शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

कोरेगाव भीमा दुर्घटनेत स्थानिकांचे नुकसान; सोशल मीडियामुळे गावाची बदनामी, ग्रामस्थांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 18:30 IST

विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे आम्ही स्वागतच करु, असे आश्वासन बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी दिली. 

ठळक मुद्देकोरेगाव भीमामध्ये तिसऱ्या दिवशीही जमावबंदी, काही प्रमाणात जनजीवन सुरळीत सोशल मीडियाच्या माध्यमातून विनाकारण कोरेगाव भीमाचेच नाव बदनाम

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा व सणसवाडी (ता. शिरुर) येथे झालेल्या दंगलीमध्ये स्थानिकांचेच कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. कारण नसताना गावचे सोशल मीडियावर नाव बदनाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी करतानाच विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे आम्ही स्वागतच करु, असे आश्वासन बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ग्रामस्थांनी दिली. कोरेगाव भीमामध्ये तिसऱ्या दिवशीही जमावबंदी लागू आहे. आज काही प्रमाणात जनजीवन सुरळीत चालू झाले असूनही गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर व सोशल मीडियाच्या माध्यमातून विनाकारण कोरेगाव भीमाचेच नाव बदनाम होत आहे. नागरिकांच्या तक्रारीवरुन मंगळवारी (दि.२) रोजी रात्री शिक्रापूर पोलीस ठाण्यात कोरेगाव भीमा येथील मराठा व बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील व शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक रमेश गलांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत दोन्ही समाजांनी गावात एकोपा असल्याचे व विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायांचे स्वागतच होईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामस्थांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस घोडगंगेचे माजी संचालक विठ्ठल ढेरंगे, जिल्हा बँकेच्या संचालिका वर्षा शिवले, माजी पंचायत समिती सदस्य पी. के. गव्हाणे, राष्ट्रवादीचे नारायण फडतरे, विक्रम गव्हाणे, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक गव्हाणे, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, सरपंच संगिता गव्हाणे, उपसरपंच कल्पना गव्हाणे, विजय गव्हाणे, अशोक काशिद, केशव फडतरे, अरविंद गव्हाणे, उमेश गव्हाणे, विक्रम दौंडकर, बबन गव्हाणे, संपत गव्हाणे, योगेश गव्हाणे, प्रकाश ढेरंगे, वृषाली गव्हाणे आदी उपस्थित होते. विठ्ठलराव ढेरंगे यांनी सांगितले, की कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीत कोरेगाव ग्रामस्थांचा कसलाही संबंध नसताना गावचे नाव बदनाम होत आहे. यापूर्र्वी विजयस्तंभास मानवंदना देण्यात येणाऱ्या अनुयायांनासुविधा पुरविण्यातच येत होत्या. यापुढेही त्यांचे स्वागतच करण्यात येईल. स्थानिक ग्रामस्थांचे बाहेरच्या लोकांनी मोठे नुकसान केले असून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. बौद्ध समाजाच्यावतीने राजेंद्र गवदे, भाऊसाहेब भालेराव, सचितानंद कडलक व इतर ग्रामस्थांनीही कोरेगावच्या दुर्घटनेबाबत बोलताना सांगितले, की समाजकंटकाच्या चिथावणीवरुन वादाची ठिणगी पेटली असून गावच्या लोकांचेच यात मोठे नुकसान झाले. गावचे नाव वापरुन लोक गैरफायदा घेत असल्याचे सांगत उलट सवर्ण व दलित समाजाच्या लोकांनी मिळून महिला, मुलांचे संरक्षण केल्याचे सांगितले. दोन्ही बाजूंच्या लोकांनी एकत्र बैठक घेतल्याने गावातील वातावरण सुरळीत होण्यास मदत मिळाली असून गावातील प्रत्येक गोष्टीवर पोलीस प्रशासनाचे बारिक लक्ष ठेवून असून तिसऱ्या दिवशीही गावामध्ये जमावबंदी लागू आहे. आज काही प्रमाणात गावातील व्यवहार सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPuneपुणेSocial Mediaसोशल मीडिया