शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
3
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
4
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
5
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य तिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
6
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
7
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
8
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
9
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
10
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
12
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
13
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
14
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
15
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
16
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
17
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
18
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
19
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
20
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी

पक्षांतर बंदी कायदा बळकट करण्याऐवजी पळवाटा; संसदीय लोकशाहीसाठी घातक परिस्थिती - डॉ. उल्हास बापट

By राजू इनामदार | Updated: February 15, 2024 19:52 IST

शिवसेना, राष्ट्रवादी यांच्याबाबत खरा निर्णय मतदारच देणार, त्यामुळे त्याची वाट पाहण्याशिवाय सध्या तरी दुसरे काही हातात नाही

पुणे: दिवंगत राजीव गांधी यांनी पक्षांतराला आळा बसावा यासाठी पक्षांतर बंदी कायदा केला, मात्र तो बळकट करण्याऐवजी त्यातून पळवाटा काढल्या जात आहेत अशी टीका घटनेचे अभ्यासक डॉ. उल्हास बापट यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फाटाफुटीवर दिलेल्या निकारासंदर्भात व्यक्त केली. संसदीय लोकशाहीसाठी हे घातक असून या निकालात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांना भंग केलेला दिसतो असे ते म्हणाले.

घटनेच्या १० व्या कलमात पक्षांतर बंदीविषयी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. त्याशिवाय या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मूळ पक्ष महत्वाचा, त्याची घटना महत्वाची, त्या पक्षाचे खासदार किंवा आमदार यांचे बहुमत आहे की नाही हा भाग दुय्यम असे त्यात म्हटले होते. नार्वेकर यांनी मात्र निकाल देताना खासदार आमदार यांचे बहुमतच लक्षात घेतलेले दिसते असे बापट म्हणाले.

पक्षातंर्गत मतभेद हे कायद्याचा भंग समजता येणार नाही हा त्यांचा समजही असाच कायद्यातील पळवाट शोधण्याचा प्रयत्न आहे. पक्षांतर बंदी कायदा हा लोकशाही बळकट व्हावी यासाठी केलेला कायदा आहे. तो मजबूत करण्याचे प्रयत्न होणे अपेक्षित आहेत, मात्र प्रत्यक्षात हा कायदा विसविशीत करण्याचा प्रयत्न होत आहे असे मत बापट यांनी व्यक्त केले. यापुढे अशा प्रकरणांमध्ये निर्णय घेताना याच निकालाचा आधार घेतला जाईल. त्यामुळे मूळ पक्ष, त्याची घटना हे सगळे दुय्यम समजले जाईल अशी भितीही बापट यांनी व्यक्त केली.

ज्या देशांचा आपण घटना तयार करताना आधार घेतला त्या देशांमध्ये सभागृहाच्या अध्यक्षाची निवड झाली की सर्वप्रथम तो आपल्या पक्षसदस्यत्वाचा राजीनामा देतो. त्याने सभागृहात निपक्षपाती पंच म्हणून काम करणे अपेक्षित असते. त्यामुळेच तो आपल्या पक्षाचा त्याग करतो. आपल्याकडे तसे होत नाही. विधानसभेचे अध्यक्ष त्यांच्या पक्षाचे सदस्य असतातच. त्यामुळेच त्यांच्याकडूनच निपक्षपातीपणाचे निर्णय घेतले जात नसावेत असे बापट यांनी सांगितले.

बापट म्हणाले, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन्हीही पक्ष, ज्यांच्या विरोधात निकाल लागला आहे ते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यांच्याकडून योग्य निर्णय होईल असे वाटते. या प्रकरणात खरा निर्णय जनता म्हणजे मतदारच देणार आहेत, त्यामुळे त्याची वाट पाहण्याशिवाय सध्या तरी दुसरे काही हातात नाही.

टॅग्स :PuneपुणेRahul Narvekarराहुल नार्वेकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाCourtन्यायालयAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार