शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

एक, दोन नाही तर सहा वेळा क्वारंटाइनचा अनुभव घेतलेला ' तो ' काय म्हणतो बघा....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 13:18 IST

पुण्यातील रुग्णाने १९९८ पासून २००६ पर्यंत ६ वेळा घेतला अनुभव

ठळक मुद्देक्वारंटाइन रुग्ण आपले बांधवच, त्यांना गावांनी वाळीत टाकू नये

अमृत सहाणे-पुणे : क्वारंटाइन म्हणजे नेमकं काय? हा अनुभव पुण्यातील एका रुग्णाने १९९८ ते २००६ या काळात तब्बल ६ वेळा घेतला आहे. मुंबईतील टाटा हॉस्पिटलमधील रेडिएशन मेडिसिन सेंटरमध्ये झालेल्या उपचाराचा अनुभव रुग्णाने लोकमतकडे व्यक्त केला. तसेच क्वारंटाइन (विलगीकरण) रुग्ण आपले बांधवच आहेत, त्यांना गावांनी वाळीत टाकू नये, असे आवाहनही केले आहे.एका रुग्णाला १९९८ मध्ये गळ्याजवळ छोटीशी गाठ असल्याचे जाणवले. त्यांनी पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात सर्व तपासण्या केल्या. डॉक्टरांनी आॅपरेशन ठरवले.  कॅन्सरमधील एक प्रकार थायरॉईड असल्याचे निदान झाले. यावेळी ते १७ वर्षांचे होते. घरातील सर्वजण चिंतेत होते. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये जावे लागेल आणि आयुष्यभर एक गोळी घ्यावी लागेल याची कल्पना दिली. रुग्णाने जिद्दीने होकार दिला आणि घरातील आई-वडिलांनी देखील मुंबईला जाण्याची तयारी केली.दरम्यान पुण्यातील आणखी एका डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यानंतर कमला नेहरू येथे दुसºयांदा छोटेसे आॅपरेशन झाले. सगळे अहवाल घेऊन ते मुंबईत नातेवाईंकाच्या घरी गेले. टाटा हॉस्पिटलमध्ये अ?ॅडमिट झाले. तेथे आॅपरेशन झाले. सगळ््या तपासण्या झाल्या. त्यानंतर रेडिएशन मेडिसिन सेंटरमध्ये औषध देऊन क्वारंटाइनसाठी चार ते पाच दिवस ठेवण्याचे निश्चित झाले. या वेळी काय काळजी घ्यावी, याची माहिती डॉक्टरांनी दिली. जून १९९८ ला पहिल्यांदा औषध दिल्यानंतर दोन रूममध्ये चौघांना क्वारंटाइन केले होते. औषध घेतल्यानंतर रूममध्ये जायचे, आत जाताना टॉवेल, ब्रश, पेस्ट, साबण एवढेच आत घेऊन जायचे. शरीरातील औषधाचे प्रमाण कमी होत नाही, तोपर्यंत रूममधून बाहेर काढत नव्हते. डॉक्टर दिवसातून दोन वेळा औषधाचे प्रमाण मशिनद्वारे तपासत होते.चार ते पाच दिवसांनी रूममधून बाहेर येताना अंघोळ करून बाहेर येणे सर्व कपडे साहित्य त्या रूममध्येच सोडणे नंतर परत दुसºया रूममध्ये आल्यावर अंघोळ करून मग बेडवर जावे लागत, असा हा संघर्ष सात वर्षे करावा लागला आहे. क्वारंटाइन असताना वॉर्डबॉय, मावशींपासून ते नर्स, डॉक्टर हे सर्व एका कुटुंबांप्रमाणे जपतात, काळजी घेतात. इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी क्वारंटाईन केले जाते. त्यात काळजी घेणे एवढेच अपेक्षित असते.

कोरोना संशयितांना वाळित टाकू नकाआता कोरोनाचे जे संकट जगावर आलेले आहे. यात आपल्या देशातील परदेशातून आलेल्या लोकांना होम क्वारंटाइनचे शिक्के मारले जात आहेत. अनेकांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र, क्वारंटाइन केलेले रुग्ण हे आपले बांधवच आहेत. त्यांना वाळीत न टाकता त्यांच्यापासून संसर्ग होणार नाही, एवढीच काळजी घ्यायला हवी. सरकारने वेळोवेळी केलेल्या सूचना आणि आदेशांचे पालन करून सर्वांनीच घरी थांबून स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन आता ठणठणीत बरे झालेल्या रुग्णाने केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर