शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

Maharashtra: सलग ६ दिवस अवकाळीचा कहर, साडेसात हजार हेक्टर पिके उजाड

By नितीन चौधरी | Updated: April 13, 2024 18:02 IST

या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला बसला असून सुमारे चार हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.....

पुणे : राज्यात सुलभ सहाव्या दिवशी अर्थात शनिवारीही अवकाळीने विदर्भाला झोडपून काढले असून मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांत तब्बल साडेसात हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तर शुक्रवारी व शनिवारी झालेल्या अवकाळीच्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रविवारीदेखील विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला बसला असून सुमारे चार हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

राज्यात मंगळवारपासून (दि. ९) सलग सहा दिवस अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांना चांगले झोडपून काढले आहे. या अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा व गारपिटीमुळे शेतातील उभ्या पिकांच्या पिकांचे व काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात बारमाही पिकांमध्ये लिंबू, संत्रा, आंबा, चिकू, पपई, केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कलिंगड, खरबूज, उन्हाळी मूग, भुईमूग, रब्बी ज्वारी, गहू या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जळगावात सर्वाधिक नुकसान -

कृषी विभागाने मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांमध्ये झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज अहवाल राज्य सरकारला पाठवला असून त्यानुसार राज्यात ७ हजार ४८९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक ३ हजार ९८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकट्या जळगाव जिल्ह्यात झाले आहे. बीड जिल्ह्यातही १ हजार २० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून नांदेड जिल्ह्यात ७४८ हेक्टर तर वर्धा जिल्ह्यात ५२७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर शुक्रवारी व शनिवारीदेखील राज्यात राज्यातील विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीने चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे या दोन दिवसांच्या अहवालानंतर नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

आजही विदर्भात अवकाळीची शक्यता -

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर मात्र, हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. सलग सहा दिवस अवकाळीने झोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने झाले असून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सध्या निवडणूक आचारसंहितेची अडसर असून तो दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे विनंती केली जाणार असल्याचे मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी सांगितले.

अवकाळी पाऊसजिल्हा नुकसान हेक्टरमध्ये

संभाजीनगर १६३जालना १३३.३

परभणी २.६६हिंगोली २९७

नांदेड ७४८.५बीड १०२०.९

लातूर १६०.२धाराशिव ३०८

जळगाव ३९८४सोलापूर ५३

वर्धा ५२७.७नागपूर ८०.४

गडचिरोली १०.६एकूण ७४८९

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र