शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

...तर महाराष्ट्रात वेगळं चित्र पाहायला मिळेल; अजितदादांनी सांगितलं महाविकास आघाडीचं भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 13:16 IST

काल राज्यात विधान परिषदेचा निकाल जाहीर झाला, या निकालात अनेकांना धक्के बसले आहेत, असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

पुणे- काल राज्यात विधान परिषदेचा निकाल जाहीर झाला, या निकालात अनेकांना धक्के बसले आहेत. काँग्रेसने सत्यजीत तांबेंना उमेदवारी दिली असती तर नवा चेहरा म्हणून समोर आले असते. राज्यात तोडफोडीच राजकारण चालत नाही, असं या निकालावरुन दिसतं, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे यांनी अजित पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गौप्यस्फोट केले.

'भाजपची सत्ता केंद्रात आणि राज्यात असुनही त्यांना उमेदवार मिळालेले नाहीत. महाविकास आघाडी इथून पुढच्या काळात अधिक चांगल्या प्रकारे विचारपूर्वक उमेदवार देण्यासाठी आणि समंजस भूमिका सर्वांनी दाखवली तर महाराष्ट्रात उद्याच्या काळात वेगळी परिस्थिती दिसेल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. 

एवढे आमदार फुटताहेत हे सत्तेत असूनही कळलं नाही का?; अजित पवारांनी सांगितलं 'तेव्हा' नेमकं काय झालं

'राज्यात तोडाफोडीचे राजकारण केले तर ते चालत नाही हे राज्यातील शिक्षकांनी दाखवून दिले आहे. राज्यात महाविकास आघाडीने कोरोना काळात चांगले काम केले आहे, असंही अजित पवार म्हणाले. 

अजित पवारांनी सांगितलं 'तेव्हा' नेमकं काय झालं

शिवसेना पक्षात अभूतपूर्व फूट पडून राज्यानं ऐतिहासिक सत्तांतर पाहिलं. नवं सरकार सत्तेत येऊन आता काही महिनेही उलटले आहेत. पण असं असतानाही सत्ताधारी पक्षाला इतक्या मोठ्या बंडाची जराशीही कल्पना नव्हती यावर अजूनही अनेकांचा विश्वास बसत नाही. राज्यातील या ऐतिहासिक राजकीय घडमोडींबाबत आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. 

आमदार फुटणार आहेत हे आधीच कळलं होतं. तसं उद्धव ठाकरेंना आम्ही कळवलं देखील होतं, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे यांनी अजित पवारांची मुलाखत घेतली. त्यात अजित पवार बोलत होते. एवढे आमदार फुटताहेत हे सत्तेत असूनही कळलं नाही का? या प्रश्नाच्या उत्तरात अजित पवार यांनी पडद्यामागची सर्व कहाणी सांगितली. 

"दोन-तीन वेळेला तशी माहितीही मिळाली होती. पवार साहेबांनीही उद्धवजींना माहिती दिली. मीही त्यांना माहिती दिली होती. शरद पवारांनी तर बैठक देखील घेतली होती. पण उद्धव ठाकरे म्हणायचे की मला माझ्या आमदारांवर विश्वास आहे. ते इतकी टोकाची भूमिका घेणार नाहीत असं त्यांना वाटायचं. पण जो पहिला ग्रूप १५-१६ आमदारांचा गेला. त्यानंतर आमदारांना एकजुटीनं सोबत ठेवण्याची गरज होती. तशाप्रकारची गरज त्यावेळी दाखवली गेली नाही. मग मुभा असल्यासारखं तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, ज्यांना थांबायचं आहे त्यांनी इथं थांबा असं वातावरण त्यावेळी पाहायला मिळालं. आता वस्तुस्थिती काय हे त्यापक्षाचेच नेते सांगू शकतील", असं अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणेShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवार