शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

देशात महाराष्ट्र खूपच गोड राज्य; यंदाही साखर उत्पादनात पहिला क्रमांक, १०५ लाख टन साखर उत्पादित

By नितीन चौधरी | Updated: May 5, 2023 12:18 IST

राज्यात साखरेची वार्षिक गरज ३५ लाख टन असून, त्याच्या तिप्पट म्हणजे १०५ लाख टन साखर उत्पादित होते

पुणे: राज्याचा ऊस गाळप हंगाम संपला असून यंदाही राज्याने साखर उत्पादनात अव्वल क्रमांक कायम राखला आहे. यंदा राज्यात १०५ लाख टन साखर उत्पादित झाली असून देशात दुस-या क्रमांकावर उत्तर प्रदेशात १०२ लाख टन साखर उत्पादन झाले आहे, अशी माहिती साखर आय़ुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. 

ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील साखर कारखान्यांची वार्षिक इथेनॉल निर्मिती क्षमता २२६ कोटी लिटरवरून २४४ कोटी लिटरपर्यंत वाढली आहे. पुढील वर्षाअखेरीस ती तीनशे कोटी लिटरपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. तर पाच साखर कारखान्यांनी रसापासून इथेनॉल निर्मितीला सुरुवात केली आहे. या कारखान्यांनी साखर उत्पादन बंद केले आहे. पुढील काळात निर्यातीवरील बंदीमुळे आणखी काही कारखाने पूर्णपणे इथेनॉल उत्पादनकडे वळतील. त्यामुळे राज्याची वाटचाल ब्राझीलच्या दिशेने सुरू आहे.’’ कारखान्यांनी इथेनॉल विक्री केल्यानंतर तेल कंपन्या एकवीस दिवसांत पैसे देत असल्याने शेतकऱ्यांना वेळेवर एफआरपी देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

राज्यातील १२२ सहकारी, खासगी व स्टँड अलोन कारखान्यांची २२६ कोटी लिटर इथेनॉल ब्लेंडिंग क्षमता तयार झाली आहे. यंदाच्या वर्षी साखर कारखान्यांना १३२ कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचे आदेश मिळाले असून, आतापर्यंत ४८ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले. साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा

राज्यात साखरेची वार्षिक गरज ३५ लाख टन असून, त्याच्या तिप्पट म्हणजे १०५ लाख टन साखर उत्पादित होते. त्यापैकी २३ लाख टन साखर निर्यात होत असून, पर्यायाने देशाच्या साठ लाख टन साखर निर्यातीत राज्याचा मोठा वाटा आहे. साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून, जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आगामी काळातही राज्यातील साखर कारखानदारीचे भवितव्य उज्ज्वल राहणार असून, शेतकऱ्यांना समृद्ध करणारा मोठा उद्योग ठरणार आहे, असेही साखर आय़ुक्तांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्रUttar Pradeshउत्तर प्रदेशGovernmentसरकार