शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: टीका करणाऱ्यांना करू द्या, आपण त्यांना कामातूनच उत्तर देऊ; अजित पवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:39 IST

विकासकामांवर बोलताना, केवळ भाषणांनी किंवा गोड बोलण्याने विकास होत नाही. विकासासाठी सर्वांची साथ आणि समन्वय आवश्यक असतो

बारामती : निवडणुका जवळ आल्या की काहीजण अचानक सक्रिय होतात. संविधानाने निवडणूक लढविण्याचा अधिकार दिला असला, तरी पाच वर्षे हे लोक कुठे होते, त्यांनी सामान्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या का? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा नामोल्लेख टाळत उपस्थित केला.

बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, शहरात अपघात टाळण्यासाठी काही ठिकाणी दुभाजक उभारले तरी त्यावर नाराजी व्यक्त केली जाते. १९६७ साली बारामतीत अवघे १७ हजार मतदार होते, आज ही संख्या सातपट वाढली आहे. लोकसंख्या वाढली की रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि अन्य विकासकामे करावीच लागतात. ही कामे केली तरी टीका होते आणि केली नाहीत तरी टीका होते. याचा विचार बारामतीकरांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

काम करताना काही त्रुटी राहू शकतात, आपण सर्वगुणसंपन्न असल्याचा दावा करत नाही, असे स्पष्ट करत पवार म्हणाले, मात्र बारामतीकरांसाठी जे प्रामाणिकपणे आणि बारकाईने काम केले आहे, ते कोणीही करून दाखवू शकणार नाही. काहीजण भावनिक मुद्दे काढतात; मात्र मी प्रत्येक धर्माचा आदर करणारा असून शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतूनच कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

बारामतीतील जातीय सलोखा कायम राखण्याचे आवाहन करताना पवार म्हणाले, निवडणुका आल्या की आरोप-प्रत्यारोप होतात. मात्र मला टीकेपेक्षा कामातून उत्तर देण्यावर अधिक विश्वास आहे. टीका करणाऱ्यांना टीका करू द्या, आपण त्यांना कामातूनच उत्तर देऊ, असे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी विकासकामांवर बोलताना, केवळ भाषणांनी किंवा गोड बोलण्याने विकास होत नाही. विकासासाठी सर्वांची साथ आणि समन्वय आवश्यक असतो, अशी टीका त्यांनी शरद पवार गटाचे नाव न घेता केली. इतर लोक येऊन आश्वासनांची खैरात करतील; मात्र बारामतीचा सर्वांगीण विकास कसा साधायचा, हे सांगण्यासाठी आपण जनतेसमोर उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे काम करण्याची क्षमता इतर कोणाकडे नाही, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Answer critics through work, Ajit Pawar asserts confidently.

Web Summary : Ajit Pawar criticized opponents for appearing only during elections. He highlighted Baramati's development under his leadership, emphasizing his commitment to Shahuji Maharaj, Phule, and Ambedkar's principles. He urged maintaining communal harmony, prioritizing work over criticism, and promising comprehensive development.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Ajit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामती