शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maharashtra Bandh: पंतप्रधानांच्या कानापर्यंत आवाज जाण्यासाठी पुकारला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 14:29 IST

महाविकास आघाडीने पुढाकार घेत पंतप्रधानांच्या कानापर्यंत आवाज जावा म्हणून बंद पुकारला आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारबद्दल देशात तीव्र नाराजीची भावना

पुणे : लखीमपूर हत्या, वर्षभराचे शेतकरी आंदोलन याकडे पंतप्रधान लक्ष द्यायला तयार नाहीत. नागरिकांचा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहचावा या उद्देशाने बंद पुकारला आहे असे महाविकास आघाडीने स्पष्ट केले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी पुण्यात काँग्रेस भवनमध्ये शुक्रवारी दुपारी महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबर ला पुकारलेल्या बंद मागची भूमिका विषद केली.

''केंद्र सरकारबद्दल देशात तीव्र नाराजीची भावना आहे. शेतकरी आंदोलन, लखीमपूर प्रकरण, राज्यातील नेत्यांच्या नातेवाईकांना सरकारी एजन्सीचा वापर करून त्रास या सर्व प्रकारांबद्दल जनतेत संताप आहे. महाराष्ट्र नेहमीच देशहिताच्या भूमिकेतून काम करत आला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीने पुढाकार घेत पंतप्रधानांच्या कानापर्यंत आवाज जावा म्हणून बंद पुकारला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.''

आमदार चेतन तुपे, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, रिक्षा पंचायतीचे नितीन पवार, लोकायत चे नीरज जैन यावेळी उपस्थित होते. ''रिक्षा पंचायत, लोकायत यासारख्या समविचारी संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येईल, नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले.''

११ ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद 'ची हाक

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीने ' महाराष्ट्र बंद 'ची हाक दिली आहे. ११ ऑक्टोबर रोजी या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यव्यापी बंद पाळावा, असे आवाहन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी मिळून केले आहे.  

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा