शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

देशात महाराष्ट्र खूपच गोड राज्य; यंदाही साखर उत्पादनात पहिला क्रमांक, १०५ लाख टन साखर उत्पादित

By नितीन चौधरी | Updated: May 5, 2023 12:18 IST

राज्यात साखरेची वार्षिक गरज ३५ लाख टन असून, त्याच्या तिप्पट म्हणजे १०५ लाख टन साखर उत्पादित होते

पुणे: राज्याचा ऊस गाळप हंगाम संपला असून यंदाही राज्याने साखर उत्पादनात अव्वल क्रमांक कायम राखला आहे. यंदा राज्यात १०५ लाख टन साखर उत्पादित झाली असून देशात दुस-या क्रमांकावर उत्तर प्रदेशात १०२ लाख टन साखर उत्पादन झाले आहे, अशी माहिती साखर आय़ुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. 

ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील साखर कारखान्यांची वार्षिक इथेनॉल निर्मिती क्षमता २२६ कोटी लिटरवरून २४४ कोटी लिटरपर्यंत वाढली आहे. पुढील वर्षाअखेरीस ती तीनशे कोटी लिटरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. तर पाच साखर कारखान्यांनी रसापासून इथेनॉल निर्मितीला सुरुवात केली आहे. या कारखान्यांनी साखर उत्पादन बंद केले आहे. पुढील काळात निर्यातीवरील बंदीमुळे आणखी काही कारखाने पूर्णपणे इथेनॉल उत्पादनकडे वळतील. त्यामुळे राज्याची वाटचाल ब्राझीलच्या दिशेने सुरू आहे.’’ कारखान्यांनी इथेनॉल विक्री केल्यानंतर तेल कंपन्या एकवीस दिवसांत पैसे देत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

राज्यातील १२२ सहकारी, खासगी व स्टँड अलोन कारखान्यांची २२६ कोटी लिटर इथेनॉल ब्लेंडिंग क्षमता तयार झाली आहे. यंदाच्या वर्षी साखर कारखान्यांना १३२ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचे आदेश मिळाले असून, आतापर्यंत ४८ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले. साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा

राज्यात साखरेची वार्षिक गरज ३५ लाख टन असून, त्याच्या तिप्पट म्हणजे १०५ लाख टन साखर उत्पादित होते. त्यापैकी २३ लाख टन साखर निर्यात होत असून, पर्यायाने देशाच्या साठ लाख टन साखर निर्यातीत राज्याचा मोठा वाटा आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून, जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आगामी काळातही राज्यातील साखर कारखानदारीचे भवितव्य उज्ज्वल राहणार असून, शेतकऱ्यांना समृद्ध करणारा मोठा उद्योग ठरणार आहे, असेही साखर आय़ुक्तांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्रUttar Pradeshउत्तर प्रदेशGovernmentसरकार