शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 03:59 IST

पंतप्रधान मोदी यांच्या सोमवारी राज्यात सोलापूर, कऱ्हाड आणि पुणे येथे जाहीर सभा झाल्या. या तीनही ठिकाणी त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीकास्त्र सोडले. 

पुणे, कऱ्हाड, सोलापूर : आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करून भाजपच्या अनेक नेत्यांच्या आवाजात फेक व्हिडीओ तयार करण्याचे काम सुरू आहे. शांततेत निवडणुका होऊ नयेत, यासाठी येत्या महिनाभरात देशात काहीतरी अघटित घटना घडविण्याचा विरोधकांचा डाव आहे, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. जिवंत असेपर्यंत संविधान बदलू देणार नाही आणि धर्माच्या नावावर आरक्षण आणण्याचा प्रयत्न करू देणार नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. शरद पवार यांना लक्ष्य करीत ‘भटकती आत्मा’ अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली.

 पंतप्रधान मोदी यांच्या सोमवारी राज्यात सोलापूर, कऱ्हाड आणि पुणे येथे जाहीर सभा झाल्या. या तीनही ठिकाणी त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीकास्त्र सोडले.  कऱ्हाड येथे मोदी म्हणाले, या देशामध्ये काँग्रेसने प्रदीर्घ काळ राज्य केले. परंतु, भारतीय सैनिकांना ‘’वन रँक वन पेन्शन’’पासून वंचित ठेवले. पण, आम्ही तो शब्द दिला होता तो पूर्ण करून दाखविला. ही मोदींची गॅरंटी आहे.

छत्रपती शिवरायांच्या कार्याचा जाज्वल्य इतिहास आहे. म्हणून तर देशातील अनेक ऐतिहासिक किल्ले हे जागतिक वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट व्हावेत, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. नौदलाच्या झेंड्यावर शिवाजी महाराजांच्या मुद्रेला स्थान दिले, असेही ते म्हणाले. मंगळवारी पंतप्रधान माेदी यांच्या माळशिरस, लातूर व धाराशिव येथे सभा हाेतील.

काँग्रेसच्या ६० वर्षांच्या काळात एससी, एसटी अन् ओबीसींवर सर्वाधिक अन्याय; आम्ही सुविधा दिल्या

काँग्रेसने आपल्या ६० वर्षांच्या काळात अनुसूचित जाती, जमाती, ओबीसींचे हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. या काळात या समाजावर सर्वाधिक अन्याय झाला, असा आरोप मोदी यांनी सोलापुरात बोलताना केला.

n३१ मिनिटांच्या भाषणात माेदी म्हणाले, आमच्या सरकारच्या १० वर्षांच्या काळात ओबीसींना वैद्यकीय प्रवेशात आरक्षण लागू केले. ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला. आरक्षणाची मर्यादा दर दहा वर्षांनी वाढवावी लागते. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर आमच्या काळातही ही मर्यादा दहा वर्षांनी वाढविण्यात आली.

काँग्रेसने ६० वर्षांत जे केले नाही ते मागील १० वर्षांत आम्ही केले; देश आत्मनिर्भर केला

पुण्यात बोलताना मोदी म्हणाले, की संविधानाचा खरा अपमान काँग्रेसच करत आहे. कर्नाटकात त्यांनी एका रात्रीत सर्व मुस्लिमांना ओबीसी केले. त्यामुळे मूळ ओबीसींच्या आरक्षणावर टाच आली. संविधानात कुठेही धर्माच्या आधारावर आरक्षण द्या, असे म्हटलेले नाही.’

काँग्रेसने ६० वर्षांत जे केले नाही ते मागील १० वर्षांत आम्ही केले. आम्ही देश आत्मनिर्भर केला. देश आता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार देश आहे. संरक्षण साधनांच्या उत्पादनात आपण आत्मनिर्भर झालो. देशात सव्वालाख स्टार्टअप सुरू झाले. इंग्रजांनी केलेले कायदे आहे तसेच सुरू होते, ते आम्ही बदलले. देश विकासाच्या वाटेवर वेगात चालला आहे.

शरद पवारांचे नाव न घेता म्हणाले, ‘भटकती आत्मा’

‘महाराष्ट्रातील एका नेत्याने ३५ वर्षांपूर्वी राज्यात सत्ताबदल केला. तेव्हापासून राज्यात एकही मुख्यमंत्री आपला कार्यकाळ पूर्व करू शकला नाही. याच नेत्याने सन १९९५ लाही युतीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मोदी यांनी केला. त्यांनी शरद पवार यांचे नाव घेतले नाही, मात्र रोख त्यांच्याकडेच होता. ७० वर्षांवरील सर्व व्यक्तींचे वैद्यकीय उपचार विनामूल्य केले जातील, असे आश्वासनही दिले.

‘वाे ताे कहीं फाेन करके पूछेंगे की खबर छापे की नही छापे...’

काँग्रेस सरकार आणि गेल्या दहा वर्षांमधील आपल्या सरकारच्या प्रगतीविषयी बोलताना माेदी यांनी  मनमोहन सिंग सरकारवर सडकून टीका केली.

काँग्रेस सरकारने दहा वर्षांत पायाभूत सुविधांवर केलेला खर्च आम्ही केवळ एका वर्षात केला. ही वस्तुस्थिती आपल्याला लोकांना सांगावी लागेल. मात्र, ही बातमी उद्या वर्तमानपत्रे छापणार नाहीत.

‘वाे ताे कहीं फाेन करके पूछेंगे की खबर छापे की नही छापे... यही है ना हाल यहाॅंपर’ असे ते पुण्यातील सभेत म्हणत त्यांनी दहा वर्षांत केलेल्या कामगिरीचा पाढा वाचला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा