शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

एक, दोन नाही तर सहा वेळा क्वारंटाइनचा अनुभव घेतलेला ' तो ' काय म्हणतो बघा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 13:18 IST

पुण्यातील रुग्णाने १९९८ पासून २००६ पर्यंत ६ वेळा घेतला अनुभव

ठळक मुद्देक्वारंटाइन रुग्ण आपले बांधवच, त्यांना गावांनी वाळीत टाकू नये

अमृत सहाणे-पुणे : क्वारंटाइन म्हणजे नेमकं काय? हा अनुभव पुण्यातील एका रुग्णाने १९९८ ते २००६ या काळात तब्बल ६ वेळा घेतला आहे. मुंबईतील टाटा हॉस्पिटलमधील रेडिएशन मेडिसिन सेंटरमध्ये झालेल्या उपचाराचा अनुभव रुग्णाने लोकमतकडे व्यक्त केला. तसेच क्वारंटाइन (विलगीकरण) रुग्ण आपले बांधवच आहेत, त्यांना गावांनी वाळीत टाकू नये, असे आवाहनही केले आहे.एका रुग्णाला १९९८ मध्ये गळ्याजवळ छोटीशी गाठ असल्याचे जाणवले. त्यांनी पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात सर्व तपासण्या केल्या. डॉक्टरांनी आॅपरेशन ठरवले.  कॅन्सरमधील एक प्रकार थायरॉईड असल्याचे निदान झाले. यावेळी ते १७ वर्षांचे होते. घरातील सर्वजण चिंतेत होते. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये जावे लागेल आणि आयुष्यभर एक गोळी घ्यावी लागेल याची कल्पना दिली. रुग्णाने जिद्दीने होकार दिला आणि घरातील आई-वडिलांनी देखील मुंबईला जाण्याची तयारी केली.दरम्यान पुण्यातील आणखी एका डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यानंतर कमला नेहरू येथे दुसºयांदा छोटेसे आॅपरेशन झाले. सगळे अहवाल घेऊन ते मुंबईत नातेवाईंकाच्या घरी गेले. टाटा हॉस्पिटलमध्ये अ?ॅडमिट झाले. तेथे आॅपरेशन झाले. सगळ््या तपासण्या झाल्या. त्यानंतर रेडिएशन मेडिसिन सेंटरमध्ये औषध देऊन क्वारंटाइनसाठी चार ते पाच दिवस ठेवण्याचे निश्चित झाले. या वेळी काय काळजी घ्यावी, याची माहिती डॉक्टरांनी दिली. जून १९९८ ला पहिल्यांदा औषध दिल्यानंतर दोन रूममध्ये चौघांना क्वारंटाइन केले होते. औषध घेतल्यानंतर रूममध्ये जायचे, आत जाताना टॉवेल, ब्रश, पेस्ट, साबण एवढेच आत घेऊन जायचे. शरीरातील औषधाचे प्रमाण कमी होत नाही, तोपर्यंत रूममधून बाहेर काढत नव्हते. डॉक्टर दिवसातून दोन वेळा औषधाचे प्रमाण मशिनद्वारे तपासत होते.चार ते पाच दिवसांनी रूममधून बाहेर येताना अंघोळ करून बाहेर येणे सर्व कपडे साहित्य त्या रूममध्येच सोडणे नंतर परत दुसºया रूममध्ये आल्यावर अंघोळ करून मग बेडवर जावे लागत, असा हा संघर्ष सात वर्षे करावा लागला आहे. क्वारंटाइन असताना वॉर्डबॉय, मावशींपासून ते नर्स, डॉक्टर हे सर्व एका कुटुंबांप्रमाणे जपतात, काळजी घेतात. इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी क्वारंटाईन केले जाते. त्यात काळजी घेणे एवढेच अपेक्षित असते.

कोरोना संशयितांना वाळित टाकू नकाआता कोरोनाचे जे संकट जगावर आलेले आहे. यात आपल्या देशातील परदेशातून आलेल्या लोकांना होम क्वारंटाइनचे शिक्के मारले जात आहेत. अनेकांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र, क्वारंटाइन केलेले रुग्ण हे आपले बांधवच आहेत. त्यांना वाळीत न टाकता त्यांच्यापासून संसर्ग होणार नाही, एवढीच काळजी घ्यायला हवी. सरकारने वेळोवेळी केलेल्या सूचना आणि आदेशांचे पालन करून सर्वांनीच घरी थांबून स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन आता ठणठणीत बरे झालेल्या रुग्णाने केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर