शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

Maharashtra: सलग ६ दिवस अवकाळीचा कहर, साडेसात हजार हेक्टर पिके उजाड

By नितीन चौधरी | Updated: April 13, 2024 18:02 IST

या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला बसला असून सुमारे चार हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.....

पुणे : राज्यात सुलभ सहाव्या दिवशी अर्थात शनिवारीही अवकाळीने विदर्भाला झोडपून काढले असून मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांत तब्बल साडेसात हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तर शुक्रवारी व शनिवारी झालेल्या अवकाळीच्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रविवारीदेखील विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला बसला असून सुमारे चार हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

राज्यात मंगळवारपासून (दि. ९) सलग सहा दिवस अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांना चांगले झोडपून काढले आहे. या अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा व गारपिटीमुळे शेतातील उभ्या पिकांच्या पिकांचे व काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात बारमाही पिकांमध्ये लिंबू, संत्रा, आंबा, चिकू, पपई, केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कलिंगड, खरबूज, उन्हाळी मूग, भुईमूग, रब्बी ज्वारी, गहू या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जळगावात सर्वाधिक नुकसान -

कृषी विभागाने मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांमध्ये झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज अहवाल राज्य सरकारला पाठवला असून त्यानुसार राज्यात ७ हजार ४८९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक ३ हजार ९८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकट्या जळगाव जिल्ह्यात झाले आहे. बीड जिल्ह्यातही १ हजार २० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून नांदेड जिल्ह्यात ७४८ हेक्टर तर वर्धा जिल्ह्यात ५२७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर शुक्रवारी व शनिवारीदेखील राज्यात राज्यातील विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीने चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे या दोन दिवसांच्या अहवालानंतर नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

आजही विदर्भात अवकाळीची शक्यता -

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर मात्र, हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. सलग सहा दिवस अवकाळीने झोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने झाले असून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सध्या निवडणूक आचारसंहितेची अडसर असून तो दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे विनंती केली जाणार असल्याचे मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी सांगितले.

अवकाळी पाऊसजिल्हा नुकसान हेक्टरमध्ये

संभाजीनगर १६३जालना १३३.३

परभणी २.६६हिंगोली २९७

नांदेड ७४८.५बीड १०२०.९

लातूर १६०.२धाराशिव ३०८

जळगाव ३९८४सोलापूर ५३

वर्धा ५२७.७नागपूर ८०.४

गडचिरोली १०.६एकूण ७४८९

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र