शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

Maharashtra: सलग ६ दिवस अवकाळीचा कहर, साडेसात हजार हेक्टर पिके उजाड

By नितीन चौधरी | Updated: April 13, 2024 18:02 IST

या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला बसला असून सुमारे चार हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.....

पुणे : राज्यात सुलभ सहाव्या दिवशी अर्थात शनिवारीही अवकाळीने विदर्भाला झोडपून काढले असून मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांत तब्बल साडेसात हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तर शुक्रवारी व शनिवारी झालेल्या अवकाळीच्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रविवारीदेखील विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला बसला असून सुमारे चार हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

राज्यात मंगळवारपासून (दि. ९) सलग सहा दिवस अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांना चांगले झोडपून काढले आहे. या अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा व गारपिटीमुळे शेतातील उभ्या पिकांच्या पिकांचे व काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यात बारमाही पिकांमध्ये लिंबू, संत्रा, आंबा, चिकू, पपई, केळी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कलिंगड, खरबूज, उन्हाळी मूग, भुईमूग, रब्बी ज्वारी, गहू या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जळगावात सर्वाधिक नुकसान -

कृषी विभागाने मंगळवार ते गुरुवार या तीन दिवसांमध्ये झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज अहवाल राज्य सरकारला पाठवला असून त्यानुसार राज्यात ७ हजार ४८९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक ३ हजार ९८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकट्या जळगाव जिल्ह्यात झाले आहे. बीड जिल्ह्यातही १ हजार २० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून नांदेड जिल्ह्यात ७४८ हेक्टर तर वर्धा जिल्ह्यात ५२७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर शुक्रवारी व शनिवारीदेखील राज्यात राज्यातील विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळीने चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे या दोन दिवसांच्या अहवालानंतर नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

आजही विदर्भात अवकाळीची शक्यता -

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार रविवारी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर मात्र, हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. सलग सहा दिवस अवकाळीने झोडपल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने झाले असून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सध्या निवडणूक आचारसंहितेची अडसर असून तो दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे विनंती केली जाणार असल्याचे मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी सांगितले.

अवकाळी पाऊसजिल्हा नुकसान हेक्टरमध्ये

संभाजीनगर १६३जालना १३३.३

परभणी २.६६हिंगोली २९७

नांदेड ७४८.५बीड १०२०.९

लातूर १६०.२धाराशिव ३०८

जळगाव ३९८४सोलापूर ५३

वर्धा ५२७.७नागपूर ८०.४

गडचिरोली १०.६एकूण ७४८९

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र