शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

१९ वर्षीय युवतीचा जीव घेणारा बिबट्या जेरबंद; नरभक्षकाच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 16:48 IST

वन विभागाने यापूर्वी पकडलेले बिबटे दुसऱ्या भागात सोडल्याने ते पुन्हा गावात येत असल्याचा गंभीर आरोप सरपंचांनी केला आहे

टाकळी हाजी : पिंपरखेड येथे कुऱ्हाडेवस्तीवर शेतात लावलेल्या पिंजऱ्यात नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. गेली चार दिवसांपूर्वी पूजा जाधव (रा. टाकेवाडी कळंब, ता. आंबेगाव) ही महिला तिच्या पती व दिराबरोबर दुचाकीवरून प्रवास करत असताना लघुशंकेसाठी थांबलेल्या तिघांपैकी महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला होता. त्यामुळे बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. नरभक्षक बिबट्या पकडण्याच्या दृष्टीने वनविभागाने त्या परिसरात सहा पिंजरे लावले होते. त्यापैकी एका पिंजऱ्यात बिबट्या अडकला. ही बिबट मादी असून, तिचे वय साधारणतः सहा ते सात वर्षे असल्याचे तालुका वन अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.

या परिसरात मागील काही दिवसांत बिबट्याने मोठा उच्छाद मांडला असून, पिंपरखेडलगत असणाऱ्या जांबूतमध्ये साधारणतः तीन महिन्यांपूर्वी पूजा नरवडे या १९ वर्षीय युवतीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. तसेच त्यापूर्वीदेखील दोघांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला होता.

हल्ल्यानंतर बिबट जेरबंद केला असले तरी त्याला वन विभाग सोडणार कुठे, हा प्रश्न आहे. यापूर्वीही पकडलेले बिबटे वन विभागाने दुसऱ्या भागात सोडल्याने ते पुन्हा गावात येत असल्याचा गंभीर आरोप सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी केला आहे. बिबट्या नुसता जनतेसमोर पकडायचा तो माणिकडोहला नेऊन बिबट्या निवारण केंद्रात सोडतो, असे ग्रामस्थांना सांगायचे. मात्र, बिबट्या निवारण केंद्रात सोडला जातो का? हा प्रश्न सामान्य जनतेला पडत आहे. याबाबत वन अधिकारी मनोहर म्हसेकर म्हणाले की, हा बिबट्या सहा ते सात वर्षांचा असून, शक्यतो हल्ला करणारा बिबट्या हाच असण्याची शक्यता आहे. मात्र, हे सर्व तपासणी अहवालानंतरच कळेल. याला माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. नरभक्षक बिबट्याच्या पायाचे ठसे तपासून त्याची ओळख पटवली जाते. तो असेल तर त्याला निवारण केंद्रात ठेवले जाते. मात्र, आम्ही त्या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले असल्याने त्यामध्ये आम्हाला फक्त एवढा एकच बिबट दिसला असल्याने हाच नरभक्षक असण्याची शक्यता आहे.

या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याची संख्या वाढली असून, मागणी येईल तेथे पिंजरे लावण्यात यावेत, अशी मागणी सरपंच राजेंद्र दाभाडे व सोसायटीचे चेअरमन किरण ढोमे यांनी केली आहे. शिरूर तालुक्यात वनपाल व वनरक्षकांची संख्या कमी आहे. तसेच पिंजरेही अठरापेक्षा जास्त नाहीत. शिरूर तालुक्याचे पूर्व - पश्चिम अंतर सुमारे शंभर किलोमीटर आहे आणि शिरूर तालुका मध्यभागी आहे. त्यामुळे कुठलीही घटना झाली तरी वनाधिकारी यांना घटनस्थळी पोहचण्यासाठी किमान दोन तास जातात. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांची संख्या केंद्र सरकारने वाढून द्यावी व बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याSocialसामाजिकforest departmentवनविभाग