शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh: पंतप्रधानांच्या कानापर्यंत आवाज जाण्यासाठी पुकारला बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 14:29 IST

महाविकास आघाडीने पुढाकार घेत पंतप्रधानांच्या कानापर्यंत आवाज जावा म्हणून बंद पुकारला आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकारबद्दल देशात तीव्र नाराजीची भावना

पुणे : लखीमपूर हत्या, वर्षभराचे शेतकरी आंदोलन याकडे पंतप्रधान लक्ष द्यायला तयार नाहीत. नागरिकांचा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहचावा या उद्देशाने बंद पुकारला आहे असे महाविकास आघाडीने स्पष्ट केले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, शिवसेनेचे संजय मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी पुण्यात काँग्रेस भवनमध्ये शुक्रवारी दुपारी महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबर ला पुकारलेल्या बंद मागची भूमिका विषद केली.

''केंद्र सरकारबद्दल देशात तीव्र नाराजीची भावना आहे. शेतकरी आंदोलन, लखीमपूर प्रकरण, राज्यातील नेत्यांच्या नातेवाईकांना सरकारी एजन्सीचा वापर करून त्रास या सर्व प्रकारांबद्दल जनतेत संताप आहे. महाराष्ट्र नेहमीच देशहिताच्या भूमिकेतून काम करत आला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीने पुढाकार घेत पंतप्रधानांच्या कानापर्यंत आवाज जावा म्हणून बंद पुकारला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.''

आमदार चेतन तुपे, माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, रिक्षा पंचायतीचे नितीन पवार, लोकायत चे नीरज जैन यावेळी उपस्थित होते. ''रिक्षा पंचायत, लोकायत यासारख्या समविचारी संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येईल, नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले.''

११ ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद 'ची हाक

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीने ' महाराष्ट्र बंद 'ची हाक दिली आहे. ११ ऑक्टोबर रोजी या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यव्यापी बंद पाळावा, असे आवाहन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी मिळून केले आहे.  

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा