शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

तरुण जगभर फिरत देतोय महात्मा गांधींच्या शांततेचा संदेश; आतापर्यंत तब्बल ४६ देशांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 17:22 IST

जगभरातील विविध देशातून ५ वर्षांपासून चालू शांती यात्रा; १७ नोव्हेंबरला यात्रेचा समारोप होणार

ठळक मुद्दे१८ नोव्हेंबर २०१६ साली वर्धा येथील गांधीग्राम आश्रमातून शांती यात्रेला सुरुवात

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधीचे विचार, शिकवण, त्यांचे कार्य जाणून घेण्यासाठी असंख्य तरुण - तरुणी या थोरपुरुषाचा अभ्यास करू लागले आहेत. त्यांची पुस्तक वाचण्याबरोबरच गांधीजींचे पुतळे, ग्रंथालये, आश्रम, संग्रहालये यांना भेटी देण्याकडेही तरुणांचा कल वाढू लागला आहे. राष्ट्रपित्याचा अहिंसा आणि शांततेचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी एका तरुणानं शांती यात्रेला सुरुवात केली. 

जगभरातील विविध देशांमधून ५ वर्षांपासून शांती यात्रा सुरु असून आतापर्यंत तब्बल ४६ देशांचा प्रवास या तरुणाने पूर्ण केला आहे. १७ नोव्हेंबरला तिचा समारोप होणार असल्याचे त्याने लोकमतशी बोलताना सांगितलं. नितीन सोनवणे असं या तरुणाचं नाव आहे. तो मूळचा अहमदनगरचा असून पुण्यातील कोथरूड येथे असणाऱ्या महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या स्वयंसेवी संस्थेत कार्यरत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राशीन गावात नितीन सोनवणेचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर महाविद्दयालयातून अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ६ महिने इंजिनिअर म्ह्णून काम केले. राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल जाणून घेण्याची फारच इच्छा होती. त्यानुसार गांधीजींची पुस्तके वाचण्यास  सुरुवात केली. थोर राष्ट्रपित्याबद्दल माहिती मिळवत असताना नितीनला पुण्यातील महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे कार्य कानावर पडू लागले. त्यावेळी नितीनने या स्वयंसेवी संस्थेत जाण्याचे ठरवले. २०१५ सालीचा महाराष्ट्र गांधी स्मारक निधीमार्फत स्वयंसेवी कार्यास सुरुवात केली. गांधीजींचे विचार, स्वातंत्र्यपूर्व काळातील शांततेच्या मार्गाचा लढा, जगभरातील त्यांचे स्थान, आपल्या देशाबरोबरच परदेशातही होणारा त्यांचा अभ्यास, जगातील शालेय पुस्तकात गांधीबद्दल दिली गेलेली माहिती या सर्व गोष्टींमुळे गांधीजींना जवळून जाणून घेण्यास आवड निर्माण झाली. त्याच पार्श्वभूमीवर १८ नोव्हेंबर २०१६ साली वर्धा येथील गांधीग्राम आश्रम येथून शांती यात्रेला सुरुवात केली. 

 आतापर्यंत ४६ देशांचा प्रवास 

''महात्मा गांधींची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी पायी आणि सायकलवरून जगभर फिरत आहे. आतापर्यंत मी ४६ देशांचा प्रवास केला आहे. त्यांचा  अहिंसा आणि शांततेचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी दक्षिण अमेरिकेतील थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, चीन, हाँगकाँग, मकाऊ, जपान (टोकियो ते हिरोशिमा), दक्षिण कोरिया, अमेरिका, मेक्सिको, ग्वाटेमाला, होंडुरास, अल साल्वाडोर, निकाराग्वा, कोस्टा रिका, पनामा, कोलंबिया, इक्वाडोर आणि पेरू या देशात प्रवास केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, झांबिया, टांझानिया, रवांडा, युगांडा, केनिया, इथिओपिया, सुदान, इजिप्त, इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, जॉर्जिया, तुर्की, सर्बिया येथून चालत सुरुवात केली. मॅसेडोनिया, अल्बेनिया, मॉन्टेनेग्रो, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान नंतर भारतातून दिल्लीवरून प्रवास सुरु आहे. १७ नोव्हेंबरला यात्रेचा समारोप होणार असल्याचे सोनवणे याने सांगितलं आहे.''  

''राष्ट्रपिता महात्मा गांधींना भारताबरोबरच जगभरात आदराने पाहिले जाते. अनेक देशांमधील शाळा, महाविद्यालय याठिकाणी गांधीजींचा इतिहास, त्यांची शिकवण याची उत्तम माहिती दिली जाते. माझी शांती यात्रा सुरु असताना परदेशातील अनेक नागरिक माझ्याबरोबर यात्रेत सहभागी झाले. अनेक, संस्था, शाळा, यांच्या भेटीगाठी माझ्यासाठी वेगळाच अनुभव होता. पुढच्या महिन्यात माझा प्रवास संपणार आहे. असे त्याने यावेळी सांगितलं आहे.'' 

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारतStudentविद्यार्थीEducationशिक्षण