शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

खडकवासला, मुळशीतून पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 23:09 IST

शेतकरी संघटनेची मागणी : इंदापूरकरांमध्ये अन्यायाची भावना

भिगवण : खडकवासला धरणातील पाण्याबाबत इंदापूर तालुक्यावर सातत्याने अन्याय होत आहे. इंदापूरला पाणी देण्याचा विषय समोर आल्यानंतर, पुण्याच्या पिण्याच्या पाण्याचा विषय उपस्थित केला जातो. खडकवासला धरणाबरोबर मुळशी धरणातील पाणीही इंदापूर तालुक्यातील दुष्काळी भागासाठी द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव कन्हेरकर यांनी केली आहे.

खडकवासला धरणाच्या स्थापनेपासून इंदापूर तालुक्यावर सातत्याने अन्याय होत असल्याची भावना इंदापूर तालुक्यामधील शेतकऱ्यांमध्ये आहे. खडकवासला कालव्यासाठी तालुक्यातील शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या. मागील तीस वर्षांमध्ये काही कालव्यांमध्ये एक थेंबही पाणी आले नसल्याची वस्तुस्थिती आहे. ३६ ते ४८ चारींचे लाभक्षेत्र सात हजार एकर असताना या चाºयांना अद्यापपर्यंत पाणी आले नाही, तर लाभ क्षेत्रातील भादलवाडी, मदनवाडी, पोंधवडी या तलावाची साठवण क्षमता केवळ ०.४ टी.एम.सी असताना या तलावामध्ये पाणी सोडण्याचा हक्कच नाकारण्यात येत आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने खडकवासला धरणाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील २७ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली असल्याचा दावा चुकीचा आहे. शेटफळगढे येथे वॉटर मीटर बसवून नेमके किती पाणी इंदापूर तालुक्याला दिले जाते, याचे लेखापरीक्षण करून वस्तुस्थिती जाहीर करावी, अशी मागणी कन्हेरकर यांनी केली आहे.

बारामती तालुक्याला चार टीएमसी पाणी जादा दिले जाते. बारामती व दौंड तालुक्यातील पाझर तलाव नियमितपणे भरले जातात. इंदापूर तालुक्यातील तलावाबाबत मात्र दुजाभाव केला जातो. खडकवासलातील पाण्याबरोबर मुळशी धरणातील पाण्याच्या माध्यमातून तालुक्यातील दुष्काळी शेतीसाठी कायमस्वरूपी सिंचनाची सोय करा, अशी मागणी कन्हेरकर यांनी केली आहे.तालुक्यातील तलाव भरण्याची मागणी...चालू वर्षी इंदापूर तालुक्याला पावसाने चांगलीच ओढ दिली आहे, त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. उजनी व खडकवासला धरणे पूर्ण क्षमतेने भरली गेली असतानाही अतिरिक्त झालेल्या पाण्यामधून तरी इंदापूर तालुक्यातील तलाव भरण्याची आवश्यकता आहे; परंतु तालुक्यातील तलाव कोरडे पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तालुक्यातील तलाव तातडीने भरण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :PuneपुणेDamधरणFarmerशेतकरी