शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

Maharashtra Weather Update : वादळांची संख्या दुप्पट झाली अन् पूर येण्याचा धोकाही वाढला..! ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सौम्या दत्ता यांचा इशारा

By श्रीकिशन काळे | Updated: December 2, 2024 10:44 IST

''भावी पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागतील." अशी चिंता ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सौम्या दत्ता यांनी व्यक्त

पुणे : "गेल्या काही वर्षांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात गेल्या २२ वर्षांत ५२ टक्के वादळे वाढली. सन २०१८ ते २०२४ या वर्षात तर वादळांची संख्या दुप्पट झाली आहे. अचानक पूर आला, तर काय तयारी करावी, तेदेखील लोकांना माहिती नसते. यावर प्रचंड काम करायला हवे. अन्यथा भविष्यात परिस्थिती वाईट होईल. भावी पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागतील," अशी चिंता ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सौम्या दत्ता यांनी व्यक्त केली. यांच्याशी 'लोकमत'ने संवाद साधला. त्यांनी हवामानाविषयी सखोल माहिती दिली.काही गंभीर इशारेही दिले. दत्ता म्हणाले, "गेल्या ३० वर्षांत पर्यावरणावर संकट आले आहे. आपण म्हणतो झाडं कापली म्हणून पाऊस कमी झाला. पण आता एकदम पाऊस खूप होत आहे. स्थानिक पातळीवर वेगळे वातावरण असते. खरंतर औद्योगिकता वाढली आणि स्थानिक वातावरण बिघडले आहे. परिणामी आता सर्व काही पाहायला मिळत आहे. यातून जगभरात १० लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. याविषयीचा अभ्यासदेखील झाला आहे. २०३० पर्यंत आपण कार्बन उत्सर्जन ४५ टक्के कमी केले नाही तर पृथ्वीचे संतुलन बिघडेल." पर्यावरणीय संकट या विषयावरील कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या दत्तासरकार मार्गदर्शक सूचना करते, पण..!हवामान विभागाकडून दरवर्षी 'हिट वेव' म्हणजे उष्णतेची लाट येणार असल्याची घोषणा केली जाते. ही घोषणा हवामानाची एक विशिष्ट परिस्थिती असेल तरच घोषित करतात. पण या गोष्टीचा सर्वाधिक परिणाम रस्त्यावर काम करणाऱ्या सामान्य कामगार वर्गावर होतो. देशामध्ये ४० कोटी असे कामगार आहेत. या कामगारांसाठी सरकार मार्गदर्शक सूचना जारी करते. पण नेमकं त्या उलट्या असतात. कारण खूप पाणी प्यावे असे सांगितले जाते, पण त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होत असतो. घराबाहेर पडू नये असे सांगितले जाते, कामगार वर्गाला ते शक्य नसते. कारण ते घराबाहेर पडले नाही तर जगणार कसे?...तर ऑक्सिजन बाहेर पडतोआपण पाहतो की, ६० अंशांवर तापमान गेले तर पाणी उकळते आणि पाण्यातील ऑक्सिजन बाहेर पडतो. तसेच आपल्या शरीरावरदेखील परिणाम होतो. या उष्णतेमध्ये आपल्या रक्तातील ऑक्सिजनदेखील बाहेर पडतो आणि मग ती परिस्थिती शरीरासाठी घातक ठरू शकते. अनेकांना चक्कर येणे, धाप लागणे असे प्रकार होतात. याविषयीच्या मार्गदर्शक सूचना मात्र सामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्या गेल्या पाहिजेत.

राज्य सरकारने 'स्टेट अॅक्शन प्लान' हा स्थानिक पातळीवरील तापमान पाहून द्यायला हवा. तो दिला जात नाही. सर्वांसाठी एकच प्लान तयार केला जातो. आता काम करायला हवे. नीती आयोगाने याविषयी यावर लक्ष देणे गरजेचे आहे. - सौम्या दत्ता, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRainपाऊसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMaharashtraमहाराष्ट्रweatherहवामान