शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘दहावी’ची लढाई जिंकून ‘कृष्णा’ गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:38 IST

एकीकडे जगण्याची लढाई... दुसरीकडे अभ्यासाची लढाई... असाध्य रोगाशी तब्बल १२ वर्ष झुंज... आईवडिलांची त्याला असलेली खंबीर साथ... आजारपणाच्या वेदना सहन करीतच त्याने दिली दहावीची परीक्षा... मात्र, हा निकाल पाहायला ‘तो’ या जगात नव्हता...

लोणी काळभोर : एकीकडे जगण्याची लढाई... दुसरीकडे अभ्यासाची लढाई... असाध्य रोगाशी तब्बल १२ वर्ष झुंज... आईवडिलांची त्याला असलेली खंबीर साथ... आजारपणाच्या वेदना सहन करीतच त्याने दिली दहावीची परीक्षा... मात्र, हा निकाल पाहायला ‘तो’ या जगात नव्हता... त्याने ८०.४० टक्के मिळवले होते... त्याची गुणपत्रिका पाहून आईवडलांच्या अश्रूंचा बांध फुटला.काळजाला पीळ पाडणारी ही घटना आहे लोणी काळभोरची. व्यावसायिक सुनील जगदीश भट्टड व वंदना यांचा ‘कृष्णा’ हा मुलगा. या दाम्पत्याला दोन मुली व कृष्णा अशी एकूण तीन अपत्ये. भट्टड हे संगणक तंत्रज्ञ म्हणून थेऊर ( हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यात पंचवीस वर्षे नोकरी करत होते. वंदना यांचे शिक्षण डीएमएलटी असल्याने गावात एक विविध आजारांची तपासणी करण्याची लॅब चालवतात.कृष्णा चार वर्षांचा असताना त्याला स्नायू आखडण्याचा आजार झाला होता. सुरुवातीला या आजाराचे प्रमाण खूपच नगण्य होते. काही वर्षांनी त्याला येथील एका खासगी शाळेत घालण्यात आले.सहावी पर्यंत त्याने शाळेत व्यवस्थित शिक्षण घेतले. एप्रिल २०१२ मध्ये भट्टड दांपत्य त्याला घेऊन पुण्याहून लोणी काळभोर कडे परतत असताना चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर त्याच्या आजाराचे स्वरूप वाढले. आजारामुळे त्याला शाळेत जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्याला घरीच शिकवणी लावण्यात आली.शीतल जैन व रश्मी तिखे या दोन शिक्षिकांनी घरी येऊन त्याला सर्व विषय शिकवले. फक्त परीक्षेच्या वेळी आईवडील त्याला रिक्षात बसवून शाळेत नेत असत. शाळेत नेण्यासाठी कृष्णाला संतोष नारायण सोनवणे या मित्राने खुप मदत केली. अशा प्रकारे अतिशय कष्ट घेऊन आई वडिलांनी त्याचे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मार्च २०१८ मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला तो बसला होता. परिक्षा दिल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच त्याचे २३ मे रोजी निधन झाले. दहावीच्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल ८ जून रोजी जाहीर झाला. या परिक्षेत त्याला ८०.४० टक्के पडले आहेत. त्याची गुणपत्रिका पाहून आई-वडील, दोन बहिणी, नातेवाईक, मित्रमंडळी या सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटला. कृष्णा हयात असता तर त्याला केवढा आनंद झाला असता या कल्पनेनेच सर्वांना गहिवरुन आले.कृष्णा चार वर्षांचा असताना आम्हाला या आजाराबाबत माहिती मिळाली. आम्ही शक्य ते सर्व आधुनिक औषधोपचार केले. परंतु यश मिळाले नाही. तो खुप जिद्दी होता. एवढा असाध्य आजार होऊनही त्याने शेवटपर्यंत जिद्द सोडली नाही. मी एक दिवस नक्कीच बरा होईल. स्वत:च्या पायावर चालत जाऊन व्यवस्थित महाविद्यालयात शिक्षण घेईन असे तो म्हणत असे. आजारी असतानाही तो आमची भरपूर काळजी करत असे. त्याची आई वंदना यांच्या जिद्दीमुळे तो असाध्य आजाराशी एखाद्या योद्ध्याप्रमाणे शेवट पर्यंत लढला.- सुनील भट्टड, वडील.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीDeathमृत्यू