शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

एक, दोन नाही तर सहा वेळा क्वारंटाइनचा अनुभव घेतलेला ' तो ' काय म्हणतो बघा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 13:18 IST

पुण्यातील रुग्णाने १९९८ पासून २००६ पर्यंत ६ वेळा घेतला अनुभव

ठळक मुद्देक्वारंटाइन रुग्ण आपले बांधवच, त्यांना गावांनी वाळीत टाकू नये

अमृत सहाणे-पुणे : क्वारंटाइन म्हणजे नेमकं काय? हा अनुभव पुण्यातील एका रुग्णाने १९९८ ते २००६ या काळात तब्बल ६ वेळा घेतला आहे. मुंबईतील टाटा हॉस्पिटलमधील रेडिएशन मेडिसिन सेंटरमध्ये झालेल्या उपचाराचा अनुभव रुग्णाने लोकमतकडे व्यक्त केला. तसेच क्वारंटाइन (विलगीकरण) रुग्ण आपले बांधवच आहेत, त्यांना गावांनी वाळीत टाकू नये, असे आवाहनही केले आहे.एका रुग्णाला १९९८ मध्ये गळ्याजवळ छोटीशी गाठ असल्याचे जाणवले. त्यांनी पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात सर्व तपासण्या केल्या. डॉक्टरांनी आॅपरेशन ठरवले.  कॅन्सरमधील एक प्रकार थायरॉईड असल्याचे निदान झाले. यावेळी ते १७ वर्षांचे होते. घरातील सर्वजण चिंतेत होते. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये जावे लागेल आणि आयुष्यभर एक गोळी घ्यावी लागेल याची कल्पना दिली. रुग्णाने जिद्दीने होकार दिला आणि घरातील आई-वडिलांनी देखील मुंबईला जाण्याची तयारी केली.दरम्यान पुण्यातील आणखी एका डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यानंतर कमला नेहरू येथे दुसºयांदा छोटेसे आॅपरेशन झाले. सगळे अहवाल घेऊन ते मुंबईत नातेवाईंकाच्या घरी गेले. टाटा हॉस्पिटलमध्ये अ?ॅडमिट झाले. तेथे आॅपरेशन झाले. सगळ््या तपासण्या झाल्या. त्यानंतर रेडिएशन मेडिसिन सेंटरमध्ये औषध देऊन क्वारंटाइनसाठी चार ते पाच दिवस ठेवण्याचे निश्चित झाले. या वेळी काय काळजी घ्यावी, याची माहिती डॉक्टरांनी दिली. जून १९९८ ला पहिल्यांदा औषध दिल्यानंतर दोन रूममध्ये चौघांना क्वारंटाइन केले होते. औषध घेतल्यानंतर रूममध्ये जायचे, आत जाताना टॉवेल, ब्रश, पेस्ट, साबण एवढेच आत घेऊन जायचे. शरीरातील औषधाचे प्रमाण कमी होत नाही, तोपर्यंत रूममधून बाहेर काढत नव्हते. डॉक्टर दिवसातून दोन वेळा औषधाचे प्रमाण मशिनद्वारे तपासत होते.चार ते पाच दिवसांनी रूममधून बाहेर येताना अंघोळ करून बाहेर येणे सर्व कपडे साहित्य त्या रूममध्येच सोडणे नंतर परत दुसºया रूममध्ये आल्यावर अंघोळ करून मग बेडवर जावे लागत, असा हा संघर्ष सात वर्षे करावा लागला आहे. क्वारंटाइन असताना वॉर्डबॉय, मावशींपासून ते नर्स, डॉक्टर हे सर्व एका कुटुंबांप्रमाणे जपतात, काळजी घेतात. इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी क्वारंटाईन केले जाते. त्यात काळजी घेणे एवढेच अपेक्षित असते.

कोरोना संशयितांना वाळित टाकू नकाआता कोरोनाचे जे संकट जगावर आलेले आहे. यात आपल्या देशातील परदेशातून आलेल्या लोकांना होम क्वारंटाइनचे शिक्के मारले जात आहेत. अनेकांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र, क्वारंटाइन केलेले रुग्ण हे आपले बांधवच आहेत. त्यांना वाळीत न टाकता त्यांच्यापासून संसर्ग होणार नाही, एवढीच काळजी घ्यायला हवी. सरकारने वेळोवेळी केलेल्या सूचना आणि आदेशांचे पालन करून सर्वांनीच घरी थांबून स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन आता ठणठणीत बरे झालेल्या रुग्णाने केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर