल्या या २९ हजार ५०१ थकबाकीदारांनी ४३ कोटी ११ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. यात पुणे जिल्ह्यात १२ हजार ९६ ग्राहकांनी २७ कोटी ५६ लाख, सातारा जिल्ह्यात १ हजार ६६७ ग्राहकांनी २ कोटी ९ लाख, सोलापूर जिल्ह्यात ४ हजार ७१९ ग्राहकांनी ४ कोटी २ लाख, कोल्हापूर जिल्ह्यात ६ हजार ४५३ ग्राहकांनी ६ कोटी ३६ लाख आणि सांगली जिल्ह्यातील ४ हजार ५६६ ग्राहकांनी ३ कोटी ८ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.

थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होत आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के, तर उच्चदाब ग्राहकांना आणखी ५ टक्के सूट मिळत आहे. यासोबतच मूळ थकबाकीची सुरुवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याचीदेखील सोय आहे. ही योजना ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड