शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

कोरेगाव भीमा दुर्घटनेत स्थानिकांचे नुकसान; सोशल मीडियामुळे गावाची बदनामी, ग्रामस्थांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 18:30 IST

विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे आम्ही स्वागतच करु, असे आश्वासन बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी दिली. 

ठळक मुद्देकोरेगाव भीमामध्ये तिसऱ्या दिवशीही जमावबंदी, काही प्रमाणात जनजीवन सुरळीत सोशल मीडियाच्या माध्यमातून विनाकारण कोरेगाव भीमाचेच नाव बदनाम

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा व सणसवाडी (ता. शिरुर) येथे झालेल्या दंगलीमध्ये स्थानिकांचेच कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. कारण नसताना गावचे सोशल मीडियावर नाव बदनाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी करतानाच विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे आम्ही स्वागतच करु, असे आश्वासन बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी दिली. कोरेगाव भीमामध्ये तिसऱ्या दिवशीही जमावबंदी लागू आहे. आज काही प्रमाणात जनजीवन सुरळीत चालू झाले असूनही गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर व सोशल मीडियाच्या माध्यमातून विनाकारण कोरेगाव भीमाचेच नाव बदनाम होत आहे. नागरिकांच्या तक्रारीवरुन मंगळवारी (दि.२) रोजी रात्री शिक्रापूर पोलीस ठाण्यात कोरेगाव भीमा येथील मराठा व बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील व शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रमेश गलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत दोन्ही समाजांनी गावात एकोपा असल्याचे व विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायांचे स्वागतच होईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस घोडगंगेचे माजी संचालक विठ्ठल ढेरंगे, जिल्हा बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, माजी पंचायत समिती सदस्य पी. के. गव्हाणे, राष्ट्रवादीचे नारायण फडतरे, विक्रम गव्हाणे, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक गव्हाणे, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, सरपंच संगिता गव्हाणे, उपसरपंच कल्पना गव्हाणे, विजय गव्हाणे, अशोक काशिद, केशव फडतरे, अरविंद गव्हाणे, उमेश गव्हाणे, विक्रम दौंडकर, बबन गव्हाणे, संपत गव्हाणे, योगेश गव्हाणे, प्रकाश ढेरंगे, वृषाली गव्हाणे आदी उपस्थित होते. विठ्ठलराव ढेरंगे यांनी सांगितले, की कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीत कोरेगाव ग्रामस्थांचा कसलाही संबंध नसताना गावचे नाव बदनाम होत आहे. यापूर्र्वी विजयस्तंभास मानवंदना देण्यात येणाऱ्या अनुयायांनासुविधा पुरविण्यातच येत होत्या. यापुढेही त्यांचे स्वागतच करण्यात येईल. स्थानिक ग्रामस्थांचे बाहेरच्या लोकांनी मोठे नुकसान केले असून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. बौद्ध समाजाच्यावतीने राजेंद्र गवदे, भाऊसाहेब भालेराव, सचितानंद कडलक व इतर ग्रामस्थांनीही कोरेगावच्या दुर्घटनेबाबत बोलताना सांगितले, की समाजकंटकाच्या चिथावणीवरुन वादाची ठिणगी पेटली असून गावच्या लोकांचेच यात मोठे नुकसान झाले. गावचे नाव वापरुन लोक गैरफायदा घेत असल्याचे सांगत उलट सवर्ण व दलित समाजाच्या लोकांनी मिळून महिला, मुलांचे संरक्षण केल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंच्या लोकांनी एकत्र बैठक घेतल्याने गावातील वातावरण सुरळीत होण्यास मदत मिळाली असून गावातील प्रत्येक गोष्टीवर पोलीस प्रशासनाचे बारिक लक्ष ठेवून असून तिसऱ्या दिवशीही गावामध्ये जमावबंदी लागू आहे. आज काही प्रमाणात गावातील व्यवहार सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणेSocial Mediaसोशल मीडिया