शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कडधान्य पिकांची पेरणी शेवटच्या टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 19:41 IST

राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३२ असून यंदा सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

ठळक मुद्देराज्याच्या कृषी विभागाने १ जून ते २७ जुलै या कालावधीतील पेरणी व पीक परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द पिकांवर किड-रोगाचा प्रादूर्भाव राज्यात कापसाची ९२ टक्के पेरणी

पुणे : राज्यात नंदूरबार,सोलापूर,औरंगाबाद व बीड जिल्हे वगळता इतर जिल्ह्यात सरासरीच्या ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्यातील कडधान्य पिकांची पेरणीची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. सरासरी क्षेत्राच्या टक्केवारीचा विचार करता राज्यात उडीद पिकाची शंभर टक्क्याहून अधिक तर तूर, मुग, पिकांची ९० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात कडधान्या खालील सरासरी क्षेत्राच्या १८ लाख ९८ हजार ७८३ क्षेत्रावर कडधान्य पिकांची पेरणी झाली आहे.राज्याच्या कृषी विभागाने १ जून ते २७ जुलै या कालावधीतील पेरणी व पीक परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यानुसार राज्यात आत्तापर्यंत सरासरी ५७९.४ मि.मी. पाऊस पडला आहे. सरासरीच्या तुलनेत राज्यातील एकूण ३५५ तालुक्यांपैकी ९ तालुक्यात २५ ते ५० टक्के ६४ तालुक्यात ५० ते ७५ टक्के आणि १११ तालुक्यात ७५ ते १०० टक्के पाऊस पडला आहे.तर १७१ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. राज्यात ऊस पिक वगळून खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर क्षेत्र असून २७ जुलैपर्यंत १२०.६६ लाख हेक्टर म्हणजेच ८६ टक्के क्षेत्रावर पेरणी व लागवडीची कामे पूर्ण झाली आहेत.राज्यात उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र ३ लाख १८ हजार ९५८ हेक्टर असून यंदा सरासरी पेक्षा अधिक ३ लाख ३४ हजार ७८७ हेक्टर क्षेत्रावर उडीद पिकाची पेरणी झाली. तसेच राज्यात तूरीचे सरासरी क्षेत्र १२ लाख ४७ हजार ४८७ असून आत्तापर्यंत ११ लाख ३० हजार ६२३ हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची पेरणी झाली आहे. त्याचप्रमाणे मका पिकाचे सरासरी क्षेत्र ७ लाख ३६ हजार ६६२ हेक्टर असून प्रत्यक्षात ७ लाख २३ हजार ३५५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३२ असून यंदा सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. राज्यात २७ जुलैपर्यंत ३७ लाख ४८ हजार ७८३ क्षेत्रावर म्हणजेच १०५ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. त्याचप्रमाणे राज्यात कापसाची ९२ टक्के पेरणी झाली असून आत्तापर्यंत ३८ लाख ६८ हजार ३८८ हेक्टर क्षेत्र कापसाच्या पेरणी खाली आले असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे...................पिकांवर किड-रोगाचा प्रादूर्भाव राज्यात ठाणे विभागात काही ठिकाणी भात पिकावर पिवळ्या खोडकिडीचा, नाशिक विभागात काही ठिकाणी कापूस पिकावर रस शोषणाऱ्या किडीचा प्रादूर्भाव झाला आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील ज्वारी पिकावर खोडकिडीचा व सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या आळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव अढळून आला. औरंगाबाद विभाग मका पिकावर खोडकीडीचा तर कापूस पिकांवर रस शोषणाऱ्याआळीचा तर सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव अढळून आला. तसेच नागपूर विभागात काही भागात भाग पिकावर ‘पा’ रोगाचा तूर पिकावर मर रोगाचा आणि सोयाबीन पिकावर उंट अळीचा अल्प प्रमाणात प्रादूर्भाव दिसून आल्याचे कृषी विभागात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस