शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

नेते परदेशी सहली काढतात, पण रायगडावर जात नाहीत; विश्वास पाटील यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 12:39 IST

परदेशातून आलेल्या शिष्टमंडळाला रायगडाविषयी आकर्षण

पिंपरी : परदेशातून आलेल्या शिष्टमंडळाला रायगडाविषयी आकर्षण आहे. मात्र, मी सर्वच पक्षांतील नेत्यांना परदेशी सहलीसाठी सहपरिवार जाताना पाहिले आहे. मात्र, काही मोजके नेते वगळले तर इतर नेते रायगडाला भेट देत नाहीत, अशी खंत लेखक विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. पहिले इंद्रायणी साहित्य संमेलन मोशी येथे पार पडले. या संमेलनाच्या समारोपावेळी दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या.

संदीप तापकीर यांनी विश्वास पाटील यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीतून पाटील यांनी आपली लेखक म्हणून वाटचाल आणि पुस्तकांसाठी निवडलेल्या विषयांबाबत भाष्य केले. पाटील म्हणाले की, कमी वयात लेखक म्हणून प्रसिद्धी मिळाली. मात्र, मी लेखक म्हणून घडण्यात माझ्या गावाचा आणि आसपासच्या परिसराचा मोठा वाटा आहे. मी ज्या परिसरात लहानाचा मोठा झालो त्याच परिसरातून शिवाजी महाराज, बाजीप्रभु देशपांडे हे विशालगडाकडे गेले होते. मला नागरिकांच्या कहाण्या वास्तव लिखाणातून सांगण्यास आवडते. माझ्या प्रत्येक पुस्तकावर वाचकांनी प्रचंड प्रेम केले. पूर्वी सिनेमासारख्या कलाकृतीतून शिवाजी महाराज यांना जातीधर्मात, एका प्रदेशापुरता बांधायचा प्रयत्न झाला. महाराजांची प्रतिमा ही संकुचित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवाजी महाराज मी अभ्यासत गेलो तसे ते यापलीकडे होते याची जाणीव मला झाली. स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा ही शिवाजी महाराजांनी जिजाऊ आणि शहाजीराजांपासून घेतली. शहाजीराजांनी स्वत: स्वराज्य स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता.

व्हिएतनामपुढे शिवाजी महाराजांचा आदर्श

व्हिएतनामने अनेक वर्षे अमेरिकेशी संघर्ष करून त्यांच्यावर निर्णायक विजय मिळवला. त्यासाठी व्हिएतनामच्या क्रांतिकारच्यासमोर शिवाजी महाराजांचाच आदर्श होता. ज्यांनी बलाढ्य शत्रू विरोधात लढा देऊन स्वराज उभारले, असे पाटील यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.

टॅग्स :PuneपुणेVishwash Patilविश्वास पाटील PoliticsराजकारणSocialसामाजिकRaigadरायगड