शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

MAHAVITARAN ABHAY YOJNA : महावितरण अभय योजनेला अत्यल्प प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 12:58 IST

७६२ कोटींच्या थकबाकीपैकी केवळ ४३ कोटींची वसुली, ३१ मार्चअखेरची मुदत

पुणे : महावितरणच्या अभय योजनेत पुणे विभागात सुमारे सव्वासहा लाख अकृषक ग्राहकांकडील ७६२ कोटी मूळ थकबाकीपैकी केवळ ४३ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ही वसुली मूळ थकबाकीच्या सुमारे ६ टक्केच आहे. त्यामुळे या योजनेकडे थकबाकीदार ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. ही योजना आता ३१ मार्चपर्यंतच सुरू राहील, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतरही नवीन जागामालक किंवा ताबेदारांना जागा वापरासह विजेची गरज असो किंवा नसो, थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे.

महावितरणने गेल्या सप्टेंबरमध्ये अभय योजना जाहीर केली होती. त्यात थकबाकीमुळे ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व अकृषक वीज ग्राहकांसाठी ही योजना लागू होती. त्यावेळी विभागातील ६ लाख २९ हजार ८३ अकृषक ग्राहकांकडे ९०१ कोटी ९७ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. यातील मूळ थकबाकी ७६२ कोटी १९ लाख रुपये होती. या थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण व्याज व विलंब आकाराचे १३९ कोटी ७८ लाख रुपये माफ होणार होते. मात्र, या योजनेकडे थकबाकीदार ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. पुणे विभागामध्ये आतापर्यंत ३३ हजार ३०४ ग्राहकांनी अर्ज केले आहे. २९ हजार ५०१ ग्राहक सहभागी झाले आहेत. त्यापैकी १७ हजार २६१ वीजग्राहकांनी विजेची गरज नसल्याने योजनेचा लाभ घेऊन थकबाकीतून मुक्ती मिळविली आहे. तर १० हजार १३५ वीज ग्राहकांकडे विजेची पुनर्जोडणी करण्यात आली असून, ५ हजार ९०८ ग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे.

योजनेत सहभागी झालेल्या या २९ हजार ५०१ थकबाकीदारांनी ४३ कोटी ११ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. यात पुणे जिल्ह्यात १२ हजार ९६ ग्राहकांनी २७ कोटी ५६ लाख, सातारा जिल्ह्यात १ हजार ६६७ ग्राहकांनी २ कोटी ९ लाख, सोलापूर जिल्ह्यात ४ हजार ७१९ ग्राहकांनी ४ कोटी २ लाख, कोल्हापूर जिल्ह्यात ६ हजार ४५३ ग्राहकांनी ६ कोटी ३६ लाख आणि सांगली जिल्ह्यातील ४ हजार ५६६ ग्राहकांनी ३ कोटी ८ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.

थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होत आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के, तर उच्चदाब ग्राहकांना आणखी ५ टक्के सूट मिळत आहे. यासोबतच मूळ थकबाकीची सुरुवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याचीदेखील सोय आहे. ही योजना ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड