शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

कडधान्य पिकांची पेरणी शेवटच्या टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 19:41 IST

राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३२ असून यंदा सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

ठळक मुद्देराज्याच्या कृषी विभागाने १ जून ते २७ जुलै या कालावधीतील पेरणी व पीक परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द पिकांवर किड-रोगाचा प्रादूर्भाव राज्यात कापसाची ९२ टक्के पेरणी

पुणे : राज्यात नंदूरबार,सोलापूर,औरंगाबाद व बीड जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात सरासरीच्या ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील कडधान्य पिकांची पेरणीची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. सरासरी क्षेत्राच्या टक्केवारीचा विचार करता राज्यात उडीद पिकाची शंभर टक्क्याहून अधिक तर तूर, मुग, पिकांची ९० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात कडधान्या खालील सरासरी क्षेत्राच्या १८ लाख ९८ हजार ७८३ क्षेत्रावर कडधान्य पिकांची पेरणी झाली आहे.राज्याच्या कृषी विभागाने १ जून ते २७ जुलै या कालावधीतील पेरणी व पीक परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यानुसार राज्यात आत्तापर्यंत सरासरी ५७९.४ मि.मी. पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत राज्यातील एकूण ३५५ तालुक्यांपैकी ९ तालुक्यात २५ ते ५० टक्के ६४ तालुक्यात ५० ते ७५ टक्के आणि १११ तालुक्यात ७५ ते १०० टक्के पाऊस पडला आहे.तर १७१ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. राज्यात ऊस पिक वगळून खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर क्षेत्र असून २७ जुलैपर्यंत १२०.६६ लाख हेक्टर म्हणजेच ८६ टक्के क्षेत्रावर पेरणी व लागवडीची कामे पूर्ण झाली आहेत.राज्यात उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र ३ लाख १८ हजार ९५८ हेक्टर असून यंदा सरासरी पेक्षा अधिक ३ लाख ३४ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावर उडीद पिकाची पेरणी झाली. तसेच राज्यात तूरीचे सरासरी क्षेत्र १२ लाख ४७ हजार ४८७ असून आत्तापर्यंत ११ लाख ३० हजार ६२३ हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची पेरणी झाली आहे. त्याचप्रमाणे मका पिकाचे सरासरी क्षेत्र ७ लाख ३६ हजार ६६२ हेक्टर असून प्रत्यक्षात ७ लाख २३ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३२ असून यंदा सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. राज्यात २७ जुलैपर्यंत ३७ लाख ४८ हजार ७८३ क्षेत्रावर म्हणजेच १०५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. त्याचप्रमाणे राज्यात कापसाची ९२ टक्के पेरणी झाली असून आत्तापर्यंत ३८ लाख ६८ हजार ३८८ हेक्टर क्षेत्र कापसाच्या पेरणी खाली आले असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे...................पिकांवर किड-रोगाचा प्रादूर्भाव राज्यात ठाणे विभागात काही ठिकाणी भात पिकावर पिवळ्या खोडकिडीचा, नाशिक विभागात काही ठिकाणी कापूस पिकावर रस शोषणाऱ्या किडीचा प्रादूर्भाव झाला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ज्वारी पिकावर खोडकिडीचा व सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या आळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव अढळून आला. औरंगाबाद विभाग मका पिकावर खोडकीडीचा तर कापूस पिकांवर रस शोषणाऱ्याआळीचा तर सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव अढळून आला. तसेच नागपूर विभागात काही भागात भाग पिकावर ‘पा’ रोगाचा तूर पिकावर मर रोगाचा आणि सोयाबीन पिकावर उंट अळीचा अल्प प्रमाणात प्रादूर्भाव दिसून आल्याचे कृषी विभागात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस