शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: 'एक्झिट पोल'नुसार आंध्र प्रदेशात भाजपा सुस्साट, तेलंगणातही 'कमाल'
2
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
3
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
4
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
5
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
6
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
7
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
8
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
9
पंतप्रधान मोदींच्या १५५ सभा, २ हजारहून अधिक वेळा उच्चारले हे २ शब्द; विरोधकांना या ५ मुद्द्यांवर घेरलं!
10
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ पक्षातील महत्त्वपूर्ण नियुक्त्यांची घोषणा, सुप्रिया सुळेंकडे सोपवली मोठी जबाबदारी
11
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
12
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
13
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
14
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
15
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
16
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
17
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
18
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
19
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
20
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत

बारामतीच्या महाविद्यालयीन युवकाचे अपहरण करत माळशेज घाटात फेकले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 7:19 PM

बारामती शहरातील घटना

बारामती : मोटार विक्रीच्या जुन्या व्यवहारातून महाविद्यालयीन युवकाचे अपहरण करत त्याल माळशेज घाटात फेकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी सहाजणांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन बाळासाहेब कदम ( वय २३, रा. वेणेगाव, पो. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपहरण झालेल्या महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मनोज उर्फ बंडू रामदास मुळे (रा. तराळवस्ती, टेंभुर्णी) याच्यासह अन्य पाचजणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या युवकाचे बारामतीतील एका जीममधून अपहरण करून त्याला ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटाजवळ आंबे कार्नर येथे सोडण्यात आले होते. फिर्यादीनुसार नितीन हा बारामतीत महाविद्यालयीन शिक्षण घेतो. त्याच्याकडे एमएच-४२, एक्स-९२९६ या क्रमांकाची स्कार्पिओ गाडी होती. ती त्याने ओळखीच्या मनोज उर्फ बंडूमुळे याला विकली.

ऑगस्ट २०२० मध्ये नोटरीद्वारे व्यवहार करण्यात आला. गाडी बंडुमुळे याच्या ताब्यात देण्यात आली. मात्र, मुळे याने व्यवहार ठरल्याप्रमाणे पूर्ण पैसे दिले नाहीत. त्यामुळे फियार्दीने ‘टीटी’ फॉर्मवर सह्या केल्या नाहीत. टेंभुर्णी पोलिस ठाणे व सोलापूरच्या पोलिस अधिक्षकांना त्याच्या विरोधात अर्ज देण्यात आला. या रागातून तो फिर्यादीला धमकावत होता.

दि. २१ मार्च रोजी नितीन हा बारामतीत जीममध्ये व्यायाम करीत होता. यावेळी मुळे हा अन्य पाच साथीदारांसह तेथे आला. त्याने फिर्यार्दीला तु मुलीची छेड काढली आहे, भिगवण पोलिस स्टेशनला चल असे सांगितले. त्यावर फिर्यादीने मी कोणाचीही छेड काढली नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी काहीही ऐकून न घेता स्कॉर्पिओ गाडीत बसवले. भिगवणकडून करमाळा रस्त्याकडे त्यांनी हे वाहन नेले. तेथे रात्री नऊ वाजता त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला. गाडी नावावर करून घेण्यासाठी टी. टी. फॉर्मवर सह्या करण्यास सांगण्यात आले.

फियार्दीने नकार दिल्याने त्यांनी लोखंडी टॉामी डोक्यात मारली. टी. टी. फामवर जबरदस्तीने अंगठा घेत ते गाडीतून खाली उतरले. त्यातील  एकाने आणलेल्या रस्सीने फिर्यादीला  बांधत त्याच्या  चेहऱ्यावर टॉवेल टाकण्यात आला. याला मारुन मृतदेह माळशेज घाटात टाकू श अशी चर्चा त्यांच्यात सुरु होती.

मुळे याने फिर्यादीचा गळा रस्सीने आवळल्याने त्यात फियार्दी बेशुद्ध पडला. त्याला जाग आल्यावर तो कोणत्या ठिकाणी आहे हे समजत नव्हते. घाटातून चालत तो पायी वर गेला. तेथे काम सुरु असलेल्या कामगारांनी त्याला  हे ठिकाण आंबे कार्नर, माळशेज घाट असल्याचे त्याला सांगितले. त्यानंतर फिर्यादी एका ट्रकचालकाची मदत घेत  लगतच्या टोकावडे पोलिस स्टेशनला गेला. तेथून त्याने कुटुंबियांना फोन करत ही घटना सांगितली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीBaramatiबारामती