शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

Maharashtra: सलग ६ दिवस अवकाळीचा कहर, साडेसात हजार हेक्टर पिके उजाड

By नितीन चौधरी | Updated: April 13, 2024 18:02 IST

या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला बसला असून सुमारे चार हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.....

पुणे : राज्यात सुलभ सहाव्या दिवशी अर्थात शनिवारीही अवकाळीने विदर्भाला झोडपून काढले असून मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांत तब्बल साडेसात हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तर शुक्रवारी व शनिवारी झालेल्या अवकाळीच्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रविवारीदेखील विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला बसला असून सुमारे चार हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

राज्यात मंगळवारपासून (दि. ९) सलग सहा दिवस अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांना चांगले झोडपून काढले आहे. या अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा व गारपिटीमुळे शेतातील उभ्या पिकांच्या पिकांचे व काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात बारमाही पिकांमध्ये लिंबू, संत्रा, आंबा, चिकू, पपई, केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कलिंगड, खरबूज, उन्हाळी मूग, भुईमूग, रब्बी ज्वारी, गहू या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जळगावात सर्वाधिक नुकसान -

कृषी विभागाने मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांमध्ये झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज अहवाल राज्य सरकारला पाठवला असून त्यानुसार राज्यात ७ हजार ४८९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक ३ हजार ९८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकट्या जळगाव जिल्ह्यात झाले आहे. बीड जिल्ह्यातही १ हजार २० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून नांदेड जिल्ह्यात ७४८ हेक्टर तर वर्धा जिल्ह्यात ५२७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर शुक्रवारी व शनिवारीदेखील राज्यात राज्यातील विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीने चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे या दोन दिवसांच्या अहवालानंतर नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

आजही विदर्भात अवकाळीची शक्यता -

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर मात्र, हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. सलग सहा दिवस अवकाळीने झोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने झाले असून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सध्या निवडणूक आचारसंहितेची अडसर असून तो दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे विनंती केली जाणार असल्याचे मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी सांगितले.

अवकाळी पाऊसजिल्हा नुकसान हेक्टरमध्ये

संभाजीनगर १६३जालना १३३.३

परभणी २.६६हिंगोली २९७

नांदेड ७४८.५बीड १०२०.९

लातूर १६०.२धाराशिव ३०८

जळगाव ३९८४सोलापूर ५३

वर्धा ५२७.७नागपूर ८०.४

गडचिरोली १०.६एकूण ७४८९

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र