शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उजनीकडे नजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 00:17 IST

जिल्ह्याच्या पश्चिम भागाला गेल्या आठवड्यात पावसाने झोडपून काढले असले, तरी पूर्व भागातील तालुके अजूनही कोरडेच आहेत. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी अजूनही दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.

राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात अद्यापही पाऊसच न पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. मात्र पुणे परिसरातील धरणक्षेत्रांत गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडला असल्याने उजनी धरणाची शंभर टक्क्यांकडे वाटचाल चालू असल्याने त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.त्यामुळे धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

धरणाची शंभर टक्क्यांकडे वाटचाल : पाऊस नसल्याने उसाला पर्यायी पिके घेतली

जिल्ह्याच्या पश्चिम भागाला गेल्या आठवड्यात पावसाने झोडपून काढले असले, तरी पूर्व भागातील तालुके अजूनही कोरडेच आहेत. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी अजूनही दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज , मलठण, हिंगणी बेर्डी, शिरापूर इत्यादी गावांना उजनी धरणाचे बॅकवॉटर म्हणजे या भागाला मिळालेले वरदान आहे. या पाण्यावरच हा भाग सुजलाम्-सुफलाम् झाला आहे. दरम्यान, त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिक दुथडी भरून वाहणाºया भीमा नदीचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी नदीकिनारी गर्दी करीत आहेत. या परिसरात दर वर्षी साधारणच पाऊस होत असला, तरी पुणे परिसरातील धरणसाखळीत भरपूर पाऊस पडून उजनी धरण भरण्याची वाट या भागातील शेतकरी पाहत असतात.

दरम्यान, आॅगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा आला, तरी या भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने या परिसरातील विहिरी, कूपनलिका हे पाण्याचे स्रोत अद्यापही कोरडेच आहेत. त्यामुळे पुरेशा पाण्याअभावी परिसरात उसाच्या लागवडीच्या प्रमाणात खूप घट झाली आहे. उसाला पर्याय म्हणून यंदा मका, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद या पिकांकडे शेतकरी वळलेला दिसून येत आहे. जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या थोड्याफार पावसाच्या ओलीवर या पिकांच्या पेरण्या केल्या. परंतु, त्यानंतर समाधानकारक पाऊस न झाल्याने पिके सुकून चालली आहेत. गेले तीन-चार दिवस या भागात आकाशात काळे ढग दाटून येत आहेत; परंतु फक्त भुरभुर आणि एखादीदुसरी हलकी पावसाची सर येत असल्याने शेतकरी शेतात करीत असलेल्या कामाचा खोळंबा होत असल्याचे सर्वसाधारण चित्र आहे. त्यामुळे दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील बळीराजा वरुणराजाची चातकासारखी प्रतीक्षा करीत आहे.

टॅग्स :DamधरणFarmerशेतकरी