शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पक्षांतर बंदी कायदा बळकट करण्याऐवजी पळवाटा; संसदीय लोकशाहीसाठी घातक परिस्थिती - डॉ. उल्हास बापट

By राजू इनामदार | Updated: February 15, 2024 19:52 IST

शिवसेना, राष्ट्रवादी यांच्याबाबत खरा निर्णय मतदारच देणार, त्यामुळे त्याची वाट पाहण्याशिवाय सध्या तरी दुसरे काही हातात नाही

पुणे: दिवंगत राजीव गांधी यांनी पक्षांतराला आळा बसावा यासाठी पक्षांतर बंदी कायदा केला, मात्र तो बळकट करण्याऐवजी त्यातून पळवाटा काढल्या जात आहेत अशी टीका घटनेचे अभ्यासक डॉ. उल्हास बापट यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीवर दिलेल्या निकारासंदर्भात व्यक्त केली. संसदीय लोकशाहीसाठी हे घातक असून या निकालात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांना भंग केलेला दिसतो असे ते म्हणाले.

घटनेच्या १० व्या कलमात पक्षांतर बंदीविषयी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्याशिवाय या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मूळ पक्ष महत्वाचा, त्याची घटना महत्वाची, त्या पक्षाचे खासदार किंवा आमदार यांचे बहुमत आहे की नाही हा भाग दुय्यम असे त्यात म्हटले होते. नार्वेकर यांनी मात्र निकाल देताना खासदार आमदार यांचे बहुमतच लक्षात घेतलेले दिसते असे बापट म्हणाले.

पक्षातंर्गत मतभेद हे कायद्याचा भंग समजता येणार नाही हा त्यांचा समजही असाच कायद्यातील पळवाट शोधण्याचा प्रयत्न आहे. पक्षांतर बंदी कायदा हा लोकशाही बळकट व्हावी यासाठी केलेला कायदा आहे. तो मजबूत करण्याचे प्रयत्न होणे अपेक्षित आहेत, मात्र प्रत्यक्षात हा कायदा विसविशीत करण्याचा प्रयत्न होत आहे असे मत बापट यांनी व्यक्त केले. यापुढे अशा प्रकरणांमध्ये निर्णय घेताना याच निकालाचा आधार घेतला जाईल. त्यामुळे मूळ पक्ष, त्याची घटना हे सगळे दुय्यम समजले जाईल अशी भितीही बापट यांनी व्यक्त केली.

ज्या देशांचा आपण घटना तयार करताना आधार घेतला त्या देशांमध्ये सभागृहाच्या अध्यक्षाची निवड झाली की सर्वप्रथम तो आपल्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा देतो. त्याने सभागृहात निपक्षपाती पंच म्हणून काम करणे अपेक्षित असते. त्यामुळेच तो आपल्या पक्षाचा त्याग करतो. आपल्याकडे तसे होत नाही. विधानसभेचे अध्यक्ष त्यांच्या पक्षाचे सदस्य असतातच. त्यामुळेच त्यांच्याकडूनच निपक्षपातीपणाचे निर्णय घेतले जात नसावेत असे बापट यांनी सांगितले.

बापट म्हणाले, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन्हीही पक्ष, ज्यांच्या विरोधात निकाल लागला आहे ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांच्याकडून योग्य निर्णय होईल असे वाटते. या प्रकरणात खरा निर्णय जनता म्हणजे मतदारच देणार आहेत, त्यामुळे त्याची वाट पाहण्याशिवाय सध्या तरी दुसरे काही हातात नाही.

टॅग्स :PuneपुणेRahul Narvekarराहुल नार्वेकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाCourtन्यायालयAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार