शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Maharashtra: राज्यात ३० कारखान्यांचे बॉयलर थंडच! ऊसदर आंदोलनाचा फटका, साखर उत्पादनात घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 10:39 IST

आंदोलनामुळे अद्याप ३० कारखाने सुरू झालेले नाहीत. त्यामुळे साखर उत्पादनात सहा लाख टनांची घट झाली आहे....

पुणे :ऊस दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चांगलेच पेटले आहे. परिणामी राज्यातील साखर उत्पादन घटले. १ नोव्हेंबरला सुरू झालेल्या साखर हंगामात आतापर्यंत केवळ ८ लाख टन साखर उत्पादन झाले. गेल्या वर्षी याच २३ दिवसांच्या काळात सुमारे १४ लाख टन साखर उत्पादन झाले होते. आंदोलनामुळे अद्याप ३० कारखाने सुरू झालेले नाहीत. त्यामुळे साखर उत्पादनात सहा लाख टनांची घट झाली आहे.

राज्यातील ऊस गाळप हंगाम यंदा १ नोव्हेंबर रोजी सुरू झाला; मात्र, ऊसदराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील काही साखर कारखाने अद्याप सुरूच होऊ शकलेले नाही. परिणामी साखर उत्पादनही घटले आहे.

गतवर्षी २३ नोव्हेंबरपर्यंत राज्यात ९१ सहकारी आणि ९२ खासगी असे १८३ कारखाने सुरू झाले होते. या कारखान्यांनी १६६ लाख टन उसाचे गाळप करून १४ लाख टन साखरेचे उत्पादन केले होते. सरासरी साखर उतारा ८.४ टक्के होता. मात्र, यंदा शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे आतापर्यंत ७६ सहकारी व ७८ खासगी असे एकूण १५४ कारखाने सुरू होऊ शकले आहेत. अर्थात गेल्या वर्षाच्या तुलनेत २९ कारखान्यांचे उत्पादन सुरू झालेले नाही. सुरू झालेल्या कारखान्यांनी आतापर्यंत १०५ लाख टन ऊसगाळप केले असून, त्यातून ८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ७.६१ टक्के मिळाला आहे.

आंदोलन सुरू असलेल्या कोल्हापूर विभागात १४ सहकारी आणि ८ खासगी कारखान्यांनी मिळून केवळ १४ लाख टन उसाचे गाळप केले. त्यातून १.१६ लाख टन साखरेचे उत्पादन होऊ शकले आहे.

विभागनिहाय सुरू झालेले कारखाने व उत्पादन :

विभाग : कारखाने गाळप (लाख टन) : उत्पादन (लाख टन) : उतारा (टक्के)

कोल्हापूर : २२ : १४.१३ : १.१६ : ८.२४

पुणे : २२ : २२.६६ : १.८४ : ८.१६

सोलापूर : ३८ : २४.३ : १.७७ : ७.३

नगर : २१ : १५.५३ : १.१६ : ७.५

संभाजीनगर : २२ : १२.५२ : ०.८ : ६.६१

नांदेड : २७ : १५.१२ : १.१५ : ७.६२

अमरावती : २ : १.३७ : ०.१ : ८.२५

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtraमहाराष्ट्रRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरीsugarcaneऊस