शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

महाराष्ट्र तहात हरणार नाही; लोकसभेला पुण्यासह महाराष्ट्र जिंकू- संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 08:43 IST

लोकसभेला पुणे जिल्ह्यातील चारही जागांसह महाराष्ट्र जिंकू, असा निर्धार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला....

पिंपरी : महाराष्ट्र लढाईत जिंकतो; मात्र तहात हरतो, असा इतिहास सांगितला जातो; मात्र जो तहात जिंकला, तो दिल्लीश्वर औरंगजेबही महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला, हाही इतिहास आहे. आता महाराष्ट्र तहात हरणार नाही, तर जिंकायचा इतिहास परत घडवणार आहे. लोकसभेला पुणे जिल्ह्यातील चारही जागांसह महाराष्ट्र जिंकू, असा निर्धार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला.

चिंचवड येथे सोमवारी दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘संघर्षयात्री’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील व अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे व गौतम चाबुकस्वार, महादेव बाबर, अनिल बाबर, शिवसेना संघटक संजोग वाघेरे, प्रकाश बाबर, योगेश बाबर, भगवान वाल्हेकर आदी उपस्थित होते.

खा. राऊत म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी चाळीस आणि काँग्रेसचा एक असे ८१ आमदार त्यांनी फोडले असले, तरी आम्ही १८१ निवडून आणून इतिहास घडवू. जमलेले कार्यकर्ते म्हणजे विजयाची तुतारी आहे. गजानन बाबर यांनी संघर्षयात्रा सुरू केली, त्या यात्रेचे आपण सगळे पाईक आहोत. काल साताऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला तुतारी वाजवण्यात आल्या. आपला प्रचार विरोधकच करीत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत तुतारी आणि मशाल इतिहास घडवणार आहे.

खासदार कोल्हे म्हणाले की, विकास म्हणजे मिळणारा निधी, अथवा मोठमोठ्या इमारती उभ्या करणे नसते, तर महाराष्ट्राचा स्वाभिमान झुकू न देणे हेही महत्वाचे असते. माजी आमदार लांडे म्हणाले की, काहीजण तुरूंगात जाण्यासाठी भितात, पण खासदार संजय राऊत तुरूंगात जाऊन आले तरीही ‘फुल नडतात’. छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहात २३ किल्ले हरले होेते. रयतेने विचार केला की, आता स्वराज्य गेले. मात्र, शिवाजी महाराज लढले आणि तहात हरलेले किल्ले परत जिंकले. आता तशीच वेळ आहे.

फटे लेकीन हटे नहीं : राऊत‘फटे लेकीन हटे नहीं’ ही आम्हा शिवसैनिकांची ओळख आहे. संजय राऊत तुरुंगात गेले; पण हटले नाहीत, ही बाळासाहेबांची प्रेरणा आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्रापुढे राजकीय-सामाजिक संघर्ष वाढवून ठेवला आहे. आपल्या हक्काचे दुसरीकडे ओढून नेले जात आहे. लोकशाही आणि महाराष्ट्राची अस्मिता वाचवायची असेल तर महाविकास आघाडीच्या पाठीशी राहा. आपण इतिहास घडवूच, असे संजय राऊत म्हणाले.

शिरूरची चिंता मिटली : शरद पवारशरद पवार म्हणाले की, आमदार विलास लांडे यांच्या कंपनीत तीन हजार कामगार काम करीत आहेत, असे आताच त्यांनी सांगितले. हे ऐकून आता माझी ‘शिरूर लोकसभे’ची चिंता मिटली आहे. शिरूरसाठी डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागे कोणीतरी पाहिजे होता. तो मला मिळाला आहे. सुप्रिया सुळेंना राज्यसभेत पाठवायचा निर्णय घेतला, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. बाळासाहेबांचा शिवसैनिक शब्दाला पक्का आहे. समाजाचा विचार करणारे जे खासदार-आमदार होते, त्यात गजानन बाबर होते. दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाचा खासदार, आमदार आला तर पक्ष न पाहता आम्ही काम करायचो, हे राजकीय समीकरण होते; मात्र आता हे चित्र बदलले आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSanjay Rautसंजय राऊतSharad Pawarशरद पवार