शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

१९ वर्षीय युवतीचा जीव घेणारा बिबट्या जेरबंद; नरभक्षकाच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 16:48 IST

वन विभागाने यापूर्वी पकडलेले बिबटे दुसऱ्या भागात सोडल्याने ते पुन्हा गावात येत असल्याचा गंभीर आरोप सरपंचांनी केला आहे

टाकळी हाजी : पिंपरखेड येथे कुऱ्हाडेवस्तीवर शेतात लावलेल्या पिंजऱ्यात नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. गेली चार दिवसांपूर्वी पूजा जाधव (रा. टाकेवाडी कळंब, ता. आंबेगाव) ही महिला तिच्या पती व दिराबरोबर दुचाकीवरून प्रवास करत असताना लघुशंकेसाठी थांबलेल्या तिघांपैकी महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला होता. त्यामुळे बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. नरभक्षक बिबट्या पकडण्याच्या दृष्टीने वनविभागाने त्या परिसरात सहा पिंजरे लावले होते. त्यापैकी एका पिंजऱ्यात बिबट्या अडकला. ही बिबट मादी असून, तिचे वय साधारणतः सहा ते सात वर्षे असल्याचे तालुका वन अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.

या परिसरात मागील काही दिवसांत बिबट्याने मोठा उच्छाद मांडला असून, पिंपरखेडलगत असणाऱ्या जांबूतमध्ये साधारणतः तीन महिन्यांपूर्वी पूजा नरवडे या १९ वर्षीय युवतीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. तसेच त्यापूर्वीदेखील दोघांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला होता.

हल्ल्यानंतर बिबट जेरबंद केला असले तरी त्याला वन विभाग सोडणार कुठे, हा प्रश्न आहे. यापूर्वीही पकडलेले बिबटे वन विभागाने दुसऱ्या भागात सोडल्याने ते पुन्हा गावात येत असल्याचा गंभीर आरोप सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी केला आहे. बिबट्या नुसता जनतेसमोर पकडायचा तो माणिकडोहला नेऊन बिबट्या निवारण केंद्रात सोडतो, असे ग्रामस्थांना सांगायचे. मात्र, बिबट्या निवारण केंद्रात सोडला जातो का? हा प्रश्न सामान्य जनतेला पडत आहे. याबाबत वन अधिकारी मनोहर म्हसेकर म्हणाले की, हा बिबट्या सहा ते सात वर्षांचा असून, शक्यतो हल्ला करणारा बिबट्या हाच असण्याची शक्यता आहे. मात्र, हे सर्व तपासणी अहवालानंतरच कळेल. याला माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. नरभक्षक बिबट्याच्या पायाचे ठसे तपासून त्याची ओळख पटवली जाते. तो असेल तर त्याला निवारण केंद्रात ठेवले जाते. मात्र, आम्ही त्या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले असल्याने त्यामध्ये आम्हाला फक्त एवढा एकच बिबट दिसला असल्याने हाच नरभक्षक असण्याची शक्यता आहे.

या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याची संख्या वाढली असून, मागणी येईल तेथे पिंजरे लावण्यात यावेत, अशी मागणी सरपंच राजेंद्र दाभाडे व सोसायटीचे चेअरमन किरण ढोमे यांनी केली आहे. शिरूर तालुक्यात वनपाल व वनरक्षकांची संख्या कमी आहे. तसेच पिंजरेही अठरापेक्षा जास्त नाहीत. शिरूर तालुक्याचे पूर्व - पश्चिम अंतर सुमारे शंभर किलोमीटर आहे आणि शिरूर तालुका मध्यभागी आहे. त्यामुळे कुठलीही घटना झाली तरी वनाधिकारी यांना घटनस्थळी पोहचण्यासाठी किमान दोन तास जातात. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांची संख्या केंद्र सरकारने वाढून द्यावी व बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याSocialसामाजिकforest departmentवनविभाग