शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
5
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
6
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
7
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
8
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
9
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
10
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
11
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
12
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
13
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
14
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
15
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
16
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
17
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
18
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
19
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
20
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 

वणवे लागल्यास स्थानिक लोकांना जबाबदार धरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 22:00 IST

वणवे लागण्याचे प्रकार फेब्रुवारी अखेर व मार्च, एप्रिल महिन्यात हे प्रमाण अधिक

ठळक मुद्देवणवे टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे वन विभागाचे आदेशघोडेगाव, शिनोली, तळेघर, तिरपाड व कानसे आदी भागातील सरपंच आणि ग्रामसेवक यांना पत्र

पुणे : जिल्ह्यात प्रामुख्याने सह्याद्रीच्या डोगरकपारीत उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात वणवे लागण्याचे प्रकार वाढत आहे. फेब्रुवारीअखेर व मार्च, एप्रिल महिन्यात हे प्रमाण अधिक असते. वणवे लागण्याचे प्रकार प्रामुख्याने स्थानिक लोकांच्या चुकामुळे अधिक आहे. या पार्श्वभूमीवर वणवे लागल्यास स्थानिक लोकांना जबाबदार धरण्यात येणार असून, वणवे टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आदेश वन विभागाने सर्व ग्रामपंचायतींना दिले आहेत.     याबाबत घोडेगाव वन परिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन यांनी घोडेगाव, शिनोली, तळेघर, तिरपाड व कानसे आदी भागातील सरपच आणि ग्रामसेवक यांना जंगल, रोपवन भागाला लागणारे वणवे टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भांत लेखी पत्र दिली आहेत. याबाबत महाजन यांनी सांगितले की,  उन्हाळ्यात  वणवा लागण्याचे प्रमाण  गेल्या काही वर्षांत वाढत आहे. या आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी प्राणी, त्यांची अंडी, घरटी जळून खाक होतात. अंडी, व घरटी जळाल्याने अनेक पक्षी त्या आगीत प्राणाची आहुती देतात. अनेक वेळा स्थानिक लोकांकडून पावसाळ््यात गवत चांगले यावे म्हणून वणवे लावले जातात, तर काही जण विडी, सिगारेट पेटवून टाकतात, तर काहीजण हौस म्हणून, शेतातील पालापाचोळा जाळण्यासाठी आग लावतात.तर अनेक वेळा शेतातील, जंगलातील झाडांवर असणारे मधमाश्याचे पोळे काळण्यासाठी अग लावली जाते.     उन्हाळ््यामध्ये लागणारे वणवे टाळण्यासाठी जंगल क्षेत्र व रोपवन परिसराच्या हद्दीलगत असणा-या शेतक-यांनी आपल्या शेतामध्ये बांध पेटविताना, राण भाजताना जवळच्या वन अधिका-यांना कळविल्याशिवाय आग, विस्तव पेटवू नये, तसे न केल्यास व सावधगिरीच्या उपाय- योजना के केल्यास संबंधित व्यक्तीला एक वर्षांची कैद व दोन हजार रुपयांचा दंड करण्यात येईल. तसेच जंगलाची नुकसान भरपाई देखील द्यावी लागले. बांध पेटविल्यानंतर संपूर्ण आग विझविल्या शिवाय आपल्या मालकीचे क्षेत्र सोडून जावू नये, आगीपासून जंगल संपत्तीचे संरक्षण व निसगर्आचा समतोल राखण्यासाठी मदत करावी, आपल्या परिसरातील जंगल क्षेत्रास आग लागल्यास त्वरीत संबंधित वन अधिका-यांच्या निदर्शनास आणावे व मदत करावी, आग लावणा-या व्यक्तींचे नाव वन विभागास कळवावे, असे आवाहन महाजन यांनी केले आहे. 

टॅग्स :Puneपुणेforestजंगलforest departmentवनविभागgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच