शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
3
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
4
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
5
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
6
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
7
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
8
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
9
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
10
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
11
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
12
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
13
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
14
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
15
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
16
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
17
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
18
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
19
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत

महाराष्ट्र तहात हरणार नाही; लोकसभेला पुण्यासह महाराष्ट्र जिंकू- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 08:43 IST

लोकसभेला पुणे जिल्ह्यातील चारही जागांसह महाराष्ट्र जिंकू, असा निर्धार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला....

पिंपरी : महाराष्ट्र लढाईत जिंकतो; मात्र तहात हरतो, असा इतिहास सांगितला जातो; मात्र जो तहात जिंकला, तो दिल्लीश्वर औरंगजेबही महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला, हाही इतिहास आहे. आता महाराष्ट्र तहात हरणार नाही, तर जिंकायचा इतिहास परत घडवणार आहे. लोकसभेला पुणे जिल्ह्यातील चारही जागांसह महाराष्ट्र जिंकू, असा निर्धार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला.

चिंचवड येथे सोमवारी दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘संघर्षयात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील व अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे व गौतम चाबुकस्वार, महादेव बाबर, अनिल बाबर, शिवसेना संघटक संजोग वाघेरे, प्रकाश बाबर, योगेश बाबर, भगवान वाल्हेकर आदी उपस्थित होते.

खा. राऊत म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी चाळीस आणि काँग्रेसचा एक असे ८१ आमदार त्यांनी फोडले असले, तरी आम्ही १८१ निवडून आणून इतिहास घडवू. जमलेले कार्यकर्ते म्हणजे विजयाची तुतारी आहे. गजानन बाबर यांनी संघर्षयात्रा सुरू केली, त्या यात्रेचे आपण सगळे पाईक आहोत. काल साताऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला तुतारी वाजवण्यात आल्या. आपला प्रचार विरोधकच करीत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत तुतारी आणि मशाल इतिहास घडवणार आहे.

खासदार कोल्हे म्हणाले की, विकास म्हणजे मिळणारा निधी, अथवा मोठमोठ्या इमारती उभ्या करणे नसते, तर महाराष्ट्राचा स्वाभिमान झुकू न देणे हेही महत्वाचे असते. माजी आमदार लांडे म्हणाले की, काहीजण तुरूंगात जाण्यासाठी भितात, पण खासदार संजय राऊत तुरूंगात जाऊन आले तरीही ‘फुल नडतात’. छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहात २३ किल्ले हरले होेते. रयतेने विचार केला की, आता स्वराज्य गेले. मात्र, शिवाजी महाराज लढले आणि तहात हरलेले किल्ले परत जिंकले. आता तशीच वेळ आहे.

फटे लेकीन हटे नहीं : राऊत‘फटे लेकीन हटे नहीं’ ही आम्हा शिवसैनिकांची ओळख आहे. संजय राऊत तुरुंगात गेले; पण हटले नाहीत, ही बाळासाहेबांची प्रेरणा आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्रापुढे राजकीय-सामाजिक संघर्ष वाढवून ठेवला आहे. आपल्या हक्काचे दुसरीकडे ओढून नेले जात आहे. लोकशाही आणि महाराष्ट्राची अस्मिता वाचवायची असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी राहा. आपण इतिहास घडवूच, असे संजय राऊत म्हणाले.

शिरूरची चिंता मिटली : शरद पवारशरद पवार म्हणाले की, आमदार विलास लांडे यांच्या कंपनीत तीन हजार कामगार काम करीत आहेत, असे आताच त्यांनी सांगितले. हे ऐकून आता माझी ‘शिरूर लोकसभे’ची चिंता मिटली आहे. शिरूरसाठी डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागे कोणीतरी पाहिजे होता. तो मला मिळाला आहे. सुप्रिया सुळेंना राज्यसभेत पाठवायचा निर्णय घेतला, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. बाळासाहेबांचा शिवसैनिक शब्दाला पक्का आहे. समाजाचा विचार करणारे जे खासदार-आमदार होते, त्यात गजानन बाबर होते. दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाचा खासदार, आमदार आला तर पक्ष न पाहता आम्ही काम करायचो, हे राजकीय समीकरण होते; मात्र आता हे चित्र बदलले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवार