शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

Pune Municipal Corporation:पुणे महापालिकेत समाविष्ट ३४ गावांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:19 IST

समाविष्ट गावांतील प्रश्नांबाबत होणार उच्चस्तरीय बैठक

पुणे :पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये अद्यापही पायाभूत सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे समाविष्ट झालेल्या गावांमधील सद्य:स्थितीबाबत लवकरच एक उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत गावांमधील पायाभूत सुविधा, पालिकेने आतापर्यंत केलेला खर्च, पालिकेला मिळालेला महसूल, राज्य शासनाकडून अपेक्षित असलेला निधी, पालिकेकडे असलेली अर्थसंकल्पीय तरतूद, आस्थापनेविषयीच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे.महापालिकेने समाविष्ट गावांमध्ये आवश्यक सुविधा पुरविणे आवश्यक आहे. मात्र, राज्य सरकारने या गावांसाठी निधी दिलेला नाही. महापालिकेने या गावांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडे मागितला होता. परंतु, राज्य शासनाकडून या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लावण्यात आल्या. या गावांमधील मिळकत करात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. मात्र, हा कर ग्रामपंचायतीच्या तुलनेत अधिक असल्याने ग्रामस्थांकडून त्याला विरोध होत आहे. याशिवाय या गावांतील अनधिकृत बांधकामे, गोदामे यांना तिप्पट मिळकतकर लागू करण्यात आल्याने विरोधात वाढ झाली आहे. या मिळकतकर थकबाकी वसुलीला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. महसूल मिळत नसल्याने पालिकेलाही हातचे राखून खर्च करावा लागत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे या गावांचा विकास ठप्प झाल्याचे चित्र आहे.दुसरीकडे या गावांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पालिकेत सामावून घेण्याची प्रक्रिया अद्याप पूर्णत: मार्गी लागलेली नाही. त्यातून सेवाज्येष्ठता, बिंदू नामावली आदींबाबत समस्या निर्माण झाल्या आहेत. उरूळी देवाची-फुरसुंगीमधील अधिकाऱ्यांना सामावून घेतल्यानंतर आता नगरपालिका झाल्याने त्यांना पुन्हा पाठवावे लागले आहे. त्याचा परिणाम सेवाज्येष्ठता व बिंदूनामावलीवर होणार आहे. याशिवाय काही अधिकारी, कर्मचारी उच्च न्यायालयात गेले आहेत. याशिवाय या गावांमधील पाणीपुरवठ्यावरून रहिवासी, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये वाद सुरू आहेत. गावांचा पालिकेत समावेश करताना मंजूर पाणीकोट्यात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे आधीच मूळ हद्दीत पाणीपुरवठा करू न शकणाऱ्या महापालिकेला समाविष्ट गावांना पाणी देताना नाकीनऊ येत असल्याची स्थिती आहे.सुविधा देण्याची जबाबदारी पालिकेवरचकाही महिन्यांपूर्वी या ३४ गावांमधील उरूळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे पालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र, या गावांमध्ये आवश्यक सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवरच सोपवली आहे. परंतु, या गावांमधून पालिकेला कोणताही महसूल मिळणार नाही.

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाMahayutiमहायुतीElectionनिवडणूक 2024civic issueनागरी समस्याWaterपाणी