शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

Maharashtra Election 2019 : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचा शपथनामा जाहीर : सुरक्षित व प्रदूषणमुक्त शहरांना प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 12:31 IST

गेल्या पाच वर्षांत राज्यात वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारीची भीषण स्थिती, राज्याच्या अर्थव्यवस्थेची झालेली घसरण आदी सर्व अधोगतीची आकडेवारीसह माहिती देण्यात आली आहे

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसचा निवडणुकीचा शपथनामा जाहीर

पुणे : शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी, सेंद्रिय शेती व आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देऊन ग्रामीण विकासावर भर देण्याबरोबरच आनंदी शहरे, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त शहरांना प्राधान्य, छेडछाडमुक्त महाराष्ट्र, पाच दिवसांचा आठवडा, राईट टू डिस्कनेक्ट अ‍ॅक्ट कायदा करण्याचे आश्वासन देऊन तरुण वर्गालादेखील खूष करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणिकाँग्रेसने आपल्या विधानसभा निवडणूक सन २०१९च्या शपथनाम्यामध्ये केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा समितीने हा शपथनामा तयार केला आहे. यामध्ये ग्रामीण, शहरी भागाच्या विकासासोबतच तरुण पिढीचा विचार करण्यात आला आहे. याशिवाय आघाडीची सत्ता असताना १५ वर्षांत कशी प्रगती केली आणि गेल्या पाच वर्षांत राज्याची कशी अधोगती झाली हे देखील आघाडीच्या शपथनाम्यात ठळकपणे मांडण्यात आले आहे. यात जलनीती तयार करणारे पहिले राज्य, गुटखा, पानमसाला बंदी घालणारे पहिले राज्य, ऑनलाईन दस्त नोंदणी करणारे पहिले राज्य, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शंभर टक्के रासायनिक तपासणी करणारे पहिले राज्य अशा प्रमुख सुमारे १५ ते २० योजना आघाडी सरकारच्या काळात करण्यात आल्याचे शपथनाम्यात स्पष्ट केले आहे. तर गेल्या पाच वर्षांत राज्यात वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारीची भीषण स्थिती, राज्याच्या अर्थव्यवस्थेची झालेली घसरण आदी सर्व अधोगतीची आकडेवारीसह माहिती देण्यात आली आहे............राज्यातील हवामान बदलाचे परिणाम रोखण्यासाठी केंद्राप्रमाणेच राज्य कृती योजना निश्चित करण्यात आलेली आहे. त्याची अंमलबजावणी करणार. तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी कृती योजना निश्चित करणे, राज्यातील २८ शहरांतील हवेची गुणवत्ता आरोग्यास घातक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. 

.........

ही परिस्थिती बदलण्यासाठी हरित ऊर्जा, वृक्षसंवर्धन व वाढ आणि व्यापक जनजागरणाचे कार्यक्रम हाती घेणार असल्याचे आश्वासन दिले. डिजिटल कार्यसंस्कृतीमुळे कामाची वेळ, ठिकाण या गोष्टी अर्थहीन ठरत असून, कर्मचारी २४ तास उपलब्ध असल्यासारखे राबवून घेतले जाते. यामुळे तरुण पिढीच्या आरोग्यावर, स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत आहेत. यामुळेच  तरुण पिढीच्या भविष्याचा विचार करून राज्यात राईट टू डिस्कनेक्ट कायदा लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसElectionनिवडणूकPoliticsराजकारण