शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

खडकवासला, मुळशीतून पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:09 IST

शेतकरी संघटनेची मागणी : इंदापूरकरांमध्ये अन्यायाची भावना

भिगवण : खडकवासला धरणातील पाण्याबाबत इंदापूर तालुक्यावर सातत्याने अन्याय होत आहे. इंदापूरला पाणी देण्याचा विषय समोर आल्यानंतर, पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा विषय उपस्थित केला जातो. खडकवासला धरणाबरोबर मुळशी धरणातील पाणीही इंदापूर तालुक्यातील दुष्काळी भागासाठी द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव कन्हेरकर यांनी केली आहे.

खडकवासला धरणाच्या स्थापनेपासून इंदापूर तालुक्यावर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना इंदापूर तालुक्यामधील शेतकऱ्यांमध्ये आहे. खडकवासला कालव्यासाठी तालुक्यातील शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या. मागील तीस वर्षांमध्ये काही कालव्यांमध्ये एक थेंबही पाणी आले नसल्याची वस्तुस्थिती आहे. ३६ ते ४८ चारींचे लाभक्षेत्र सात हजार एकर असताना या चाºयांना अद्यापपर्यंत पाणी आले नाही, तर लाभ क्षेत्रातील भादलवाडी, मदनवाडी, पोंधवडी या तलावाची साठवण क्षमता केवळ ०.४ टी.एम.सी असताना या तलावामध्ये पाणी सोडण्याचा हक्कच नाकारण्यात येत आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने खडकवासला धरणाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील २७ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली असल्याचा दावा चुकीचा आहे. शेटफळगढे येथे वॉटर मीटर बसवून नेमके किती पाणी इंदापूर तालुक्याला दिले जाते, याचे लेखापरीक्षण करून वस्तुस्थिती जाहीर करावी, अशी मागणी कन्हेरकर यांनी केली आहे.

बारामती तालुक्याला चार टीएमसी पाणी जादा दिले जाते. बारामती व दौंड तालुक्यातील पाझर तलाव नियमितपणे भरले जातात. इंदापूर तालुक्यातील तलावाबाबत मात्र दुजाभाव केला जातो. खडकवासलातील पाण्याबरोबर मुळशी धरणातील पाण्याच्या माध्यमातून तालुक्यातील दुष्काळी शेतीसाठी कायमस्वरूपी सिंचनाची सोय करा, अशी मागणी कन्हेरकर यांनी केली आहे.तालुक्यातील तलाव भरण्याची मागणी...चालू वर्षी इंदापूर तालुक्याला पावसाने चांगलीच ओढ दिली आहे, त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. उजनी व खडकवासला धरणे पूर्ण क्षमतेने भरली गेली असतानाही अतिरिक्त झालेल्या पाण्यामधून तरी इंदापूर तालुक्यातील तलाव भरण्याची आवश्यकता आहे; परंतु तालुक्यातील तलाव कोरडे पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तालुक्यातील तलाव तातडीने भरण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणFarmerशेतकरी