शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

तरुण जगभर फिरत देतोय महात्मा गांधींच्या शांततेचा संदेश; आतापर्यंत तब्बल ४६ देशांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 17:22 IST

जगभरातील विविध देशातून ५ वर्षांपासून चालू शांती यात्रा; १७ नोव्हेंबरला यात्रेचा समारोप होणार

ठळक मुद्दे१८ नोव्हेंबर २०१६ साली वर्धा येथील गांधीग्राम आश्रमातून शांती यात्रेला सुरुवात

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधीचे विचार, शिकवण, त्यांचे कार्य जाणून घेण्यासाठी असंख्य तरुण - तरुणी या थोरपुरुषाचा अभ्यास करू लागले आहेत. त्यांची पुस्तक वाचण्याबरोबरच गांधीजींचे पुतळे, ग्रंथालये, आश्रम, संग्रहालये यांना भेटी देण्याकडेही तरुणांचा कल वाढू लागला आहे. राष्ट्रपित्याचा अहिंसा आणि शांततेचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी एका तरुणानं शांती यात्रेला सुरुवात केली. 

जगभरातील विविध देशांमधून ५ वर्षांपासून शांती यात्रा सुरु असून आतापर्यंत तब्बल ४६ देशांचा प्रवास या तरुणाने पूर्ण केला आहे. १७ नोव्हेंबरला तिचा समारोप होणार असल्याचे त्याने लोकमतशी बोलताना सांगितलं. नितीन सोनवणे असं या तरुणाचं नाव आहे. तो मूळचा अहमदनगरचा असून पुण्यातील कोथरूड येथे असणाऱ्या महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या स्वयंसेवी संस्थेत कार्यरत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राशीन गावात नितीन सोनवणेचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर महाविद्दयालयातून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ६ महिने इंजिनिअर म्ह्णून काम केले. राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल जाणून घेण्याची फारच इच्छा होती. त्यानुसार गांधीजींची पुस्तके वाचण्यास  सुरुवात केली. थोर राष्ट्रपित्याबद्दल माहिती मिळवत असताना नितीनला पुण्यातील महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे कार्य कानावर पडू लागले. त्यावेळी नितीनने या स्वयंसेवी संस्थेत जाण्याचे ठरवले. २०१५ सालीचा महाराष्ट्र गांधी स्मारक निधीमार्फत स्वयंसेवी कार्यास सुरुवात केली. गांधीजींचे विचार, स्वातंत्र्यपूर्व काळातील शांततेच्या मार्गाचा लढा, जगभरातील त्यांचे स्थान, आपल्या देशाबरोबरच परदेशातही होणारा त्यांचा अभ्यास, जगातील शालेय पुस्तकात गांधीबद्दल दिली गेलेली माहिती या सर्व गोष्टींमुळे गांधीजींना जवळून जाणून घेण्यास आवड निर्माण झाली. त्याच पार्श्वभूमीवर १८ नोव्हेंबर २०१६ साली वर्धा येथील गांधीग्राम आश्रम येथून शांती यात्रेला सुरुवात केली. 

 आतापर्यंत ४६ देशांचा प्रवास 

''महात्मा गांधींची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी पायी आणि सायकलवरून जगभर फिरत आहे. आतापर्यंत मी ४६ देशांचा प्रवास केला आहे. त्यांचा  अहिंसा आणि शांततेचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी दक्षिण अमेरिकेतील थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, हाँगकाँग, मकाऊ, जपान (टोकियो ते हिरोशिमा), दक्षिण कोरिया, अमेरिका, मेक्सिको, ग्वाटेमाला, होंडुरास, अल साल्वाडोर, निकाराग्वा, कोस्टा रिका, पनामा, कोलंबिया, इक्वाडोर आणि पेरू या देशात प्रवास केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, झांबिया, टांझानिया, रवांडा, युगांडा, केनिया, इथिओपिया, सुदान, इजिप्त, इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, जॉर्जिया, तुर्की, सर्बिया येथून चालत सुरुवात केली. मॅसेडोनिया, अल्बेनिया, मॉन्टेनेग्रो, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान नंतर भारतातून दिल्लीवरून प्रवास सुरु आहे. १७ नोव्हेंबरला यात्रेचा समारोप होणार असल्याचे सोनवणे याने सांगितलं आहे.''  

''राष्ट्रपिता महात्मा गांधींना भारताबरोबरच जगभरात आदराने पाहिले जाते. अनेक देशांमधील शाळा, महाविद्यालय याठिकाणी गांधीजींचा इतिहास, त्यांची शिकवण याची उत्तम माहिती दिली जाते. माझी शांती यात्रा सुरु असताना परदेशातील अनेक नागरिक माझ्याबरोबर यात्रेत सहभागी झाले. अनेक, संस्था, शाळा, यांच्या भेटीगाठी माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता. पुढच्या महिन्यात माझा प्रवास संपणार आहे. असे त्याने यावेळी सांगितलं आहे.'' 

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारतStudentविद्यार्थीEducationशिक्षण