शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून कर्जवसुली, शेतकरी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 12:43 AM

दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कर्जमाफी करायचे सोडून शेतक-यांनी सोसायटीतून घेतलेले कर्ज संत तुकाराम साखर कारखान्याने शेतक-यांच्या बिलातून कापून घेतल्याने ऊसउत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत.

चाकण - दुष्काळ जाहीर झाल्यानंतर कर्जमाफी करायचे सोडून शेतक-यांनी सोसायटीतून घेतलेले कर्ज संत तुकाराम साखर कारखान्याने शेतक-यांच्या बिलातून कापून घेतल्याने ऊसउत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या बिलातून कर्जवसुली करू नये, अशी मागणी खेड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून, ही जुलमी वसुली थांबवली नाही तर कायदेशीर कारवाई करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने ऊसउत्पादक शेतक-यांच्या बैठकीत दिला आहे.साखर कारखान्याच्या सभासद शेतकºयांनी सोसायटीकडून घेतलेले कर्ज शेतकºयांना न सांगता कारखान्याने परस्पर वसुली सुरू केली आहे. शेतकºयांनी सोसायटीकडून घेतलेले कर्ज वसुली करण्याचा अधिकार साखर कारखान्याला नाही, ते बेकायदेशीर असून, शेतकºयांची पिळवणूक केली जात आहे. शेतकºयांची ही रक्कम तातडीने परत करावी; अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. केंद्रीय साखर नियंत्रण कायदा १९६६ अनुसार देशातील शेतकºयांनी गाळपासाठी ऊस विकल्यानंतर १४ दिवसांत उसाची रास्त व किफायतशीर किंमत अर्थात एफआरपी देणे बंधनकारक आहे. साखर कारखान्याने शेतकºयांना २१०० रुपये एफआरपी दिली असून, ती कमी आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे. उसाला पहिली उचल एकरकमी एफआरपी देणे हे ऊसदराच्या तोडग्यात ठरले आहे. त्यामुळे कारखान्याने २७५० रुपयेप्रमाणे एफआरपी देणे क्रमप्राप्त आहे. तरीही ती शेतकºयांना एकरकमी न देता टप्प्याटप्प्याने दिली जात असून, ती एकरकमी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी