शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

'लाडकी बहीण योजना राबवतायेत, पण महिलांवरील अत्याचार रोखता आले नाही', शरद पवारांचा युतीवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 13:57 IST

राज्यात महिलांसाठी आणलेल्या लाडकी बहिण योजनेला हरकत नाही, परंतु सध्या वस्तुस्थिती वेगळी आहे

पुणे: राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहे. दर तासाला ५ महिलांवर अत्याचार होत आहेत. ६४ हजार मुली , महिला बेपत्ता आहेत. एकीकडे लाडकी बहीण योजना राबवत आहे, पण सध्याच्या राज्यकर्त्यांना महिलांवरील अत्याचार रोखता आले नाही.

देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी महिलांचा सन्मान आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आवश्यक आहे पण आजचे राज्यकर्ते त्याबाबत काहीच करत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केली खडकवासला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सचिन दोडके यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते .  

नेमक काय म्हणाले,'शरद पवार'

लोकसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हाला ४०० खासदार निवडून द्या असे सांगत होते. कारण त्यांना  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्य घटना बदलायची होती. देशातील आमच्या सवे घटक पक्षांनी एकत्रित लोकसभा निवडणूक लढविली. महाराष्ट्र ४८ खासदारापैकी ३oखासदार महाविकास आघाडीचे आले. त्यामुळे भाजप घटक पक्ष ४००चा आकडा गाठू शकले नाही. त्यासाठी राज्यातील जनतेला धन्यवाद दिले पाहिजे.

दोन वर्षात ६७ हजार ३८१ महिलांवर अत्याचार

राज्यात महिलांसाठी लाडकी बहिण योजना आणली. त्याला हरकत नाही . महिलांच्या सन्मानाचा आनंदच आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे. पण राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. दोन वर्षात ६७ हजार ३८१ महिलांवर अत्याचार झाले आहेत.याचाच अर्थ दर तासाला ५ महिलांवर अत्याचार होत आहेत. ६४ हजार मुली , महिला बेपत्ता आहेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नागपूर मध्ये 13 हजार महिला गायब आहेत. असेही शरद पवार यांनी सांगितले

राज्यात 20 हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही वाढल्या आहेत. शेतीमालाला किंमत मिळत नाही बी बियाणे खते यांच्या किमती वाढल्या आहेत .  त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. बँके वाले जप्ती करतात त्यामुळे बेइज्जतीहोते त्याचा परिणाम आत्महत्यांमध्ये होत आहे . राज्यात 20 हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेले आहेत गेल्या सहा महिन्यात १२६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेले आहेत मे महिन्यात 206 तर जून महिन्यात 193 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत देशात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे असे शरद पवार यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्याला पुन्हा एक क्रमांकाचे राज्य बनवायचा असेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी