शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

कडधान्य पिकांची पेरणी शेवटच्या टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 19:41 IST

राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३२ असून यंदा सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

ठळक मुद्देराज्याच्या कृषी विभागाने १ जून ते २७ जुलै या कालावधीतील पेरणी व पीक परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द पिकांवर किड-रोगाचा प्रादूर्भाव राज्यात कापसाची ९२ टक्के पेरणी

पुणे : राज्यात नंदूरबार,सोलापूर,औरंगाबाद व बीड जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात सरासरीच्या ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील कडधान्य पिकांची पेरणीची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. सरासरी क्षेत्राच्या टक्केवारीचा विचार करता राज्यात उडीद पिकाची शंभर टक्क्याहून अधिक तर तूर, मुग, पिकांची ९० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात कडधान्या खालील सरासरी क्षेत्राच्या १८ लाख ९८ हजार ७८३ क्षेत्रावर कडधान्य पिकांची पेरणी झाली आहे.राज्याच्या कृषी विभागाने १ जून ते २७ जुलै या कालावधीतील पेरणी व पीक परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यानुसार राज्यात आत्तापर्यंत सरासरी ५७९.४ मि.मी. पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत राज्यातील एकूण ३५५ तालुक्यांपैकी ९ तालुक्यात २५ ते ५० टक्के ६४ तालुक्यात ५० ते ७५ टक्के आणि १११ तालुक्यात ७५ ते १०० टक्के पाऊस पडला आहे.तर १७१ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. राज्यात ऊस पिक वगळून खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर क्षेत्र असून २७ जुलैपर्यंत १२०.६६ लाख हेक्टर म्हणजेच ८६ टक्के क्षेत्रावर पेरणी व लागवडीची कामे पूर्ण झाली आहेत.राज्यात उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र ३ लाख १८ हजार ९५८ हेक्टर असून यंदा सरासरी पेक्षा अधिक ३ लाख ३४ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावर उडीद पिकाची पेरणी झाली. तसेच राज्यात तूरीचे सरासरी क्षेत्र १२ लाख ४७ हजार ४८७ असून आत्तापर्यंत ११ लाख ३० हजार ६२३ हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची पेरणी झाली आहे. त्याचप्रमाणे मका पिकाचे सरासरी क्षेत्र ७ लाख ३६ हजार ६६२ हेक्टर असून प्रत्यक्षात ७ लाख २३ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३२ असून यंदा सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. राज्यात २७ जुलैपर्यंत ३७ लाख ४८ हजार ७८३ क्षेत्रावर म्हणजेच १०५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. त्याचप्रमाणे राज्यात कापसाची ९२ टक्के पेरणी झाली असून आत्तापर्यंत ३८ लाख ६८ हजार ३८८ हेक्टर क्षेत्र कापसाच्या पेरणी खाली आले असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे...................पिकांवर किड-रोगाचा प्रादूर्भाव राज्यात ठाणे विभागात काही ठिकाणी भात पिकावर पिवळ्या खोडकिडीचा, नाशिक विभागात काही ठिकाणी कापूस पिकावर रस शोषणाऱ्या किडीचा प्रादूर्भाव झाला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ज्वारी पिकावर खोडकिडीचा व सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या आळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव अढळून आला. औरंगाबाद विभाग मका पिकावर खोडकीडीचा तर कापूस पिकांवर रस शोषणाऱ्याआळीचा तर सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव अढळून आला. तसेच नागपूर विभागात काही भागात भाग पिकावर ‘पा’ रोगाचा तूर पिकावर मर रोगाचा आणि सोयाबीन पिकावर उंट अळीचा अल्प प्रमाणात प्रादूर्भाव दिसून आल्याचे कृषी विभागात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस