शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लॉकडाऊनचा दक्षिण पुण्याला असाही फटका; 'स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्रां'ची उभारणी रेंगाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 11:52 IST

२५ सप्टेंबर २०१९ च्या 'काळरात्री' कात्रज परिसरात थोड्या वेळात प्रचंड पाऊस झाला़. कात्रजपासून सिंहगडपर्यंतच्या परिसरात महापूर आला होता. त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले़ तर मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले.  

ठळक मुद्देपुणे शहरात १० ठिकाणी स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्र उभारण्यात येणार आहे.

विवेक भुसे-पुणे : २५ सप्टेंबर २०१९ हा दिवस दक्षिण पुण्यासाठी एक काळा दिवस ठरला होता. त्याच्या खुणा अजूनही या परिसरात दिसत असतानाच पुन्हा पावसाळा आला असताना एक चिंताजनक बातमी पुढे आली आहे. कात्रज ते सिंहगड रोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्रांच्या उभारणीला लॉकडाऊनचा फटका बसला आहे. 

लॉकडाऊनमुळे स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्राच्या उभारणीचे काम होऊ शकले नाही. आता काम सुरु करण्यात आले असले तरी या पावसाळ्यात ते पूर्ण होईल का याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. २५ सप्टेंबर २०१९ च्या काळ रात्री कात्रज परिसरात थोड्या वेळात प्रचंड पाऊस झाला़. कात्रजपासून सिंहगडपर्यंतच्या परिसरात महापूर आला होता. त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले़ तर मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. त्याचवेळी शहराच्या इतर भागातील पावसाचे प्रमाण कमी होते.  या परिसरात पर्जन्यमापक केंद्र नसल्याने नेमका किती पाऊस पडला, याची कोणतीही अधिकृत मोजणी केले गेली नाही. त्यामुळे या भागात स्वयंचलिक पर्जन्यमापक केंद्र उभारण्याची मागणी केली गेली. हवामान विभागानेही त्यादृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली. शहराच्या वेगवेगळ्या भागात १० स्वयंचलित पर्जन्यमापक केंद्र उभारण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला. त्याला केंद्र सरकारने मान्यताही दिली. मात्र, त्याचवेळी लॉकडाऊन सुरु झाले व हे केंद्र उभारणीचे काम ठप्प झाले.

याबाबत हवामान विभागातील उपकरण विभागाचे शास्त्रज्ञ के़. एन. मोहन यांनी सांगितले की, पुणे शहरातील १० ठिकाणे निवडण्यात आली आहेत. त्यापैकी काही जागेवर परवानगीही मिळाली आहे. काहींची परवानगी मिळणे अजून बाकी आहे. लॉकडाऊनमुळे परवानगी मिळालेल्या ठिकाणी स्वयंचलिक पर्जन्य मापन केंद्र उभारणीचे काम खोळंबले आहे. आता लवकरात लवकर ते काम पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी याबाबत सांगितले की, पुणे शहरात १० ठिकाणी स्वयंचलित पर्जन्य मापन केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यापैकी शिवाजीनगर, लोहगाव आणि पाषाण या तीन ठिकाणी जानेवारीपर्यंत स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्र उभारण्यात आली आहे. त्यावरुन त्या भागातील पावसाचा अंदाज देण्यास सुरुवात करण्यात येत आहे. मार्चमध्ये आणखी ४ ठिकाणी या केंद्राचे काम सुरु होणार होते. मात्र, लॉकडाऊनमुळे हे काम ठप्प झाले़ आता लॉकडाऊनमध्येही काम सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या पावसाळ्यात हे काम पूर्ण करुन ही केंद्रे कशी सुरु करता येईल, याचा आमचा प्रयत्न आहे............देशभरातील तालुका पातळीवर तसेच गावागावातील पावसाची अचूक नोंदणी व्हावी, यासाठी केंद्र सरकारने देशभरात १३५० स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्रे उभारणीचा मोठा कार्यक्रम आखला होता. मात्र, एका तपानंतरही त्यापैकी केवळ ३२३ केंद्रे आतापर्यंत उभारणी केली गेली आहे. त्यापैकी ६६ केंद्रे महाराष्ट्रात आहेत.

टॅग्स :PuneपुणेweatherहवामानRainपाऊस