शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

देशात महाराष्ट्र खूपच गोड राज्य; यंदाही साखर उत्पादनात पहिला क्रमांक, १०५ लाख टन साखर उत्पादित

By नितीन चौधरी | Updated: May 5, 2023 12:18 IST

राज्यात साखरेची वार्षिक गरज ३५ लाख टन असून, त्याच्या तिप्पट म्हणजे १०५ लाख टन साखर उत्पादित होते

पुणे: राज्याचा ऊस गाळप हंगाम संपला असून यंदाही राज्याने साखर उत्पादनात अव्वल क्रमांक कायम राखला आहे. यंदा राज्यात १०५ लाख टन साखर उत्पादित झाली असून देशात दुस-या क्रमांकावर उत्तर प्रदेशात १०२ लाख टन साखर उत्पादन झाले आहे, अशी माहिती साखर आय़ुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. 

ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील साखर कारखान्यांची वार्षिक इथेनॉल निर्मिती क्षमता २२६ कोटी लिटरवरून २४४ कोटी लिटरपर्यंत वाढली आहे. पुढील वर्षाअखेरीस ती तीनशे कोटी लिटरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. तर पाच साखर कारखान्यांनी रसापासून इथेनॉल निर्मितीला सुरुवात केली आहे. या कारखान्यांनी साखर उत्पादन बंद केले आहे. पुढील काळात निर्यातीवरील बंदीमुळे आणखी काही कारखाने पूर्णपणे इथेनॉल उत्पादनकडे वळतील. त्यामुळे राज्याची वाटचाल ब्राझीलच्या दिशेने सुरू आहे.’’ कारखान्यांनी इथेनॉल विक्री केल्यानंतर तेल कंपन्या एकवीस दिवसांत पैसे देत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

राज्यातील १२२ सहकारी, खासगी व स्टँड अलोन कारखान्यांची २२६ कोटी लिटर इथेनॉल ब्लेंडिंग क्षमता तयार झाली आहे. यंदाच्या वर्षी साखर कारखान्यांना १३२ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचे आदेश मिळाले असून, आतापर्यंत ४८ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले. साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा

राज्यात साखरेची वार्षिक गरज ३५ लाख टन असून, त्याच्या तिप्पट म्हणजे १०५ लाख टन साखर उत्पादित होते. त्यापैकी २३ लाख टन साखर निर्यात होत असून, पर्यायाने देशाच्या साठ लाख टन साखर निर्यातीत राज्याचा मोठा वाटा आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून, जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आगामी काळातही राज्यातील साखर कारखानदारीचे भवितव्य उज्ज्वल राहणार असून, शेतकऱ्यांना समृद्ध करणारा मोठा उद्योग ठरणार आहे, असेही साखर आय़ुक्तांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्रUttar Pradeshउत्तर प्रदेशGovernmentसरकार